शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
8
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
9
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
10
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
11
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
12
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
13
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
14
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
15
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
17
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
18
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
19
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
20
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड

कल्याणमध्ये आगरी कोळी आणि वारकरी भवन उभारण्यात यावे!

By मुरलीधर भवार | Updated: March 21, 2023 21:16 IST

कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांची विधानसभेत मागणी

मुरलीधऱ भवार, कल्याण: येथील आगरी कोळी समाज बांधव जास्त प्रमाणात आहे. त्याचबरोबर वारकरी संप्रदायही मोठय़ा प्रमाणात आहे. आगरी कोळी आणि वारकरी भवन तयार करण्यात यावे अशी मागणी शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी आज विधानसभेत केली आहे.

ठाणे, रायगड जिल्ह्यात आगरी कोळी समाज बांधवांची संख्या जास्त आहे. कल्याणमध्येही आगरी कोशी समाजाचे लोक जास्त प्रमाणात वास्तव्य करुन आहे. आगरी कोळी समाजाची कल्याणमध्ये एक लाख इतकी लोकसंख्या आहे. या समाजाकडून आगरी कोळी महोत्सव, नारळी पौर्णिमा, विद्यार्थी गुणगौरव सोहळा, राष्ट्रीय आणि विविध सण साजरे केले जातात. मात्र समाजाकरीता स्वतंत्र अशी वास्तू नाही. कल्याण पश्चिमेला असलेल्या महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर आगरी कोळी भवन उभारण्यात यावे.

आगरी कोळी समाजाच्या भवन उभारण्याचा ठराव महापालिकेच्या महासभेत मंजूर आहे. त्याची अद्याप कार्यवाही झालेली नाही. त्याचबरोबर कल्याण पश्चिमेत वारकरी संप्रदायाचे लोक जास्त आहे. संत सावळाराम महाराज आणि शंकर महाराज शहाडकर यांना मानणारा मोठा वारकरी वर्ग आहे. महापालिकेकडे आरक्षित भूखंड आहेत. या आरक्षित भूखंडावर वारकरी भवनाची उभारणी करण्यात यावी. तसे आदेश राज्य सरकारने महापालिका प्रशासनास द्यावे. राज्य सरकारने यंदा सादर केलेल्या राज्याच्या अर्थ संकल्पात विविध योजना राबविण्याचे जाहिर केले आहे. त्याकरीता आर्थिक तरतूद केली आहे. या तरतूदीच्या माध्यमातून कल्याण पश्चिम भागात आगरी कोळी आणि वारकरी भवन उभारण्याकरीता महापालिकेस निधीही उपलब्ध करुन द्यावा याकडे राज्य सरकारडे आमदार भोईर यांनी लक्ष वेधले आहे.

टॅग्स :kalyanकल्याण