शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

२७ गावातील दसपट मालमत्ता कर आकारणी आणि बेकायदा बांधकाम प्रकरणी फेरमूल्यांकन समिती लवकर नेमा

By मुरलीधर भवार | Updated: June 22, 2023 15:22 IST

सर्व पक्षीय संघर्ष समितीने घेतली आयुक्तांची भेट

मुरलीधर भवार, कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावातील नागरीकांना १० पट जास्तीचा मालमत्ता कर आकारणी आणि बेकायदा बांधकाम प्रकरणी फेरमूल्यांकन समिती गठीत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी मागच्या महिन्यात दिले हाेते. या आदेशानुसार समिती लवकर गठीत करुन त्याचा अहवाल महापालिका आयुक्तांनी लवकर राज्य सरकारला सादर करावा अशी मागणी २७ गाव सर्व पक्षीय संघर्ष समितीने केली आहे.

यासंदर्भात संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, उपाध्यक्ष गुलाब वझे, पदाधिकारी चंद्रकांत पाटील, गजानन मांगरुळकर, विश्वानाथ रसाळ, विजय भाने, भास्कर पाटील, दत्ता वझे, जालिंदर पाटील, बाळाराम ठाकूर, दशरथ चिकणकर आदींनी आज महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेतली.

महाालिकेकडून २७ गावातील मालमत्ताधारकांना दहा पटीने कर आकारणी केली जाते. तसेच बेकायदा बांधकामे नियमित करण्याची मागणी संघर्ष समितीने केली होती. २ मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात यासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत फेरमूल्यांकन करण्यासाठी समिती नेण्याचे आदेश आयुक्तांना देण्यात आले होते. ही समिती लवकर गठीत केली जावी यासाठी संघर्ष समितीने आज पुन्हा एकदा आग्रही भूमिका मांडली.२०१५ साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण डोंबिवलीतील २७ गावामधील १० गावात कल्याण ग्रोथ सेंटर उभारण्याची घोषणा केली.

१०८९ हेक्टर जागेवर हे ग्रोथ सेंटर उभे राहणार आहे. त्यासाठी १ हजार कोटी ८९ लाखाचा निधी मंजूर आहे. सरकारने १० गावाकरीता एमएमआरडीएचे नियोजन प्राधिकरण ठेवले आहे. मात्र ग्रोथ सेंटरच्या नावाखाली बड्या गृहसंकुलाच्या प्रकल्पानांना मंजूरी दिली जात आहे. याशिवाय शेतकऱ््यांच्या जमीनीही घेतल्या जात आहेत. २७ गावे महापालिका हद्दीत असल्याने ग्रोथ सेंटरची १० गावांचे नियोजन प्राधिकरण हे महापालिकेकडेच असावी अशी मागणी संघर्ष समितीने केली असून ग्रोथ सेंटरचा शेतकरी आणि भूमीपूत्रांना फायदा होत नसेल तर ग्रोथ सेंटर रद्द करण्यात यावे अशी भूमिका संघर्ष समितीने घेतली आहे. यावर आयुक्तांनी प्रशासन समितीच्या मागण्यावर सकारात्मक विचार करणार आहे. लवकरच समिती नेमणार आहे असे स्पष्ट केले आहे.

नागरीकांच्या तोंडचे पाणी कोण चोरते ?

भाेपर, पिसवली, आडीवली ढोकळी आदी गावांमधील नागरीकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. २७ गावांकरीता १०५ दश लक्ष लीटर पाणी कोटाच मंजूर आहे. प्रत्यक्षात २७ गावांना एमआयडीसीकडून केवळ ५५ दश लक्ष लिटर पाणी मिळते. त्यातही आत्ता पाणी कपात सुरु आहे. त्यामुळे नागरीकांच्या तोंडचे पाणी कोण चोरी करीत आहे असा सवाल संघर्ष समितीने उपस्थित केला आहे.

 

टॅग्स :kalyanकल्याण