शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

अमृत योजना जलकुंभाच्या जागेचा प्रश्न सुटला; मनसे आमदारांच्या पाठपुराव्याला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2022 2:51 PM

Kalyan-Dombivali : पाणी योजनेच्या कामाला गती देण्यासाठी मनसे आमदार पाटील यांनी जिल्हाधिकारी नार्वेकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

कल्याण : २७ गावांकरिता केंद्र सरकारच्या अमृत पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली. गावात जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरु आहे. जलकुंभ उभारण्यासाठी जागा उपलब्ध होत नव्हत्या. या जागा जिल्हा परिषदेने कल्याणडोंबिवली महापालिकेस हस्तांतरीत करण्यात आल्याने जलकुंभ उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पाठपुरावा केला होता. याविषयी त्यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेतली होती.

२७ गावातील उसरघर, माणोरे, द्वारली, भोपर, देसलेपाडा, कोळे , संदप, निळजे, हेदुटणो या गावांमधील गुरु चरण, प्रांतिक सरकार इतर हक्क-परिवहन आयुक्त मुंबई यांचा आगाऊ ताबा, सार्वजनिक रस्ता, ग्रुप ग्रामपंचायत व प्रांतिक सरकार आदी प्रकारच्या जमिनींवर जलकुंभांचे आरक्षण होते. त्यामुळे या जमिनी जलकुंभासाठी महापालिकेकडे वर्ग करण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. त्यामुळे जलवाहिन्या टाकल्या तरी जलकुंभांची कामे अद्याप रखडली होती. 

पाणी योजनेच्या कामाला गती देण्यासाठी मनसे आमदार पाटील यांनी जिल्हाधिकारी नार्वेकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता. तसेच जलकुंभांसाठी आवश्यक असणार्या जागांची पाहणी देखील आमदार पाटील यांनी अधिकार्यांसोबत केली होती. जलकुंभाच्या जागेचा प्रश्न सुटल्याने जलकुंभ उभारण्याच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

२७ गावांना आजमितीस एमआयडीसीकडून ३० दश लक्ष लिटरपेक्षा जास्त पाणी पुरवठा केला जातो. या पाणी पुरवठ्याचे बिल महापालिका भरते. हा पाणी पुरवठा अपुरा आहे. तसेच कमी दाबाने होत असतो. त्यामुळे अनेकदा या गावात पाणी टंचाईच होते. त्यासाठी केंद्र सरकारने अमृत पाणी पुरवठा योजनेला मंजूरी दिली. ही योजना १९४ कोटी रुपये खर्चाची आहे. या योजने अंतर्गत जलवाहिन्या टाकणे, जलकुंभ उभारणे ही कामे केली जाणार आहे. ही कामे पूर्णत्वास झाल्यास २७ गावांचा पाणी प्रश्न निकाली निघणार आहे.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीRaju Patilराजू पाटील