शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

कल्याण तालुक्यातील ३७० एकर जमीन सरकारजमा; प्रांताधिकाऱ्यांचे आदेश

By मुरलीधर भवार | Updated: August 2, 2022 18:00 IST

१५ वर्षांपासून सरकार दरबारी प्रलंबित असलेले प्रकरण निकाली

कल्याण: कल्याण तालुक्यातील कांबा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ३७० एकर जमीन सरकार जमा करण्यात आली आहे. हा निकाल कल्याणचे प्रांत अधिकारी अभिजीत भांडे पाटील यांनी दिला. हे प्रकरण गेल्या १५ वर्षापासून सरकार दरबारी प्रलंबित होते. ही जागा इनामी होती. ही जागा शहा कंपनीने खरेदी केली होती. शहा कंपनीच्या विरोधात देवरा सुरोशे अन्य यांचा वाद सुरु होता. सुरोशे यांनी दावा केला होता की, शहा हा शेतकरीच नाही. त्याचा हा वाद प्रांत अधिकारी कार्यालयात सुरु होता. त्यात त्यांनी बरेच कागदपत्र सादर केले होते. तसेच या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

उच्च न्यायालयाने या प्रकरणी कागदपत्रे तपासून शहा कंपनीने खरेदी केलेली जमीन सरकार जमा करण्यात यावी असे म्हटले होते. त्याची पुन्हा एकदा सुनावणी कल्याण तहसीलदार आाणि प्रांत कार्यालयात करण्यात यावी. न्यायालयाच्या आदेशानुसार कल्याणचे प्रांत भांडे पाटील यांनी याची पुन्हा एकदा सुनावणी घेतली. पुन्हा कागदपत्रे तपासली. त्यात शहा कंपनी जे जमीन खरेदीदार होते. त्यांनी ते शेतकरी असल्याचा पुरावा सादर केला नाही. या एकाच मुद्याच्या आधारे न्यायालयाच्या आदेशानुसार प्रांत अधिका:यांनी शहा यांनी खरेदी केलेली 370 एकर जमीन सरकार जमा करण्याचा निकाल दिला.

दरम्यान, शहा यांनी खरेदी केलेली जमीन अन्य काही लोकांना विकल्याची माहिती समोर आली आहे. प्रांत अधिका:यांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात शहा कंपनीला अतिरिक्त जिल्हाधिका:यांकडे दाद मागता येणार नाही. ते दाद मागू शकतात. त्यासाठी त्यांना राज्याच्या महसूल न्यायाधिकरणाकडे दाद मागण्याची मूभा आहे. इतकी मोठी 370 एकर जमीन सरकार जमा करण्याचा निर्णय महत्वपूर्ण मानला जात आहे. या जमीनीची किंमत कोटय़ावधी रुपये आहे. सध्या कल्याण तालुक्यातील म्हारळ, वरप, आणि कांबा परीसरात विविध बडय़ा बिल्डरांची गृहसंकुले सुरु आहेत. त्यादृष्टीने कांबा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कल्याण मुरबाड रस्त्यापासून जवळच असलेली 370 एकर जमीन ही महत्वाची होती.

टॅग्स :kalyanकल्याण