शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कल्याणच्या एनआरसी कॉलनी परिसरात मोठा स्फोट!

By मुरलीधर भवार | Updated: February 16, 2024 15:51 IST

नागरीकांच्या जिवीताला धोका असल्याने ब्लास्टींग थांबविले नाही तर या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

कल्याण : मोहने आंबिवली परिसरातील एनआरसी कॉलनी काल सायंकाळी सात वाजताच्या सुमारास मोठा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की त्यामुळे मोहने, आंबिवली, तिपन्नानगर, एनआरसी कॉलनी परिसरातील नागरीकांच्या घरांना मोठे हादरे बसले. या घटनेमुळे नागरीक भयभीत झाले आहे. ब्लास्ट करणाऱ्या विकासकाच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी केली आहे. नागरीकांच्या जिवीताला धोका असल्याने ब्लास्टींग थांबविले नाही तर या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

काल सायंकाळी सात वाजता एनआरसी कॉलनी परिसरात मोठा ब्लास्ट झाला. त्यामुळे नागरीकांच्या घरांना हादरे बसले. नागरीकांनी भयभीत होऊन घराबाहेर आले. या प्रकरणी नागरीकांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडे हा प्रकार कथीत केला. त्यांनी स्थानिक माजी नगरसेवक पाटील यांना सूचित केले. माजी नगरसेवक पाटील यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थली जाऊन पाहणी केली. माजी नगरसेवक पाटील यांनी आरोप केला आहे की, एनआरसी कंपनीची जागा लिलावात अदानी उद्योग समूहाने घेतली आहे. या उद्योग समूहाकडून त्याठिकाणी विकासाचे काम सुरु आहे. त्यासाठी हे ब्लास्ट केले जातात. त्यामुळे नागरीकांचा जिवितास धोका निर्माण झाला आहे. 

नागरीक भयभीत झाले आहे. महापालिकेने एनआरसी कॉलनीतील घरे धोकादायक असल्याचे सांगितले. ती घरे पाडली जात आहे. कामगारांची थकीत देणी एनआरसीकडून मिळालेली नाही. थकीत देण्याचा विषय न्यायप्रविष्ट आहे. अशा परिस्थिती विकासकाने ब्लास्टींग करीत आहे. हे ब्लास्टींग बेकायदेशीर असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री, महसूल मंत्री, जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे मागणी करण्यात येणार आहे.

या परिसरातील नागरीकांनी सांगितले की, महापालिकेने एनआरसी कॉलनीतील घरांना नोटिसा लावल्या. घरे धोकादायक असल्याचे सांगितले. त्या नोटिसमध्ये अदानीने पर्यायी घरे द्यावीत असे म्हटले होते. त्यांच्याकडून पर्यायी घरांची व्यवस्था न करता त्यांना वाटेला लावण्याचा प्रकार केला आहे. ज्या घरात नागरीक राहत आहे. त्यांना या ब्लास्टिंगचा हादरा बसल्याने ते नागरीक घाबरले आहेत. हे प्रकार थांबविले गेले नाहीत नागरीक रास्ता रोको आणि प्रसंगी रेल रोको आंदोलन करतील असा इशारा दिला आहे. या संदर्भात कंपनीचे प्रवक्ते यांनी सांगितले की, एनआरसी कंपनीज्या जागेत लॉजिस्टिक पार्क उभारला जात आहे. त्याकरीता हा ब्लास्टींग केले जात आहे. ब्लास्टींगसाठी लागणारी परवानगी सरकारी यंत्रणांकडून घेण्यात आली आहे. 

टॅग्स :kalyanकल्याण