शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण पूर्वेतील १७ कुटुंबे गेल्या २२ वर्षापासून न्यायाच्या प्रतिक्षेत

By मुरलीधर भवार | Updated: October 14, 2022 15:40 IST

कल्याण-शहराच्या पूर्व भागातील सिद्धार्थनगरातील १७ घरे ही एकात्मिक शहर विकास आराखडा विकसीत करण्यासाठी बाधित झाली होती.

कल्याण-शहराच्या पूर्व भागातील सिद्धार्थनगरातील १७ घरे ही एकात्मिक शहर विकास आराखडा विकसीत करण्यासाठी बाधित झाली होती. ही घरे तोडण्यात आली. या १७ बाधितांना गेल्या २२ वर्षापासून अद्याप न्याय मिळालेला नाही. त्यांना बीएसयूपी योजने घरे देण्याची मागणी करण्यात आली.

महापालिकेने एकात्मिक शहर विकास आराखडा विकसीत करण्याचे काम १९९५ ते २००० या कालावधी हाती घेतले होते. या विकास कामात सिद्धार्थ नगरातील १७ कुटुंबे बाधित झाले. त्यांची घरे 2क्क्क् साली तोडण्यात आली होती. त्यावेळी तत्कालीन आयुक्त श्रीकांत सिंह यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली होती. या तोडू कारवाईच्या विरोधात बाधित कल्याण न्यायालयात गेले होते. कारवाई सुरु होण्यापूर्वीच न्यायालयाने जैसे थे असा आदेश दिला होता. महापालिका अधिकारी वर्गाकडून हा आदेश न जुमानता कारवाई केली गेली. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान महापालिकेकडून करण्यात आला होता. या बाधितांना पर्यायी जागा दिली जाईल असे महापालिका प्रशासनाकडून आश्वासीत केले गेले. मात्र त्यांना उंबर्डे येथे जागा दिली जाईल असे सांगितले गेले. ते राहत होते पूर्व भागात ते पश्चिम भागात जागा घेऊन काय करणार असा प्रश्न या बाधितांकडून उपस्थित केला गेला. एकात्मिक विकास आराखडय़ाअंतर्गत ज्या कारणासाठी ही घरे तोडली गेली. त्याठिकाणी रस्ताच विकसीत झाला नाही तर मग घरे का तोडली असा प्रश्न आहे. हे बाधित गेल्या २२ वर्षापासून न्यायाची मागणी करीत आहेत. ते न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. आत्ता या प्रकरणात बाधितांनी बसपाकडे धाव घेतली आहे.

बसपाचे प्रदेश सचिव सुदाम गंगावणे यांनी या प्रकरणात मुख्यमंत्री, खासदार आणि आमदार यांच्यासह महापालिका आयुक्तांकडे पत्र व्यवहार केला आहे. बीएसयूपी घरकूल योजने अंतर्गत लाभार्थी आणि महापालिकेच्या रस्ते विकास प्रकल्पात बाधित झालेल्यांना घरे देण्यात येतील असे महापालिकेने जाहिर केले आहे. त्यानुसार या १७ बाधितांना बीएसयूपी योजनेत घर द्यावे अशी मागणी गंगावणे यांनी केली आहे.

टॅग्स :kalyanकल्याण