शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

४५ कोटीचे टेंडर सक्षम नसलेल्या कंपन्याना ? जयभारत कंन्स्ट्रक्शन कंपनीचा आरोप, केडीएमसी आयुक्तांकडे केली तक्रार

By मुरलीधर भवार | Updated: April 19, 2023 18:46 IST

या प्रकरणाची आयुक्तांनी चौकशी करण्याची मागणी चंदांनी यांनी केली आहे.

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेने रस्त्यावरील खड्डे आणि चरी भरण्याच्या कामासाठी ४५ कोटीच्या निविदा मागविल्या होत्या. ही निविदा प्रक्रिया राबविताना काम करण्यास सक्षम नसलेल्या कंपन्या हे काम दिले आहे. जी कंपनी काम करण्यास सक्षम आहे. त्या कंपनीला निविदा प्रक्रियेतून बाद केल्याचा गंभीर आारोप जयभारत कन्स्ट्रक्शन या कंपनीने केला आहे. या प्रकरणी कंपनीच्या वतीने अमित चंदानी यांनी महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे तक्रार केली आहे. या प्रकरणाची आयुक्तांनी चौकशी करण्याची मागणी चंदांनी यांनी केली आहे.

महापालिका हद्दीतील रस्त्यावरील खड्डे आणि चरी भरण्याच्या कामासाठी प्रशासनाकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. या निविदा ४५ कोटी रुपये खर्चाच्या होत्या. त्या ११ पार्टमध्ये होत्या. त्यापैकी सात निविदा ओपन केल्या. त्यामध्ये पाच कंपन्यांना काम दिले गेले. प्रथम निविदा तांत्रिक दृष्टय़ा ओपन करण्यात आल्या होत्या. ज्या कंपन्या काम करण्यास अपात्र आहे. त्यात कंपन्या या निविदा प्रक्रियेत सहभागी झाल्या. त्यांना काम दिले गेले आहे. अवघ्या एका तासात फायनाशियल बीड ओपन करण्यात आले. हरकती घेण्यासाठी वेळ द्यावा लागतो. त्या करीता पुरेसा वेळ दिलेला नाही. सहभागी झालेल्या कंपनीपैकी एक व्यक्ति दोन कंपन्यांचा मालक आहे. केंद्राने टेंडर संदर्भात दिलेल्या निकषानुसार एकच व्यक्ती दोन कंपन्यांचा मालक असल्यास त्याला निविदा प्रक्रियेत सहभागी होता येत नाही. तो सहभागी झाल्यास तो बाद ठरु शकतो. केंद्राने दिलेल्या निकषांना सुद्धा निविदा प्रक्रिया पार पाडताना फाटा देण्यात आला आहे. या विविध मुद्यांकडे तक्रारदार चंदानी यांनी लक्ष वेधले आहे.

दरम्यान यासंदर्भात शहर अभियंता अजरून अहिरे यांनी सांगितले की, चंदनी यांची तक्रार आामच्याकडे प्राप्त झालेली आहे. निविदा ओपन केल्या आहेत. मात्र संबंधित कंत्रट कंपन्याचे प्लांट आणि मशिनरी आहेत की नाही याची खात्री करण्यासाठी आर्डर काढल्या आहेत. त्याची खात्री केल्याशिवाय काम दिले जाणार नाही.