शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

कल्याण पूर्वेतील १७ कुटुंबे गेल्या २२ वर्षापासून न्यायाच्या प्रतिक्षेत

By मुरलीधर भवार | Updated: October 14, 2022 15:40 IST

कल्याण-शहराच्या पूर्व भागातील सिद्धार्थनगरातील १७ घरे ही एकात्मिक शहर विकास आराखडा विकसीत करण्यासाठी बाधित झाली होती.

कल्याण-शहराच्या पूर्व भागातील सिद्धार्थनगरातील १७ घरे ही एकात्मिक शहर विकास आराखडा विकसीत करण्यासाठी बाधित झाली होती. ही घरे तोडण्यात आली. या १७ बाधितांना गेल्या २२ वर्षापासून अद्याप न्याय मिळालेला नाही. त्यांना बीएसयूपी योजने घरे देण्याची मागणी करण्यात आली.

महापालिकेने एकात्मिक शहर विकास आराखडा विकसीत करण्याचे काम १९९५ ते २००० या कालावधी हाती घेतले होते. या विकास कामात सिद्धार्थ नगरातील १७ कुटुंबे बाधित झाले. त्यांची घरे 2क्क्क् साली तोडण्यात आली होती. त्यावेळी तत्कालीन आयुक्त श्रीकांत सिंह यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली होती. या तोडू कारवाईच्या विरोधात बाधित कल्याण न्यायालयात गेले होते. कारवाई सुरु होण्यापूर्वीच न्यायालयाने जैसे थे असा आदेश दिला होता. महापालिका अधिकारी वर्गाकडून हा आदेश न जुमानता कारवाई केली गेली. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान महापालिकेकडून करण्यात आला होता. या बाधितांना पर्यायी जागा दिली जाईल असे महापालिका प्रशासनाकडून आश्वासीत केले गेले. मात्र त्यांना उंबर्डे येथे जागा दिली जाईल असे सांगितले गेले. ते राहत होते पूर्व भागात ते पश्चिम भागात जागा घेऊन काय करणार असा प्रश्न या बाधितांकडून उपस्थित केला गेला. एकात्मिक विकास आराखडय़ाअंतर्गत ज्या कारणासाठी ही घरे तोडली गेली. त्याठिकाणी रस्ताच विकसीत झाला नाही तर मग घरे का तोडली असा प्रश्न आहे. हे बाधित गेल्या २२ वर्षापासून न्यायाची मागणी करीत आहेत. ते न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. आत्ता या प्रकरणात बाधितांनी बसपाकडे धाव घेतली आहे.

बसपाचे प्रदेश सचिव सुदाम गंगावणे यांनी या प्रकरणात मुख्यमंत्री, खासदार आणि आमदार यांच्यासह महापालिका आयुक्तांकडे पत्र व्यवहार केला आहे. बीएसयूपी घरकूल योजने अंतर्गत लाभार्थी आणि महापालिकेच्या रस्ते विकास प्रकल्पात बाधित झालेल्यांना घरे देण्यात येतील असे महापालिकेने जाहिर केले आहे. त्यानुसार या १७ बाधितांना बीएसयूपी योजनेत घर द्यावे अशी मागणी गंगावणे यांनी केली आहे.

टॅग्स :kalyanकल्याण