शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

पगार वेळेत न दिल्याने कचरा उचलणाऱ्या ठेकेदार कंपनीवर कारवाईची टांगती तलवार

By मुरलीधर भवार | Updated: October 14, 2023 23:27 IST

केडीएमसीची अंतिम कारवाई प्रस्तावित

मुरलीधर भवार, कल्याण: कल्याण डोंबिली महापालिका हद्दीतील कचरा उचलण्यासाठी नेमण्यात आलेल्या ठेकादार कंपन्याकडून कामगारांना वेळेवर वेतन दिले जात नाही. दिले जाणारे वेतन अपुरे आहे. किमान वेतन नाही. या प्रकरणी महापालिकेने कायदेशीर बाबी तपासून ठेकेदारकंपन्यांच्या विरोधात अंतिम कारवाई प्रस्तावित केली आहे अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी दिली आहे. तसेच ठेकेदार कंपन्यांना कामाचे बिल दिले जाते. त्या बिलाच्या रक्कमेतून काही रक्कम कपात करुन महापालिकेकडे जमा ठेवण्यात आलेली आहे. या कंपन्यांची नावे आर अँड बी इन्फ्रा प्रोजेक्ट आणि सेक्युअर वन सिक्युरीटी सर्व्हिसेस अशी आहेत.

महापालिकेच्या ब. क. जे आणि ड प्रभाग क्षेत्रातील येथे कचरा उचलण्याचे काम आर अँड बी इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. या ठेकेदार कंपनीला दिले आहे. इतर प्रभागात दैनंदिन स्वच्छता तसेच कचरा उचलण्याचे कामम सेक्युअर वन सिक्युरीटी सर्व्हिसेस या कंपनीला दिले आहे. महापालिकेने या दोन्ही ठेकेदार कंपन्यासोबत केलेल्या करारनाम्यानुसार ठेकेदार ज्या कामगारांकडून काम करुन घेतो. त्यांना वेळेत पगार दिला पाहिजे. त्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन आणि नियमानुसार देय भत्ते दिले पाहिजेत. महापालिका ठेकेदाराच्या कामाची बिले वेळेवर काढते. मात्र ठेकेदाराकडून कामगारांना वेळेत पगार दिला जात नाही. तसेच किमान वेतन कायद्यानुसार २४ हजार ५०० रुपये पगार प्रत्येक कामगाराला दिला पाहिजे. मात्र प्रत्येक कामगाराला १२ हजार रुपये पगार तोही वेळेवर मिळत नाही.

प्रत्येक कामगारांचे दर महिन्याला १२ हजार रुपयांची मलई कोण खाते असा प्रश्न मनसेच्या कामगार संघटनेसह मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यानी उपस्थित केला होता. मनसे कामगार संघटनचे पदाधिकारी राजेश उज्जैनकर यांनी या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ११ आ’क्टोबर रोजी कामगारांनी काम बंद आंदोलन केले होते. या पश्चात महापालिका प्रशासन खळबळून जागे झाले. महापालिकेने अतिम कारवाई प्रस्तावित केली असल्याने ठेकेदार कंपन्यांनी कामगारांना आत्तापर्यंत किमान वेतन कायद्यानुसार न दिलेल्या पगाराची वसूली होऊ शकते. अथवा महापालिका त्याच्या बिलातून कपात केलेली रक्कम कामगारांना वळती करु शकते. या दोन्ही शक्यता या कारवाईतून फलित झाल्या नाहीत तर ठेकदार कंपनीचे कंत्राट रद्द केले जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

यापूर्वी महापालिकेने अ’न्थोनी वेस्ट ह’ण्डलिंग कंपनीला कचरा उचलण्याचा ठेका दिला हाेता. तो देखील वादग्रस्त ठरला होता. तो ठेका महापालिकेने रद्द केला होता. आत्ता कचरा उचलणाऱ््या दोन्ही ठेकेदार कंपन्या कामगाराना वेळेत पगार न देणे, किमान वेतन न देणे या कारणावरुन गोत्यात आल्या आहेत. महापालिका पुढील अंतिम कार्यवाही काय करते याकडे मनसेसह कामगारांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :kalyanकल्याण