शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कल्याणमध्ये आगरी कोळी आणि वारकरी भवन उभारण्यात यावे!

By मुरलीधर भवार | Updated: March 21, 2023 21:16 IST

कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांची विधानसभेत मागणी

मुरलीधऱ भवार, कल्याण: येथील आगरी कोळी समाज बांधव जास्त प्रमाणात आहे. त्याचबरोबर वारकरी संप्रदायही मोठय़ा प्रमाणात आहे. आगरी कोळी आणि वारकरी भवन तयार करण्यात यावे अशी मागणी शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी आज विधानसभेत केली आहे.

ठाणे, रायगड जिल्ह्यात आगरी कोळी समाज बांधवांची संख्या जास्त आहे. कल्याणमध्येही आगरी कोशी समाजाचे लोक जास्त प्रमाणात वास्तव्य करुन आहे. आगरी कोळी समाजाची कल्याणमध्ये एक लाख इतकी लोकसंख्या आहे. या समाजाकडून आगरी कोळी महोत्सव, नारळी पौर्णिमा, विद्यार्थी गुणगौरव सोहळा, राष्ट्रीय आणि विविध सण साजरे केले जातात. मात्र समाजाकरीता स्वतंत्र अशी वास्तू नाही. कल्याण पश्चिमेला असलेल्या महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर आगरी कोळी भवन उभारण्यात यावे.

आगरी कोळी समाजाच्या भवन उभारण्याचा ठराव महापालिकेच्या महासभेत मंजूर आहे. त्याची अद्याप कार्यवाही झालेली नाही. त्याचबरोबर कल्याण पश्चिमेत वारकरी संप्रदायाचे लोक जास्त आहे. संत सावळाराम महाराज आणि शंकर महाराज शहाडकर यांना मानणारा मोठा वारकरी वर्ग आहे. महापालिकेकडे आरक्षित भूखंड आहेत. या आरक्षित भूखंडावर वारकरी भवनाची उभारणी करण्यात यावी. तसे आदेश राज्य सरकारने महापालिका प्रशासनास द्यावे. राज्य सरकारने यंदा सादर केलेल्या राज्याच्या अर्थ संकल्पात विविध योजना राबविण्याचे जाहिर केले आहे. त्याकरीता आर्थिक तरतूद केली आहे. या तरतूदीच्या माध्यमातून कल्याण पश्चिम भागात आगरी कोळी आणि वारकरी भवन उभारण्याकरीता महापालिकेस निधीही उपलब्ध करुन द्यावा याकडे राज्य सरकारडे आमदार भोईर यांनी लक्ष वेधले आहे.

टॅग्स :kalyanकल्याण