शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

दाेन महिन्यांत तयार केला ७०० टनांचा गर्डर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 12:12 IST

रिषी अग्रवाल यांची माहिती

मुरलीधर भवारकल्याण : शंभर वर्षे जुना ब्रिटिशकालीन कल्याणचा पत्रीपूल हा वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याने तो पाडण्यात आला. हा पूल नव्याने तयार करण्यासाठी त्याचा भला मोठा गर्डर तयार करण्याचे काम हैदराबाद येथील ग्लोबल स्टील कंपनीला देण्यात आले. दिवसरात्र एक करून कंपनीने अवघ्या दोन महिन्यांत ७०० टन वजनाचा ७६ मीटर लांबीचा भला मोठा गर्डर तयार केला.  अनेक अडचणींवर मात करून या गर्डरचे लाॅंंचिंग सुरू आहे. कंपनीसाठी ही अभिमानाची बाब असल्याचे ग्लोबल कंपनीचे प्रमुख रिषी अग्रवाल यांनी सांगितले.

कल्याण रेल्वेवरील पत्रीपुलाचे पाडकाम केल्यावर नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत हाेता. कंत्राट मिळालेल्या ग्लोबल कंपनीतील ५० कामगारांनी राबून गर्डर बनवला. ताे हैदराबाद येथून कल्याणला आणायचा, ताेच मार्चमध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन झाले. पत्रीपुलाच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तेलंगणा सरकारकडे मागणी करून गर्डर कल्याणला नेण्याची विशेष परवानगी मिळवली. त्यानंतर विशेष वाहनांची सोय करून ताे येथे आणण्यात आल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. ग्लोबल कंपनीने आतापर्यंंत १५ गर्डर तयार केले आहेत.  मुंबई-दहिसर मेट्रोच्या कामात व जेएनपीटी येथे लागणारे गर्डरही या कंपनीने बनवले आहेत.

किमान १०० वर्षे आयुष्यओपन वेब असलेला भला मोठा गर्डर असून त्यासाठी सीएनसी कटिंग, सीएनसी ड्रिलिंग आणि सीएनसी वेल्डिंग केलेले आहे. जवळपास २५ किलोमीटरचे वेल्डिंग केलेले आहे. गर्डरसाठी ई-५३ ग्रेडचे स्टील वापरलेले आहे. २६ हजार बोल्टचा वापर केला आहे. त्यासाठी युरोपियन मशिनरीचा वापर करण्यात आला आहे. या पुलाचे आयुष्य किमान शंभरपेक्षा अधिक वर्षांचे आहे. गर्डर कमी वेळेत तयार करण्याचे आव्हान आमच्या कामगारांनी दिवसरात्र राबून पेलले, असे अग्रवाल म्हणाले.

 

टॅग्स :thaneठाणे