शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण पश्चिमेला क्रिडा संकुल तयार करावे; विश्वनाथ भोईर यांची विधी मंडळ अधिवेशनात मागणी

By मुरलीधर भवार | Updated: July 26, 2023 17:51 IST

कल्याण पश्चिमेतून अनेक खेळाडून विविध खेळाकरीता खेळत असतात. त्यांच्याकडून सराव सुरु असतो.

कल्याण-कल्याण पश्चिमेला खेळाडूंना सर्व सोयी सुविधा युक्त असलेले भव्य क्रिडांगण उपलब्ध नाही. हे क्रीडांगण तयार करण्यात यावे अशी मागणी शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी विधी मंडळ अधिवेशनात केली आहे. आैचित्याचा मुद्दा उपस्थित करीत भोईर यांनी ही मागणी केली आहे.

कल्याण पश्चिमेतून अनेक खेळाडून विविध खेळाकरीता खेळत असतात. त्यांच्याकडून सराव सुरु असतो. तसेच ते विविध खेळात प्राविण्य मिळवितात. या खेळाडूंकरीता भव्य क्रिडांगणाची साेय नाही. सुभाष मैदान महापालिकेनजीक आहे. ते नागरीकासाठी आरक्षित आहे. तर फडके मैदान आहे. त्याठिकाणी वर्षभरा विविध सभा आणि कार्यक्रम सुरु असतात. उंबर्डे या ठिकाणी क्रिडांगण तयार करण्यात यावे. याठिकाणी दफनभूमी आणि कोंडवाड्याकरीता जागा उपलब्ध होती. या जागेच्या आरक्षणात बदल करुन त्याठिकाणी ती जागा क्रिडांगणाकरीता उपलब्ध करुन द्यावी. आरक्षण बदलाचा ठराव महापालिकेने महासभेत मंजूर करुन तो नगररचना विभागाकडे दिली आहे. या आरक्षणात बदल करावा. तालुका तिथे क्रिडांगण हे सरकारचे धोरण आहे. त्या धोरणाला अनुसरुन क्रिडांगण तयार करण्यात यावे अशी मागणी काल आमदार भोईर यांनी केली आहे.

त्याचबरोबर भूमीपुत्रांच्या गावठाण जमिनीच्या विस्ताराचा मुद्दा आमदार भोईर यांनी उपस्थित केला. कल्याण, ठाणे, रायगड या परिसरातील भूमीपुत्रांच्या गावठाण जमिनीचा विस्तार गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. जो अद्यापही झालेला नाही. यामुळे अनेक गावठाण भागातील भूमीपुत्रांना भाड्याने कुठेतरी घर घेऊन राहावे लागते. स्थानिक भूमीपुत्र बेघर होत चालला आहे. याचा सारासार विचार करून राज्य सरकारने गावठाण जमिनीचा विस्तार करावा अशी मागणी आमदार भोईर यांनी केली आहे. कल्याण शहरातील वन विभागाचा भाग सध्याच्या अहवालानुसार काही प्रमाणात महसूल विभागाच्या अख्त्यारीत येतो. समन्वया अभावी संबंधित क्षेत्रावर अद्यापही वन विभागाची देखरेख आहे. दरम्यान या परिसरात गेल्या ४० ते ५० वर्षांपासून अडीच हजारहून अधिक कुटुंब घरे बांधून राहत आहेत. त्यांच्यावर भाविष्यात कारवाईची टांगती तलवार आहे. वन खात्याचे मंत्री सुधीर मनुगंटीवर आणि महसूल विभागाने संबंधित कुटुंबीयांना कोणत्या तरी योजने अंतर्गत दिलासा द्यावा. ते राहत असलेली घरे कायम स्वरूपी व्हावीत यासाठी पाऊले उचलवीत याकडे सरकारचे आमदार भोईर यांनी लक्ष वेधले आहे.

टॅग्स :kalyanकल्याण