शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या फेरीवाला विरोधी पथकाने विनापरवाना फेरीवाल्यांवर कारवाई

By अनिकेत घमंडी | Updated: December 25, 2023 16:55 IST

एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १४४ अंतर्गत २४,३३९ गुन्हे नोंदवले असून २४,३३४ जणांना अटक केली आणि त्यांच्याकडून ३.०५ कोटी रु.चा दंड वसूल केला.

अनिकेत घमंडी,डोंबिवली: मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या फेरीवाला विरोधी पथकाने अनधिकृत फेरीवाले आणि रेल्वेच्या परिसरात अतिक्रमण करणाऱ्या विनापरवाना फेरीवाल्यांविरुध्द कारवाईची मोहीम राबवली आहे, आणि ट्रेनमध्ये एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम अंतर्गत  २४,३३९ प्रकरणे नोंदवून २४,३३४ जणांना अटक केली. त्या कारवाईत ३.०५ कोटी रुपये दंड वसूल केला.

एप्रिल ते नोव्हेंबर या दहा महिन्यांच्या कालावधीत फेरीवाला उपद्रव आणि बेकायदेशीर गोष्टींना आळा घालण्यासाठी पुढील  कारवाई करण्यात आली 

मुंबई विभागात ९३९४ गुन्ह्यांची नोंद झाली असून ९३९३ जणांना अटक करून एकूण १.०२ कोटी रु.दंड वसूल करण्यात आला आहे. 

• भुसावळ विभागाने सर्वाधिक  गुन्हे दाखल असून सर्व विभागांमध्ये  ७२०६ गुन्हे दाखल असून ७२०५ लोकांना अटक करण्यात आली असून १.२९ कोटी रु.चा दंड वसूल करण्यात आला.

• नागपूर विभागात ३१८१ गुन्हे दाखल करण्यात आले आणि ३१७९ जणांना अटक करण्यात आली असून १ लाख रु.चा दंड वसूल केला आहे. 

• पुणे विभागाच्या आरपीएफने १९९० गुन्हे दाखल करण्यात आले आणि १९९१ लोकांना अटक करण्यात आली असून १३.८८ लाख  रु. दंड  वसूल केला आहे.

• आरपीएफ सोलापूर विभागाने २५६८ गुन्हे दाखल करण्यात आले आणि २५६६ लोकांना अटक करण्यात आली असून २५.८७ लाख रु. दंड वसूल केला आहे. फेरीवाला विरोधी पथकाच्या सततच्या प्रयत्नांनी प्रवाशांची सुरक्षा आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी त्यांचे समर्पण दिसून आले आहे. हे परिणाम रेल्वे नेटवर्कची अखंडता राखण्यासाठी आणि प्रवाशांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी रेल्वे अधिकारी आणि कायद्याची अंमलबजावणी करणारी बांधिलकी जपत असल्याचा दावा रेल्वेने सोमवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला.

टॅग्स :Mumbaiमुंबईcentral railwayमध्य रेल्वे