शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

कळव्यातील AC ऐवजी साध्या लोकल पूर्ववत होणार; रेल्वे प्रशासनाचं आश्वासन

By अनिकेत घमंडी | Updated: August 24, 2022 18:54 IST

गेल्या काही दिवसांपासून ऐन गर्दीच्या वेळी सकाळी आणि सायंकाळी असलेल्या साध्या लोकल एसी लोकलमध्ये बदलण्यात आल्याचे दिसून आले आहे.

अनिकेत घमंडी

डोंबिवली: गेल्या काही दिवसांपासून साध्या लोकल बंद करून सुरू करण्यात आलेल्या एसी लोकलमुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे. त्याची दखल घेत  खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांचीभेट घेत त्यावर तोडगा काढण्याची मागणी केली. त्यावेळी झालेल्या चर्चेत एसीऐवजी साध्या लोकल रेल्वे प्रशासनपूर्ववत करेल, असे आश्वासन यावेळी लाहोटी यांनी दिले.  याप्रसंगी रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल, शिवसेनेचे नेते आणि प्रवासी संघटनेचेपदाधिकारी उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपासून ऐन गर्दीच्या वेळी सकाळी आणि सायंकाळी असलेल्या साध्या लोकल एसी लोकलमध्ये बदलण्यात आल्याचे दिसूनआले आहे. या प्रकारामुळे सुरूवातीला कळवा आणि नंतर बदलापूर रेल्वे स्थानकात प्रवाशांनी आंदोलन केले. गर्दीच्या वेळी एक साधी लोकलएसी केल्याने सर्वसामान्य प्रवाशांना एसी लोकलमधून प्रवास करता येत नाही. त्यांना त्यामागच्या असलेल्या गर्दीच्या लोकलमध्ये शिरून प्रवासकरावा लागतो आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवासी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांचे हाल होत आहेत. त्यामुळे प्रवासी संताप व्यक्त करत आहे. प्रवाशांचा या संतापाचे उद्रेकात रूपांतर होण्यापूर्वी प्रवाशांच्या मागणीनुसार रेल्वे प्रशासनाने तातडीने तोडगा काढण्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच गर्दीच्या वेळी सुरू असलेल्याकोणत्याही सध्या लोकल बंद करू नये. त्याचा प्रवाशांच्या गर्दीवर परिणाम होईल, अशी भूमिका डॉ. शिंदे यांनी यावेळी मांडली. त्यामुळे ज्यासाध्या लोकल बंद केल्या आहेत त्या पूर्ववत कराव्यात अशी आग्रही मागणी त्यांनी केली. सोबतच लोकल सुरू करत असताना पूर्णलोकल एसी करण्यापेक्षा एका लोकलमध्ये निम्मे डब्बे साधे आणि निम्मे डब्बे एसी करता येतील का याचीही चाचपणी करावी, अशी सूचना यावेळी शिंदेंनीकेली. एसी लोकलचे भाडे कमी करून प्रवाशांना प्रोत्साहन द्या, अशीही सूचना यावेळी त्यांनी यात कळवा कारशेडमधून निघणारी लोकल कळवा स्थानकात थांबवावी, यावर चर्चा झाली. बदलापूर  रेल्वे स्थानकात सुरू  असलेल्या होमप्लॅटफॉर्मचे काम तातडीने पूर्ण करावे, कल्याण स्थानकात पूर्व भागात लोकग्रामच्या दिशेने तिकीट घराजवळ स्वयंचलित जिना आणिस्वच्छतागृह उभारावे, डोंबिवली स्थानकातील स्वच्छता या मागणीचा समावेश होता. यावेळी उपस्थित प्रवासी संघटनेच्या सदस्यांनी दिवास्थानकात फेस्टिव्हल स्पेशल मेल - एक्स्प्रेस गाड्याना थांबा मिळण्यासाठी फलाट क्रमांक सात आणि आठची रुंदी किमान २२ डब्यांपर्यंतवाढवावी ही मागणी करण्यात आली. या सर्व मागण्यांचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करून त्यावर तातडीने निर्णय घेतले जातील, असे लाहोटी म्हणाले. 

कळवा मुंब्रा येथील प्रवाशांच्या याच अडचणींसंदर्भात आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही मंगळवारी डीआरएम गोयल यांची भेट घेत जर समस्या सुटल्या नाही तर मात्र जन आंदोलन पेटेल, त्याची जबाबदारी रेल्वेची राहील असा जाहीर इशारा दिला.

टॅग्स :AC localएसी लोकल