शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

४५ कोटीचे टेंडर सक्षम नसलेल्या कंपन्याना ? जयभारत कंन्स्ट्रक्शन कंपनीचा आरोप, केडीएमसी आयुक्तांकडे केली तक्रार

By मुरलीधर भवार | Updated: April 19, 2023 18:46 IST

या प्रकरणाची आयुक्तांनी चौकशी करण्याची मागणी चंदांनी यांनी केली आहे.

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेने रस्त्यावरील खड्डे आणि चरी भरण्याच्या कामासाठी ४५ कोटीच्या निविदा मागविल्या होत्या. ही निविदा प्रक्रिया राबविताना काम करण्यास सक्षम नसलेल्या कंपन्या हे काम दिले आहे. जी कंपनी काम करण्यास सक्षम आहे. त्या कंपनीला निविदा प्रक्रियेतून बाद केल्याचा गंभीर आारोप जयभारत कन्स्ट्रक्शन या कंपनीने केला आहे. या प्रकरणी कंपनीच्या वतीने अमित चंदानी यांनी महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे तक्रार केली आहे. या प्रकरणाची आयुक्तांनी चौकशी करण्याची मागणी चंदांनी यांनी केली आहे.

महापालिका हद्दीतील रस्त्यावरील खड्डे आणि चरी भरण्याच्या कामासाठी प्रशासनाकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. या निविदा ४५ कोटी रुपये खर्चाच्या होत्या. त्या ११ पार्टमध्ये होत्या. त्यापैकी सात निविदा ओपन केल्या. त्यामध्ये पाच कंपन्यांना काम दिले गेले. प्रथम निविदा तांत्रिक दृष्टय़ा ओपन करण्यात आल्या होत्या. ज्या कंपन्या काम करण्यास अपात्र आहे. त्यात कंपन्या या निविदा प्रक्रियेत सहभागी झाल्या. त्यांना काम दिले गेले आहे. अवघ्या एका तासात फायनाशियल बीड ओपन करण्यात आले. हरकती घेण्यासाठी वेळ द्यावा लागतो. त्या करीता पुरेसा वेळ दिलेला नाही. सहभागी झालेल्या कंपनीपैकी एक व्यक्ति दोन कंपन्यांचा मालक आहे. केंद्राने टेंडर संदर्भात दिलेल्या निकषानुसार एकच व्यक्ती दोन कंपन्यांचा मालक असल्यास त्याला निविदा प्रक्रियेत सहभागी होता येत नाही. तो सहभागी झाल्यास तो बाद ठरु शकतो. केंद्राने दिलेल्या निकषांना सुद्धा निविदा प्रक्रिया पार पाडताना फाटा देण्यात आला आहे. या विविध मुद्यांकडे तक्रारदार चंदानी यांनी लक्ष वेधले आहे.

दरम्यान यासंदर्भात शहर अभियंता अजरून अहिरे यांनी सांगितले की, चंदनी यांची तक्रार आामच्याकडे प्राप्त झालेली आहे. निविदा ओपन केल्या आहेत. मात्र संबंधित कंत्रट कंपन्याचे प्लांट आणि मशिनरी आहेत की नाही याची खात्री करण्यासाठी आर्डर काढल्या आहेत. त्याची खात्री केल्याशिवाय काम दिले जाणार नाही.