शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

अमूदान स्फोट प्रकरणी गुन्हा दाखल करुन कंपनी स्थलांतरीत करावी, हक्क संरक्षण संघर्ष समितीची मागणी

By मुरलीधर भवार | Updated: May 30, 2024 17:07 IST

या मागणी संदर्भात संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांच्या शिष्टमंडळाने आज अमूदान कंपनीच्या घटनास्थळी जाऊन भेट दिली.

डोंबिवली- डोंबिवली एमआयडीसीतील अमूदान कंपनीत स्फोट झाला. या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला. ६४ जण जखमी झाले. या प्रकरणी कंपनी मालकाच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. ही कंपनी स्थलांतरीत करण्यात यावी अशी मागणी २७ गाव सर्व पक्षीय संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

या मागणी संदर्भात संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांच्या शिष्टमंडळाने आज अमूदान कंपनीच्या घटनास्थळी जाऊन भेट दिली. त्याचबरोबर मानपाडा पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि डोंबिवली एमआयडीसी कार्यालयातील अभियंत्याची भेट घेऊन त्यांना एक निवेदन सादर केले. याप्रसंगी समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार यांच्यासह पदाधिकारी एकनाथ पाटील, गजानन मागरूळकर, भास्कर पाटील, दत्ता वङो, बाळाराम ठाकूर, विजय पाटील, अभिमन्यू म्हात्रे, जितेंद्र ठाकूर, बंडू पाटील, वासुदेव पाटील, जालिंदर पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी उपाध्यक्ष वझे यांनी सांगितले की, डोंबिवलीतील एमआयडीसीमध्ये आठ वर्षापूर्वी असाच भीषण स्फोट प्रोबेस कंपनीत झाला होता. त्यानंतर आत्ता अमूदान कंपनीत भीषम स्फोट झाला. या पूर्वी याठिकाणी कंपनीला भीषण आग लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत. एमआयडीसी परिसराला लागून नागरी वस्ती आहे. त्यात प्रामुख्याने दावडी, गोळवली, सोनारपाडा, सागाव आदी गावेही ही आहेत. या भागातील धोकादायक आणि अतिधोकादायक कंपन्या अन्यत्र हलविण्यात याव्यात. त्या जागेत आयटी आणि इंजिनिअरिंगच्या कंपन्या सुरु करण्यात याव्यात. या ठिकाणी आयटी हब सुरु केल्यास तरुणाईला रोजगाराच्या संधी मिळतील.

सरकारकडून यापूर्वीही धोकादायक कंपन्या स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. संघर्ष समितीची मागणी आहे की, धोकादायक कंपन्या स्थलांतरीत करण्यात याव्यात येत्या पंधरा दिवसात पुन्हा एमआयडीसीच्या अधिकारी वर्गासोबत संघर्ष समिती बैठक घेणार आहे. कामा या कारखानदारी संघटनेशीची संघर्ष समिती चर्चा करणार आहे. कंपन्या स्थलांतरीत केल्या नाही तर समितीच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा वझे यांनी दिला आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीBlastस्फोट