शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कल्याण लोकसभा मतदार संघात फेर निवडणूक घेण्याची अभिजीत बिचुकले यांची मागणी

By मुरलीधर भवार | Updated: May 21, 2024 21:04 IST

८० हजार मतदारांची नावे झाली गायब झाल्याचा आरोप, अन्यथा २७ मे पासून आमरण उपोषण करण्याचा निवडणूक आयोगाला इशारा.

कल्याण-कल्याण लोकसभा मतदार संघाकरीता काल मतदान पार पडले. या मतदार संघातून ८० हजार मतदारांची नावे गायब झाली आहे. त्यामुळे ८० हजार मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजाविता आला नाही. ते वंचित राहिले आहे. या लाेकसभा मतदार संघात फेर निवडणूक घेण्यात यावी असी मागणी बिग बा’स फेम कल्याण लोकसभेतील अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ््यांकडे केली आहे. निवडणूक आयोगाने त्यांची मागणी विचारात घेतली नाही तर बिचुकले येत्या २७ मे पासून आमरण उपोषण सुरु करणार असल्याचा इशारा बिचुकुले यांनी निवडणूक आयोगाला दिला आहे.

अपक्ष उमेदवार बिचुकले यांनी आज कल्याण लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषणा सातपुते यांची भेट घेतली. त्यांना एक निवेदनही बिचुकले यांनी सादर केले आहे. बिचुकले यांनी सांगितले की, कल्याण लोकसभा मतदार संघात कमी टक्के मतदान झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, कल्याण लोकसभा मतदार संघात मतदान सुरु होते. त्यावेळी त्याठिकाणी निवडणूक प्रक्रिये काही तरी गडबड लफडा सुरु आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद पाहिली तर त्याठिकाणी त्यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाचे काम थोडेसे मनमानी कारभाराचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याने संपूर्ण प्रशासन त्यांच्या हाती आहे. हे प्रशासन त्यांच्या हाताखाली काम करीत आहे. मी कल्याण लोकसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार असल्याने या प्रकरणी मी जातीने लक्ष घालून. निवडणूक निर्णय अधिकारी यांना निवेदन दिले. या ठिकाणी ताबडतोब आयोगाला कळवा की, बिचुकले यांची सूचना आहे. या मतदार संघात ८० हजार नावे लुप्त केली असतील तर एका माणसाचे नाव जरी झाले तरी लोकहिताला बाधा येते. हे कामकाज सरकारच्या माध्यमातून प्रेरित आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. मतदानापासून लोकांना तूम्ही वंचित ठेवत असाल तर संपूर्णत: मी प्रथम भारतीय आहे. शेवटही मी भारतीयच आहे. भारतीय निवडणूक आयोगाने मतदारांचा अधिकार लूप्त केला. त्यासाठी कल्याण लोकसभा मतदार संघातील निवडणूक पुन्हा घ्या. अन्यथा २७ मे रोजी अपक्ष उमेदवार आणि ज्या मतदारांना मतदानाचा हक्क बजाविता आला नाही. त्यांच्या वतीने आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा बिचुकले यांनी निवडणूक आयोगाला दिला आहे.

टॅग्स :kalyanकल्याण