शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
2
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
3
“१०० टक्के माझ्या वॉर्डातून लढणार, ठाकरे बंधू १३० पेक्षा जास्त जागा जिंकणार”: किशोरी पेडणेकर
4
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
5
बापरे! करोडपती सरकारी अधिकारी, ६२ कोटींची मालमत्ता, आलिशान फ्लॅट्स अन् रोख रक्कम; तेलंगणा उपपरिवहन आयुक्तांच्या साम्राज्याचे गुपिते उघड
6
"तेव्हा बडव्यांनी घेरलं होतं, मग आता हातमिळवणी कशी?" शेलारांचा राज ठाकरेंना रोखठोक सवाल!
7
Travel : कुठे आहे सांता क्लॉजचे खरेखुरे गाव, जिथे रोजच साजरा होतो ख्रिसमस? तुम्हीही जाऊ शकता फिरायला!
8
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
9
ठाकरे बंधूंची युती घोषित; पाहा, राज-उद्धव यांच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे
10
Tata Nexon EV खरेदी करायची आहे? किती करावं लागेल डाऊनपेमेंट, पाहा EMI चं संपूर्ण गणित
11
'धुरंधर'नंतर 'दृश्यम ३'मध्ये दिसणार होता अक्षय खन्ना, पण अचानक सोडला सिनेमा? कारण...
12
“मुंबईचे लचके तोडले जातायत, गुजरातच्या दावणीला मुंबईला बांधले जातेय”: विजय वडेट्टीवार
13
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
14
BMC Election: "ते रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे..." ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर बावनकुळेंचा प्रहार!
15
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
16
Video: जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; CRPF कॅम्पमध्ये घुसून जवानावर हल्ला
17
ढासू परतावा...! : या SME स्टॉकनं ३ महिन्यांत दिला 225% हून अधिक परतावा, लोकांना केलं मालामाल; केडियालांकडे तब्बल 393100 शेअर
18
बंडखोरीच्या भीतीनं पक्षांची गुपित रणनीती, जागावाटपाचा तिढा सुटेना; भाजपात इच्छुकांची गर्दी
19
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
20
४ दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय 'हा' शेअर; सरकारच्या घोषणेचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेसाठी राहा ‘टेन्शन फ्री’

By admin | Updated: February 26, 2017 01:56 IST

दहावीच्या परीक्षेचे गेल्या काही वर्षांत करिअरच्या दृष्टीने महत्त्व वाढले आहे. आता दहावी अथवा बारावीची परीक्षा फक्त विद्यार्थ्यांची राहिली नसून, त्यांच्या पालकांचीदेखील

मुंबई : दहावीच्या परीक्षेचे गेल्या काही वर्षांत करिअरच्या दृष्टीने महत्त्व वाढले आहे. आता दहावी अथवा बारावीची परीक्षा फक्त विद्यार्थ्यांची राहिली नसून, त्यांच्या पालकांचीदेखील असल्याचे वातावरण अनेक घरांमधून दिसून येते, पण या परीक्षांचे टेन्शन घेऊ नका, तर सकारात्मक विचार करून परीक्षेला जा, असा सल्ला विद्यार्थ्यांना आणि पालकांना तज्ज्ञांनी दिला आहे.दहावीच्या परीक्षेला अवघे दहा दिवस राहिले असल्यामुळे तणाव वाढायला सुरुवात झाली आहे, पण या काळात पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार करून स्वत:च ताण कमी करा. शेवटच्या दिवसांत विद्यार्थ्यांनी झालेल्या अभ्यासाचा विचार करावा. अभ्यासातील जो भाग राहिला असेल, त्याचा विचार करून नकारात्मक विचार मनात आणू नये. परीक्षेविषयीच्या शंकांमुळे विद्यार्थी तणावाखाली असतील किंवा कुटुंबातील सदस्य आणि मित्रांमध्ये केवळ परीक्षा, निकाल आणि प्रवेश मिळविण्याच्या क्लिष्ट प्रक्रियेविषयी चर्चा होत असेल, तर विद्यार्थ्यांचा तणाव वाढू शकतो. त्यामुळे हे विषय टाळावेत, असा सल्ला डॉ. संदीप झा यांनी दिला. डॉ. झा यांनी पुढे सांगितले, पोषक आहार घेतल्याने शरीर आरोग्यदायी राहाते. शरीराच्या सर्व क्रिया योग्य पद्धतीने सुरू राहतात. त्यामुळे जेवण न घेणे, चहा, कॉफीचे अतिसेवन टाळावे. परीक्षा उन्हाळ््यात असल्याने विद्यार्थ्यांनी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. जर तुमचा अभ्यास पूर्ण झाला असेल, तर थोडी विश्रांती घ्या. नव्या प्रकरणाचा अभ्यास सुरू करणे हितावह नाही. अभ्यासक्रम सहजरीत्या समजून घेण्यासाठी आणि किचकट माहिती सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी तक्ते व आकृत्या आवश्यक असतात. चित्रप्रतिमा लक्षात ठेवणे सोपे असते आणि म्हणून अशा आकृत्या किंवा संक्षिप्त नावे लक्षात ठेवा. नंतर केवळ त्यांच्यावर नजर टाकली, तरी बराच फरक पडेल, असे तज्ज्ञांनी सांगितले. (प्रतिनिधी)अन्य विषयांवरही बोलाबारावीच्या परीक्षा दोन दिवसांमध्ये सुरू होणार आहेत. त्यामुळे शेवटच्या दिवसांत अभ्यासाचा ताण घेऊ नका. जितका अभ्यास झाला आहे, त्याची उजळणी करा. सतत अभ्यास करू नका. कुटुंबीयांसोबत बसून अन्य विषयांवर गप्पा मारा. थोडा व्यायाम, प्राणायाम करा. नकारात्मक विचार टाळा.