शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसी हद्दीत बेकायदा बांधकामे होणार नाहीत याची जबाबदारी सहाय्यक आयुक्त आणि बीट निरीक्षकांवर!

By मुरलीधर भवार | Updated: February 5, 2024 20:52 IST

आयुक्त इंदूराणी जाखड यांची माहिती.

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत बेकायदा बांधकामांचा प्रश्न गाजत आहे. या प्रकरणी आयुक्तांना उच्च न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. त्या पश्चात बेकायदा बांधकामे उभी राहिल्यास त्याची जबाबदारी सहाय्यक आयुक्त आणि बीट निरिक्षकांवर असेल. त्यासाठी त्यांना जबाबदार धरले जाईल अशी माहिती महापालिका आयुक्त डा’. इंदूराणी जाखड यांनी दिली आहे.

आयुक्त जाखड यांनी सांगितले की, महापालिका हद्दीत बेकायदा बांधकामे उभी राहिली नाही पाहिजेत असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे. त्यानुसार बेकायदा बांधकामे उभी राहू नयेत यासाठी सहाय्यक आयुक्त आणि बीट निरिक्षकांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. बेकायदा बांधकमे आढळून आल्यास त्यावर कारवाई करण्यात यावी. त्यासाठी आवश्यक ते पोलिस उपलब्ध करुन घ्यावेत. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महापालिका हद्दीतील रहिवास मुक्त असलेल्या बेकायदा इमारती या प्राधान्याने पाडण्याची कारवाई केली जाईल. त्यासाठी महापालिकेने नियोजन केले आहे. तसेच विविध विभागाशी समन्वय साधण्याकरीता बैठकही घेण्यात आली आहे.

महापालिका मुख्यालयात बेकायदा बांधकाम तोडण्यासाठी पोलिसांचे एक पथक आहे. या पथकाचा खर्च महापालिकेच्या तिजोरीतून दिला जातो. या पथकातील प्रत्येकी चार पोलिस प्रत्येक प्रभाग कार्यालयास बेकायदा बांधकाम कारवाईकरीता दिले जातील. याशिवाय स्थनिक पोलिस स्टेशनच्या पोलिसांचीही मदत घेतली जाणार असल्याचे आयुक्त जाखड यानी सांगितले. तसेच गेल्या तीन वर्षात ज्या बेकायदा बांधकामांना मालमत्ता कर आकारण्यात आला आहे. त्या बेकायदा बांधकाम असलेल्या मालमत्तांकडून महापालिका कर वसूली करते. त्यांच्या कर पावतीवर बेकायदा बांधकाम कारवाईस आधीन राहून मालमत्ता कर वसूल केला जात असल्याचा शिक्का मारला आहे. अशा बेकायदा मालमत्तांचे सर्वेक्षण महापालिकेकडून केले जाणार असल्याचे आयुक्त जाखड यांनी सांगितले.

कल्याण डोंबिवलीत एकात्मिक घनकचरा प्रकल्प राबविण्याकरीता सीटू अंतर्गत महापालिकेने डीपीआर तयार केला आहे. हा डीपीआर महापालिकेच्या वतीने केंद्र सरकारला सादर करण्यात आला आहे. त्याला केंद्राकडून मान्यता मिळाल्या महापालिकेस प्रकल्प राबविण्याकरीता १३० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होऊ शकतो. या संदर्भावत दिल्लीत एक बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकला आयुक्त जाखड या जाणार आहेत. उंबर्डे घनकचरा प्रकल्प पुरेशा क्षमतेनिशी चालविला जात नव्हता. ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली होती. प्रकल्पाच्या ठिकाणी संकलीत होणारा कचरा आणि त्यावर होणारी प्रक्रिया यात तफावत होती. त्यामुळे कचरा जास्त आणि प्रक्रिया कमी असे व्यस्त प्रमाण होते. याठिकाणी डबल शिफ्टमध्ये काम करुन साचलेल्या कचऱ््यावर प्रक्रिया केली जाईल. त्यासाठी सहा महिन्याचे नियोजन केले आहे. कचरा साचून राहणार नाही. आलेल्या कचऱ््यावर डे टू डे प्रक्रिया केली जाईल. प्रकल्प पुर्ण क्षमतेनिशी चालविला जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका