शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये इमारतीसाठी खाेदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून १२ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

By मुरलीधर भवार | Updated: March 25, 2023 15:19 IST

कैलासनगरात राहणारा रेहान शेख हा आज सकाळी शाळेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडला. ताे शाळेत गेला नाही.

कल्याण : शहराच्या पूर्वभागातील कैलासनगरात एका इमारतीसाठी खाेदलेल्या खड्डयातील पाण्यात बुडून १२ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली आहे. खड्ड्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव रेहान शेख असे आहे. त्याच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

कैलासनगरात राहणारा रेहान शेख हा आज सकाळी शाळेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडला. ताे शाळेत गेला नाही. त्या परिसरात असलेल्या माेकळ्या जागेवर खेळण्यासाठी गेला. रेहान ज्या ठिकाणी खेळत हाेता. त्याच ठिकाणी एका बिल्डरने इमारतीसाठी माेठ्ठा खड्डा खाेदला आहे. या खडड्यात पाणी साचलेले आहे. रेहान खेळत असताना त्याचा बाॅल त्या खड्ड्यातील पाण्यात गेला. हा बाॅल काढण्यासाठी रेहान खड्ड्याच्या दिशेने गेला.  बाॅल काढण्याचा प्रयत्न करीत असताना त्याचा ताेल जाऊन ताे साचलेल्या पाण्याच्या खड्ड्यात पडला. त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. काही नागरीकांचे याकडे लक्ष गेल्याने त्यांनी तात्काळ घटनास्थळी घाव घेतली. घडलेल्या घटनेची माहिती तात्काळ अग्नीशमन दलास दिली. अग्नीशमन दलाने घटनास्थली धाव घेतली. रेहानचा मृतदेह शाेधण्यास सुरुवात केली. अवघ्या एका तासाच रेहानचा मृतदेह अग्नीशमन दलाच्या जवानांच्या हाती लागला आहे. त्याचा मृतदेह शवविच्छदेनासाठी महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात  पाठविण्यात आला आहे.

पाण्याने भरलेल्या खड्ड्यात गाळ हाेता. त्या गाळात रुतल्याने रेहानला बाहेर येता आले नाही. त्याचा बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती स्थानिक नागरीकांनी दिली आहे. इमारतीसाठी खड्डा खाेदणाऱ्या बिल्डरने त्याठिकाणी सुरक्षिततेची काेणतीही उपाययाेजना केली नाही. साधी संरक्षक भिंत देखील बांधण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे या ठिकाणी भविष्यातही अशा प्रकारच्या जीवघेण्या घटना घडू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरीकांच्या जिविताशी खेळणाऱ्या बिल्डरच्या निष्काळजीपणामुळेच रेहानचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रेहानच्या मृत्यूस संबंधित बिल्डर जबाबदार असून त्याच्या विराेधात कारवाई केली जावी अशी स्थानिक नागरीकांची मागणी आहे.