शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

कल्याण पश्चिमेला क्रिडा संकुल तयार करावे; विश्वनाथ भोईर यांची विधी मंडळ अधिवेशनात मागणी

By मुरलीधर भवार | Updated: July 26, 2023 17:51 IST

कल्याण पश्चिमेतून अनेक खेळाडून विविध खेळाकरीता खेळत असतात. त्यांच्याकडून सराव सुरु असतो.

कल्याण-कल्याण पश्चिमेला खेळाडूंना सर्व सोयी सुविधा युक्त असलेले भव्य क्रिडांगण उपलब्ध नाही. हे क्रीडांगण तयार करण्यात यावे अशी मागणी शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी विधी मंडळ अधिवेशनात केली आहे. आैचित्याचा मुद्दा उपस्थित करीत भोईर यांनी ही मागणी केली आहे.

कल्याण पश्चिमेतून अनेक खेळाडून विविध खेळाकरीता खेळत असतात. त्यांच्याकडून सराव सुरु असतो. तसेच ते विविध खेळात प्राविण्य मिळवितात. या खेळाडूंकरीता भव्य क्रिडांगणाची साेय नाही. सुभाष मैदान महापालिकेनजीक आहे. ते नागरीकासाठी आरक्षित आहे. तर फडके मैदान आहे. त्याठिकाणी वर्षभरा विविध सभा आणि कार्यक्रम सुरु असतात. उंबर्डे या ठिकाणी क्रिडांगण तयार करण्यात यावे. याठिकाणी दफनभूमी आणि कोंडवाड्याकरीता जागा उपलब्ध होती. या जागेच्या आरक्षणात बदल करुन त्याठिकाणी ती जागा क्रिडांगणाकरीता उपलब्ध करुन द्यावी. आरक्षण बदलाचा ठराव महापालिकेने महासभेत मंजूर करुन तो नगररचना विभागाकडे दिली आहे. या आरक्षणात बदल करावा. तालुका तिथे क्रिडांगण हे सरकारचे धोरण आहे. त्या धोरणाला अनुसरुन क्रिडांगण तयार करण्यात यावे अशी मागणी काल आमदार भोईर यांनी केली आहे.

त्याचबरोबर भूमीपुत्रांच्या गावठाण जमिनीच्या विस्ताराचा मुद्दा आमदार भोईर यांनी उपस्थित केला. कल्याण, ठाणे, रायगड या परिसरातील भूमीपुत्रांच्या गावठाण जमिनीचा विस्तार गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. जो अद्यापही झालेला नाही. यामुळे अनेक गावठाण भागातील भूमीपुत्रांना भाड्याने कुठेतरी घर घेऊन राहावे लागते. स्थानिक भूमीपुत्र बेघर होत चालला आहे. याचा सारासार विचार करून राज्य सरकारने गावठाण जमिनीचा विस्तार करावा अशी मागणी आमदार भोईर यांनी केली आहे. कल्याण शहरातील वन विभागाचा भाग सध्याच्या अहवालानुसार काही प्रमाणात महसूल विभागाच्या अख्त्यारीत येतो. समन्वया अभावी संबंधित क्षेत्रावर अद्यापही वन विभागाची देखरेख आहे. दरम्यान या परिसरात गेल्या ४० ते ५० वर्षांपासून अडीच हजारहून अधिक कुटुंब घरे बांधून राहत आहेत. त्यांच्यावर भाविष्यात कारवाईची टांगती तलवार आहे. वन खात्याचे मंत्री सुधीर मनुगंटीवर आणि महसूल विभागाने संबंधित कुटुंबीयांना कोणत्या तरी योजने अंतर्गत दिलासा द्यावा. ते राहत असलेली घरे कायम स्वरूपी व्हावीत यासाठी पाऊले उचलवीत याकडे सरकारचे आमदार भोईर यांनी लक्ष वेधले आहे.

टॅग्स :kalyanकल्याण