शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

आगरी महोत्सवात ४ लाखांहून अधिक गर्दीचा नवा उच्चांक

By मुरलीधर भवार | Updated: December 21, 2023 16:02 IST

१९ व्या आगरी महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

डोंबिवली : आगरी समाजाच्या सामाजिक व सांस्कृतिक संस्कृतीचे प्रतिबिंब असलेल्या अखिल भारतीय आगरी महोत्सवात यंदा गर्दीचा नवा उच्चांक प्रस्थापित झाला. महोत्सवाच्या आठ दिवसांच्या काळात तब्बल चार लाखांहून अधिक नागरिकांनी आगरी संस्कृती अनुभवली. महोत्सवाची बुधवारी सांगता करताना संयोजन समितीचे अध्यक्ष गुलाब वझे व इतर पदाधिकारी आणि सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल जनतेचे आभार मानले. यापुढील काळात संत सावळाराम महाराजांच्या भव्य स्मारकासह समाजासाठी आणखी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतील, अशी घोषणा अध्यक्ष गुलाब वझे यांनी केली.

मुंबई, ठाण्यासह रायगड जिल्ह्यात सर्वप्रथम २००४ मध्ये डोंबिवली येथे आगरी महोत्सव सुरू झाला होता. यंदा महोत्सवाचे १९ वे वर्ष होते. त्यानिमित्ताने नागरिकांसाठी आगरी खाद्य संस्कृती, परंपरेचे दर्शन घडविण्याबरोबरच सामाजिक भान राखून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. १३ डिसेंबर रोजी सुरू झालेल्या या महोत्सवाचा काल रात्री समारोप करण्यात आला. त्यावेळी गुलाब वझे यांच्यासह मंचावर विश्वनाथ रसाळ, जालिंदर पाटील, रामकृष्ण पाटील, प्रकाश भंडारी, पांडुरंग म्हात्रे, शरद पाटील, दिलीप देसले, संतोष संत, गुरुनाथ म्हात्रे, जयेंद्र पाटील, भानुदास भोईर, नारायण म्हात्रे, कांता पाटील, अनंत पाटील, विनायक पाटील, अशोक पाटील, सदानंद म्हात्रे, प्रवीण पाटील, सल्लागार विजय पाटील, राम पाटील, प्रभाकर चौधरी, गंगाराम शेलार, सुभाष चं. म्हात्रे, चंद्रकांत पाटील, डॉ. दिनेश म्हात्रे, सुरेश जोशी, नंदू म्हात्रे, रंगनाथ ठाकूर, ग्लोबल कॉलेजच्या प्राचार्या सुप्रिया नायकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

या महोत्सवात केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, लोकनेते रामशेठ ठाकूर, अखिल भारतीय आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, माजी आमदार सुभाष भोईर, माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, पनवेल येथील समाजाचे नेते बबन पाटील, बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे आदींसह मान्यवर नेते, माजी नगरसेवक-नगरसेविका आदींनी महोत्सवाला भेट दिली. या महोत्सवात नागरिकांनी खाद्य व मनोरंजनाबरोबरच विविध विषयांवरील चर्चाही ऐकली. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देणे, मराठी भाषेचे संवर्धन व जतन, ओबीसी आरक्षण आदी विषयांवरील कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

या महोत्सवाच्या यशाबद्दल अध्यक्ष गुलाब वझे यांनी नागरिकांना धन्यवाद दिले. मुंबई, ठाणे जिल्ह्याबरोबरच रायगड व पालघर जिल्ह्यातील नागरिकांनीही महोत्सवात सहभागी होऊन आनंद लुटला.

संत सावळाराम महाराजांच्या स्मारकासाठी सर्वोच्च प्राधान्य

संत सावळाराम महाराज यांचे नेतिवली येथे दहा एकरात भव्य स्मारक उभारण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे. या स्मारकाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून संपूर्ण सहकार्य केले जात आहे. त्याचबरोबर २७ गावांमधील वाढत्या करांना माफी, शीळफाटा रस्त्याला संत सावळाराम महाराजांचे नाव, आगरी युथ फोरमच्या महाविद्यालयाला जागा यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे, अशी माहिती अध्यक्ष गुलाब वझे यांनी दिली.

टॅग्स :dombivaliडोंबिवली