शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
5
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
6
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
7
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
8
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
9
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
10
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
11
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
12
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
13
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
14
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
15
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
16
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
17
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
18
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
19
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
20
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नवनितानंद महाराजांच्या अपघाती निधनाने अध्यात्मिक क्षेत्रात हानी

By सचिन सागरे | Updated: December 20, 2022 18:19 IST

पश्चिमेतील फोरेस्ट कॉलनी परिसरात श्री स्वामी समर्थ मठाची स्थापना मोडक महाराजांनी केली आहे.

कल्याण - कल्याणसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात श्री स्वामी समर्थ मठांची स्थापना करणारे मठाधिपती नवनितानंद महाराज (अरुण मोडक) यांच्या सोमवारी सकाळी सातारा येथे झालेल्या अपघाती निधनाने अध्यात्मिक क्षेत्रात मोठी हानी झाली. मंगळवारी सकाळी मोडक महाराजांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी मठामध्ये ठेवण्यात आले होते. सोमवारी रात्रीपासूनच भक्तगण याठिकाणी जमा झाले होते. महाराजांच्या इच्छेनुसार मंगळवारी मठाच्या आवारात त्यांना मरणोत्तर समाधी देण्यात आली.

पश्चिमेतील फोरेस्ट कॉलनी परिसरात श्री स्वामी समर्थ मठाची स्थापना मोडक महाराजांनी केली आहे. त्याचबरोबर, मुंबई, रायगड, रत्नागिरी , सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यात श्री स्वामी समर्थ मठाची स्थापना करत हजारो भक्तांना अध्यात्मिक प्रवाहात आणण्यासाठी मोठे योगदान दिले. नामस्मरण, सेवाभाव, कुलाचार याद्वारे ईश्वरसेवा करत आपले संस्कार आणि संस्कृती जोपासून आध्यात्मिक प्रगतीच्या त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आज हजारो भक्तगण वाटचाल करत आहेत.

कल्याण येथील मठात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ मोडक महाराज कार्यरत होते. भक्ती, प्रेम, त्याग, शिस्त आदी गुणांचा संगम म्हणून भक्तगणांच्या हृदयात त्यांचे अढळ स्थान होते. मोडक महाराजांच्या अशा अकाली अपघाती निधनाने भक्तगणांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

टॅग्स :kalyanकल्याण