शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

महिला व दिनदुबळ्यांकरता अण्णाभाऊ साठेंनी आपल्या लेखणीचा प्रभावी उपयोग केला : किशोर अल्हाड

By अनिकेत घमंडी | Updated: August 21, 2023 14:01 IST

शिक्षणाबरोबरच आपल्यामध्ये असलेले विविध गुणही आपल्याला जोपासले पाहिजेत, असे प्रतिपादन मातंग चेतना परिषदेचे प्रांत प्रमुख किशोर अल्लाड यांनी व्यक्त केले. 

कल्याण : अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातून त्यांनी अनुभवलेला संघर्ष मांडला. त्यांचे कार्य केवळ मातंग समाजाकरता नव्हते. तर ,महिला व दिनदुबळ्यांकरता त्यांनी आपल्या लेखणीचा प्रभावी उपयोग केलेला दिसतो. अण्णाभाऊ साठे हे अजूनही समाजाला नीट कळलेले नाहीत. त्यांचे साहित्य वारंवार वाचले तरच आपल्याला त्यांचे विचार समजण्यास सुरुवात होईल. शिक्षणाबरोबरच आपल्यामध्ये असलेले विविध गुणही आपल्याला जोपासले पाहिजेत, असे प्रतिपादन मातंग चेतना परिषदेचे प्रांत प्रमुख किशोर अल्लाड यांनी व्यक्त केले. 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सवानिमित्त नूतन हायस्कूल कल्याण येथे सोबती सामाजिक विकास प्रतिष्ठान यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असताना त्यांच्या भाषणात वरील प्रतिपादन केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रवीण देशमुख यांनी सोमवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. मातंग समाजाला लढवैय्या असल्याचे ते म्हणाले. त्यावेळी व्यासपीठावर कृष्णा फाळके आवळे सव एकनाथ भिसे हे उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष सोनावळे व विद्यमान अध्यक्ष विलास लोखंडे यांनी मान्यवरांचा सत्कार केला. 

समाजातील महापुरुष लहुजी वस्ताद व मातंग ऋषी यांच्या जयंतीचा कार्यक्रम संपूर्ण कल्याणकरांना सामील करून करण्यात यावे असे जाहीर आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमास जनकल्याण समितीचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष ललित सारंग, कल्याण शहर प्रमुख अरुण देशपांडे, गुलाब जगताप व रोशन सूर्यवंशी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव नितीन वायदंडे व मोहन साठे यांनी केले. 

टॅग्स :dombivaliडोंबिवली