शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
4
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
5
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
6
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
7
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
8
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
9
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
10
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
11
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द
12
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
13
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
14
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
15
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
16
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
17
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
18
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
19
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
20
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

केडीएमसी हद्दीत बेकायदा बांधकामे होणार नाहीत याची जबाबदारी सहाय्यक आयुक्त आणि बीट निरीक्षकांवर!

By मुरलीधर भवार | Updated: February 5, 2024 20:52 IST

आयुक्त इंदूराणी जाखड यांची माहिती.

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत बेकायदा बांधकामांचा प्रश्न गाजत आहे. या प्रकरणी आयुक्तांना उच्च न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. त्या पश्चात बेकायदा बांधकामे उभी राहिल्यास त्याची जबाबदारी सहाय्यक आयुक्त आणि बीट निरिक्षकांवर असेल. त्यासाठी त्यांना जबाबदार धरले जाईल अशी माहिती महापालिका आयुक्त डा’. इंदूराणी जाखड यांनी दिली आहे.

आयुक्त जाखड यांनी सांगितले की, महापालिका हद्दीत बेकायदा बांधकामे उभी राहिली नाही पाहिजेत असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे. त्यानुसार बेकायदा बांधकामे उभी राहू नयेत यासाठी सहाय्यक आयुक्त आणि बीट निरिक्षकांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. बेकायदा बांधकमे आढळून आल्यास त्यावर कारवाई करण्यात यावी. त्यासाठी आवश्यक ते पोलिस उपलब्ध करुन घ्यावेत. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महापालिका हद्दीतील रहिवास मुक्त असलेल्या बेकायदा इमारती या प्राधान्याने पाडण्याची कारवाई केली जाईल. त्यासाठी महापालिकेने नियोजन केले आहे. तसेच विविध विभागाशी समन्वय साधण्याकरीता बैठकही घेण्यात आली आहे.

महापालिका मुख्यालयात बेकायदा बांधकाम तोडण्यासाठी पोलिसांचे एक पथक आहे. या पथकाचा खर्च महापालिकेच्या तिजोरीतून दिला जातो. या पथकातील प्रत्येकी चार पोलिस प्रत्येक प्रभाग कार्यालयास बेकायदा बांधकाम कारवाईकरीता दिले जातील. याशिवाय स्थनिक पोलिस स्टेशनच्या पोलिसांचीही मदत घेतली जाणार असल्याचे आयुक्त जाखड यानी सांगितले. तसेच गेल्या तीन वर्षात ज्या बेकायदा बांधकामांना मालमत्ता कर आकारण्यात आला आहे. त्या बेकायदा बांधकाम असलेल्या मालमत्तांकडून महापालिका कर वसूली करते. त्यांच्या कर पावतीवर बेकायदा बांधकाम कारवाईस आधीन राहून मालमत्ता कर वसूल केला जात असल्याचा शिक्का मारला आहे. अशा बेकायदा मालमत्तांचे सर्वेक्षण महापालिकेकडून केले जाणार असल्याचे आयुक्त जाखड यांनी सांगितले.

कल्याण डोंबिवलीत एकात्मिक घनकचरा प्रकल्प राबविण्याकरीता सीटू अंतर्गत महापालिकेने डीपीआर तयार केला आहे. हा डीपीआर महापालिकेच्या वतीने केंद्र सरकारला सादर करण्यात आला आहे. त्याला केंद्राकडून मान्यता मिळाल्या महापालिकेस प्रकल्प राबविण्याकरीता १३० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होऊ शकतो. या संदर्भावत दिल्लीत एक बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकला आयुक्त जाखड या जाणार आहेत. उंबर्डे घनकचरा प्रकल्प पुरेशा क्षमतेनिशी चालविला जात नव्हता. ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली होती. प्रकल्पाच्या ठिकाणी संकलीत होणारा कचरा आणि त्यावर होणारी प्रक्रिया यात तफावत होती. त्यामुळे कचरा जास्त आणि प्रक्रिया कमी असे व्यस्त प्रमाण होते. याठिकाणी डबल शिफ्टमध्ये काम करुन साचलेल्या कचऱ््यावर प्रक्रिया केली जाईल. त्यासाठी सहा महिन्याचे नियोजन केले आहे. कचरा साचून राहणार नाही. आलेल्या कचऱ््यावर डे टू डे प्रक्रिया केली जाईल. प्रकल्प पुर्ण क्षमतेनिशी चालविला जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका