शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
6
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
7
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
8
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
9
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
10
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
11
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
12
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
13
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
14
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
15
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
16
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
17
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
18
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
19
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
20
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल

डोंबिवलीतील कंपन्या स्थलांतरीत करण्याप्रकरणी उपसमितीच्या अहवालापश्चात सरकारची कृती आराखडा समिती निर्णय घेणार

By मुरलीधर भवार | Updated: June 12, 2024 20:19 IST

कल्याण -अमूदान कंपनी स्फोटानंतर डोंबिवली एमआयडीसीमधील अतिधोकादायक आणि धोकादायक कंपन्या हटविणयाचा एक कृती आराखडा तयार करण्यासाठी राज्य सरकारने समितीने ...

कल्याण-अमूदान कंपनी स्फोटानंतर डोंबिवली एमआयडीसीमधील अतिधोकादायक आणि धोकादायक कंपन्या हटविणयाचा एक कृती आराखडा तयार करण्यासाठी राज्य सरकारने समितीने नेमली होती. त्याबरोबर कंपन्यांचे सर्वेक्षण करण्याकरीता एक उपसमिती नेमली होती. या उपसमितीने सर्वेक्षण करुन येत्या २० जूनपर्यंत कृती आराखडा समितीला अहवाल सादर करायचा आहे. त्यानंतर कृती आराखडा समिती कंपन्या स्थलांतरीत करण्याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डा’. इंदूराणी जाखड यांनी दिली आहे.

आज डोंबिवली एमआयडीसीतील फेज-२ मधील इंडो अमाईन कंपनीला भीषण आग लागली. त्यात जिवीत हानी झाली. या आगीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून काय हाचलाली सुरु आहेत. त्याचबरोबस सरकारने नेमलेल्या उपसमितीचा महापालिका भाग असल्याने समितीने आत्तापर्यंत काय केले याची माहिती आयुक्त जाखड यांनी दिली. आयुक्त जाखड यांनी सांगितले की, अमूदान स्फोटाच्या घटनेची सरकारने गंभीर दखल घेतली. २७ मे रोजीच एमआयडीसी, पर्यावरण खाते, प्रदूषण नियंत्रण मंडळ आदी संबंधित विभागांची बैठक घेून कृती समिती स्थापन केली. हा निर्णय उद्योग विभागाच्या प्रधान सचिवांनी घेतला हाेता. कृती आराखडा तयार करण्याकरीता सरकारने उपसमितीही स्थापन केली. त्यामध्येही पर्यावरण खाते, प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी, अग्नीशमन दल, महापालिका यांचा समावेश होता.

डोंबिवलीतील अतिधोकादायक, धोकादायक आणि अन्य कंपन्या स्थलांतरीत करण्याकरीता पाय पावले उचलता येतील याचा अहवाल तयार करण्याचे काम दिले गेले आहे. समितीच्या आत्तापर्यंत तीन बैठका पार पडल्या आहे. उपसमितीने सर्वेक्षण केेल आहे. या सर्वेक्षणानुसार कंपनी कोणाच्या मालकीची आहे. त्यात कोणते उत्पादन घेतले जाते. त्यासाठी कोणत्या रासायनिक कच्चा मालाचा वापर केला जातो. कंपनीची जागा किती आहे. कंपनी स्थलांतरीत करण्यास मालकाची सहमती आहे की नाही. याचा एकत्रित अहवाल येत्या २० जूनपर्यंत कृती आराखडा समितीला दिला जाईल. त्यानंतर कृती आराखडा समिती कंपन्या स्थलांतरीत करण्यावर निर्णयघेणार आहे. उपसमितीने सुचविलेल्या एक पर्यायापैकी अतिधोकादायक कंपन्या तातडीने इतरत्र हलविण्यात याव्यात. या उपसमितीत महापालिकेचा रोल कमी आहे.

डोंबिवली एमआयडीतील नियोजन प्राधिकरण हे एमआयडीसी आहे. त्यामुळे बफर झोन राखला गेला की नाही. याची जबाबदारी एमआडीसीची आहे. मात्र कंपन्याकडे जाणारे रस्ते अरुंद असणार नाही याची काळजी घेतली एमआयडीसीने घेतली पाहिजे. महापालिका अरुंद मार्गातून घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या गाड्या पोहचतील अशा गाड्या घेणार आहे. त्यात वा’टर आणि फोमच्या गाड्यांचा समावेश असेल. अग्नीशमन दलाचे बळकटीकरकण केले जाणार आहे. एमआयडीसीतील अग्नीशमन केंद्र जुने आहे. ते महापालिका ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी मनुष्यबळ महापालिकेचे आणि यंत्रणा एमआयडीसीची असेल.काही दिवसापूर्वी डोंबिवलीतील चायनीज गाडीवरी ग’स सिलेंडरचा स्फोट झाला होता. या स्फोटानंतर फेरीवाल्यांना बेकायदेशीरपणे ग’स सिलेंडर पुरविणाऱ््या ग’स एजेन्सीवर कारवाई करुन त्यांचा ग’स पुरवठा करण्याचे लायसन्स रद्द करण्याची कारवाई करणार असल्याचे आयुक्त जाखड यांनी सांगितले.

टॅग्स :kalyanकल्याण