शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

शाकाहारींचा देश...भारत!

By admin | Updated: January 12, 2017 00:50 IST

संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार (२००७) जगभरात सर्वाधिक शाकाहारी लोक भारतात आहेत.

संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार (२००७) जगभरात सर्वाधिक शाकाहारी लोक भारतात आहेत. एवढेच नव्हे, तर जगात जेवढे शाकाहारी लोक आहेत त्यांची संख्या एकत्र केली तरी भारतातील शाकाहारींची संख्या त्याहून अधिक भरेल.भारतातील बहुसंख्य हॉटेल्स, खाणावळी, रेस्टॉरंट्स, उपहारगृहे ही शाकाहारी, फक्त शाकाही किंवा मांसाहारी, असे स्पष्टपणे लिहिलेली असतात. शाकाहारी उपहारगृहे ही मोठ्या संख्येने असतात व मांसाहार उपलब्ध असलेल्या उपहारगृहांत शाकाहाराचीही सोय असल्याचे स्पष्टपणे लिहिलेले असते. २००६ मध्ये झालेल्या पाहणीनुसार ३१ टक्के भारतीय हे शाकाहारी होते. नऊ टक्के हे अंडीही खाणारे होते. लिंगायत, वैष्णव, जैन व ब्राह्मण यांच्यातील ५५ टक्के लोक शाकाहारी दिसतात. मुस्लिमांत व समुद्र किनारी भागात राहणाऱ्यांपैकी फक्त तीन टक्के शाकाहारी आहेत. जे भारतीय मांसाहारी असल्याचे सांगतात, त्यांच्यापैकी अनेक जण हे कधी तरीच खाणारे आहेत तर ३० टक्केच लोक नियमित मांसाहार करतात.  भारत सरकारने २०११ मध्ये केलेल्या जनगणनेमध्ये एकूण लोकसंख्येच्या २८-२९ टक्के लोक शाकाहारी असल्याचे दिसले. त्या  आधीच्या दशकात केलेल्या जनगणनेच्या  तुलनेत ताज्या पाहणीत शाकाहारी  लोकांची संख्या वाढली आहे.  म्हणजेच भारतात शाकाहारींचे  प्रमाण वाढताना  दिसत आहे.