शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
3
Shivalik Sharma: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला अटक, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
4
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
7
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
8
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
9
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
10
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
11
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
12
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
13
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
14
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
15
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
16
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
17
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
18
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
19
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...

लष्करातील मौलवींचा जयहिंद बोलण्यास नकार

By admin | Updated: September 18, 2014 18:27 IST

काही वर्षांपूर्वी वंदेमातरम् या राष्ट्रगीता वरून वाद निर्माण झाला होता. परंतू आता त्याच धरती वर जयहिंद या सोपस्काराला घेऊन झाली आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - काही वर्षांपूर्वी वंदेमातरम् या राष्ट्रगीता वरून वाद निर्माण झाला होता. परंतू आता त्याच धरती वर जयहिंद या सोपस्काराला घेऊन वाद झाला आहे. भारतीय लष्करातील इशरत अली या मौलवीने जयहिंद बोलण्यास नकार दिला असून, तो हिंदू धर्माचा जयघोष असल्याचे म्हटले आहे. या कारणावरून वाद वाढला असून अली यांना त्यांच्या वरीष्ठअधिका-यांनी नोटीस बजावली आहे. त्या नोटीसमध्ये त्यांना आपले संकुचित विचार बदलून सर्व व्यापक दृष्टीकोनातून विचार करावा असं सांगण्यात आले आहे. तसेच रामराम आणि जयमातादी बोलावे असे बजावले आहे.
जयहिंद हा सोपस्कार नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतील अबिद हसन जाफरानी यांनी प्रचलित केला होता, तसेच त्याचा अर्थ भारत चिरायु होवो असा होतो असे लष्कराकडून सांगण्यात येत आहे.  भारतीय लष्कर हे १०० टक्के निपक्षपाती आणि सर्वधर्म समभाव करते असं मेजर जनरल शौकीन चौहान यांनी म्हटले आहे. तसेच अली यांचे वरीष्ठ अधिकारी चित्रा सेन यांना याप्रकरणी विचारले असता त्यांनी या प्रकरणी भाष्यकरण्यास नकार दिला आहे. याबाबत आर्मी हेडक्वार्टर काय ते बोलेल असं कर्नल सेन यांनी सांगितले आहे. बीएसएफ मधील माजी असिस्टंट कमांडंट आणि वकील राजीव आनंद यांनी या प्रकरणी असे म्हटले की जयहिंद ही घोषणा सैनिकांना एकीची भावना व देशप्रेम जागृत करण्याकरता देण्यात येते. तिचा सर्व सैनिकांनी आदर करायला हवा. 
 
इशरत अली गेली २२ वर्षे भारतीय लष्करात मौलवी म्हणून काम करत आहेत परंतू गेल्या  मे महिन्यापासून त्यांना लक्ष्य केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी इशरत यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, मी अनेक अधिकारी बघितले आहेत. अगदी व्ही.के सिंग साहेबांसोबतही माझा संबंध आला आहे. त्यांना मी जयहिंद न बोलण्यावर काहीच आक्षेप नव्हता. तसेच जयहिंद बोललो नाही तर मी देशभक्त नाही असं कसं ठरवता येईल?  दिल्लीच्या रजपूतना रायफल मध्ये मी १० वर्ष काम केले आहे. माझ्या एका कनिष्ठ सहका-याला सुदानला पाठवावे म्हणून मी विनंती केली होती. परंतू त्याच्या ऐवजी मलाच सुदानला पाठवण्यात आले तसेच तिथुन आल्यावर माझी तात्काळ बिकानेरला बदली करण्यात आली. मी या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली असून मला दिल्लीतच बदली मिळावी अशी विनंती केली आहे. बिकानेरची बदली नाकारण्यामागे मुख्य कारण म्हणजे माझी पत्नी हृदयविकाराने त्रस्त आहे, तसेच माझ्या मुलांचे शिक्षण सुरु आहे असे अली यांनी सांगितले आहे. अली यांनी दाखल केलेली तक्रार दिल्ली उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तसेच अली यांनी त्यांच्या वागणुकीच्या वार्षिक अहवालावर सही करण्यास नकार दिला आहे. तसेच त्यांना जहिंद घोषणेच्या वादावरून दुस-यांदा नोटीस बजावण्यात आली आहे.