शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

लष्करातील मौलवींचा जयहिंद बोलण्यास नकार

By admin | Updated: September 18, 2014 18:27 IST

काही वर्षांपूर्वी वंदेमातरम् या राष्ट्रगीता वरून वाद निर्माण झाला होता. परंतू आता त्याच धरती वर जयहिंद या सोपस्काराला घेऊन झाली आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - काही वर्षांपूर्वी वंदेमातरम् या राष्ट्रगीता वरून वाद निर्माण झाला होता. परंतू आता त्याच धरती वर जयहिंद या सोपस्काराला घेऊन वाद झाला आहे. भारतीय लष्करातील इशरत अली या मौलवीने जयहिंद बोलण्यास नकार दिला असून, तो हिंदू धर्माचा जयघोष असल्याचे म्हटले आहे. या कारणावरून वाद वाढला असून अली यांना त्यांच्या वरीष्ठअधिका-यांनी नोटीस बजावली आहे. त्या नोटीसमध्ये त्यांना आपले संकुचित विचार बदलून सर्व व्यापक दृष्टीकोनातून विचार करावा असं सांगण्यात आले आहे. तसेच रामराम आणि जयमातादी बोलावे असे बजावले आहे.
जयहिंद हा सोपस्कार नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतील अबिद हसन जाफरानी यांनी प्रचलित केला होता, तसेच त्याचा अर्थ भारत चिरायु होवो असा होतो असे लष्कराकडून सांगण्यात येत आहे.  भारतीय लष्कर हे १०० टक्के निपक्षपाती आणि सर्वधर्म समभाव करते असं मेजर जनरल शौकीन चौहान यांनी म्हटले आहे. तसेच अली यांचे वरीष्ठ अधिकारी चित्रा सेन यांना याप्रकरणी विचारले असता त्यांनी या प्रकरणी भाष्यकरण्यास नकार दिला आहे. याबाबत आर्मी हेडक्वार्टर काय ते बोलेल असं कर्नल सेन यांनी सांगितले आहे. बीएसएफ मधील माजी असिस्टंट कमांडंट आणि वकील राजीव आनंद यांनी या प्रकरणी असे म्हटले की जयहिंद ही घोषणा सैनिकांना एकीची भावना व देशप्रेम जागृत करण्याकरता देण्यात येते. तिचा सर्व सैनिकांनी आदर करायला हवा. 
 
इशरत अली गेली २२ वर्षे भारतीय लष्करात मौलवी म्हणून काम करत आहेत परंतू गेल्या  मे महिन्यापासून त्यांना लक्ष्य केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी इशरत यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, मी अनेक अधिकारी बघितले आहेत. अगदी व्ही.के सिंग साहेबांसोबतही माझा संबंध आला आहे. त्यांना मी जयहिंद न बोलण्यावर काहीच आक्षेप नव्हता. तसेच जयहिंद बोललो नाही तर मी देशभक्त नाही असं कसं ठरवता येईल?  दिल्लीच्या रजपूतना रायफल मध्ये मी १० वर्ष काम केले आहे. माझ्या एका कनिष्ठ सहका-याला सुदानला पाठवावे म्हणून मी विनंती केली होती. परंतू त्याच्या ऐवजी मलाच सुदानला पाठवण्यात आले तसेच तिथुन आल्यावर माझी तात्काळ बिकानेरला बदली करण्यात आली. मी या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली असून मला दिल्लीतच बदली मिळावी अशी विनंती केली आहे. बिकानेरची बदली नाकारण्यामागे मुख्य कारण म्हणजे माझी पत्नी हृदयविकाराने त्रस्त आहे, तसेच माझ्या मुलांचे शिक्षण सुरु आहे असे अली यांनी सांगितले आहे. अली यांनी दाखल केलेली तक्रार दिल्ली उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तसेच अली यांनी त्यांच्या वागणुकीच्या वार्षिक अहवालावर सही करण्यास नकार दिला आहे. तसेच त्यांना जहिंद घोषणेच्या वादावरून दुस-यांदा नोटीस बजावण्यात आली आहे.