शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

अमूदान स्फोट प्रकरणी गुन्हा दाखल करुन कंपनी स्थलांतरीत करावी, हक्क संरक्षण संघर्ष समितीची मागणी

By मुरलीधर भवार | Updated: May 30, 2024 17:07 IST

या मागणी संदर्भात संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांच्या शिष्टमंडळाने आज अमूदान कंपनीच्या घटनास्थळी जाऊन भेट दिली.

डोंबिवली- डोंबिवली एमआयडीसीतील अमूदान कंपनीत स्फोट झाला. या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला. ६४ जण जखमी झाले. या प्रकरणी कंपनी मालकाच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. ही कंपनी स्थलांतरीत करण्यात यावी अशी मागणी २७ गाव सर्व पक्षीय संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

या मागणी संदर्भात संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांच्या शिष्टमंडळाने आज अमूदान कंपनीच्या घटनास्थळी जाऊन भेट दिली. त्याचबरोबर मानपाडा पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि डोंबिवली एमआयडीसी कार्यालयातील अभियंत्याची भेट घेऊन त्यांना एक निवेदन सादर केले. याप्रसंगी समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार यांच्यासह पदाधिकारी एकनाथ पाटील, गजानन मागरूळकर, भास्कर पाटील, दत्ता वङो, बाळाराम ठाकूर, विजय पाटील, अभिमन्यू म्हात्रे, जितेंद्र ठाकूर, बंडू पाटील, वासुदेव पाटील, जालिंदर पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी उपाध्यक्ष वझे यांनी सांगितले की, डोंबिवलीतील एमआयडीसीमध्ये आठ वर्षापूर्वी असाच भीषण स्फोट प्रोबेस कंपनीत झाला होता. त्यानंतर आत्ता अमूदान कंपनीत भीषम स्फोट झाला. या पूर्वी याठिकाणी कंपनीला भीषण आग लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत. एमआयडीसी परिसराला लागून नागरी वस्ती आहे. त्यात प्रामुख्याने दावडी, गोळवली, सोनारपाडा, सागाव आदी गावेही ही आहेत. या भागातील धोकादायक आणि अतिधोकादायक कंपन्या अन्यत्र हलविण्यात याव्यात. त्या जागेत आयटी आणि इंजिनिअरिंगच्या कंपन्या सुरु करण्यात याव्यात. या ठिकाणी आयटी हब सुरु केल्यास तरुणाईला रोजगाराच्या संधी मिळतील.

सरकारकडून यापूर्वीही धोकादायक कंपन्या स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. संघर्ष समितीची मागणी आहे की, धोकादायक कंपन्या स्थलांतरीत करण्यात याव्यात येत्या पंधरा दिवसात पुन्हा एमआयडीसीच्या अधिकारी वर्गासोबत संघर्ष समिती बैठक घेणार आहे. कामा या कारखानदारी संघटनेशीची संघर्ष समिती चर्चा करणार आहे. कंपन्या स्थलांतरीत केल्या नाही तर समितीच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा वझे यांनी दिला आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीBlastस्फोट