शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

कल्याण तालुक्यातील ३७० एकर जमीन सरकारजमा; प्रांताधिकाऱ्यांचे आदेश

By मुरलीधर भवार | Updated: August 2, 2022 18:00 IST

१५ वर्षांपासून सरकार दरबारी प्रलंबित असलेले प्रकरण निकाली

कल्याण: कल्याण तालुक्यातील कांबा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ३७० एकर जमीन सरकार जमा करण्यात आली आहे. हा निकाल कल्याणचे प्रांत अधिकारी अभिजीत भांडे पाटील यांनी दिला. हे प्रकरण गेल्या १५ वर्षापासून सरकार दरबारी प्रलंबित होते. ही जागा इनामी होती. ही जागा शहा कंपनीने खरेदी केली होती. शहा कंपनीच्या विरोधात देवरा सुरोशे अन्य यांचा वाद सुरु होता. सुरोशे यांनी दावा केला होता की, शहा हा शेतकरीच नाही. त्याचा हा वाद प्रांत अधिकारी कार्यालयात सुरु होता. त्यात त्यांनी बरेच कागदपत्र सादर केले होते. तसेच या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

उच्च न्यायालयाने या प्रकरणी कागदपत्रे तपासून शहा कंपनीने खरेदी केलेली जमीन सरकार जमा करण्यात यावी असे म्हटले होते. त्याची पुन्हा एकदा सुनावणी कल्याण तहसीलदार आाणि प्रांत कार्यालयात करण्यात यावी. न्यायालयाच्या आदेशानुसार कल्याणचे प्रांत भांडे पाटील यांनी याची पुन्हा एकदा सुनावणी घेतली. पुन्हा कागदपत्रे तपासली. त्यात शहा कंपनी जे जमीन खरेदीदार होते. त्यांनी ते शेतकरी असल्याचा पुरावा सादर केला नाही. या एकाच मुद्याच्या आधारे न्यायालयाच्या आदेशानुसार प्रांत अधिका:यांनी शहा यांनी खरेदी केलेली 370 एकर जमीन सरकार जमा करण्याचा निकाल दिला.

दरम्यान, शहा यांनी खरेदी केलेली जमीन अन्य काही लोकांना विकल्याची माहिती समोर आली आहे. प्रांत अधिका:यांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात शहा कंपनीला अतिरिक्त जिल्हाधिका:यांकडे दाद मागता येणार नाही. ते दाद मागू शकतात. त्यासाठी त्यांना राज्याच्या महसूल न्यायाधिकरणाकडे दाद मागण्याची मूभा आहे. इतकी मोठी 370 एकर जमीन सरकार जमा करण्याचा निर्णय महत्वपूर्ण मानला जात आहे. या जमीनीची किंमत कोटय़ावधी रुपये आहे. सध्या कल्याण तालुक्यातील म्हारळ, वरप, आणि कांबा परीसरात विविध बडय़ा बिल्डरांची गृहसंकुले सुरु आहेत. त्यादृष्टीने कांबा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कल्याण मुरबाड रस्त्यापासून जवळच असलेली 370 एकर जमीन ही महत्वाची होती.

टॅग्स :kalyanकल्याण