शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
2
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
3
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
4
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
5
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
6
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
7
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
8
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
9
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
10
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
11
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
12
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
13
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
14
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
15
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
16
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
17
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
18
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
19
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
20
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन

रेवदंड्यात युवकांना लाभले ‘नारळमित्र’ प्रशिक्षण

By admin | Updated: February 23, 2015 22:16 IST

नारळाचे उत्पादन म्हणजे कोकणचे हमखास उत्पादन देणारा व्यवसाय. मात्र गेल्या काही वर्षातील या नारळ बागायतीतील समस्यांमुळे युवा बागायतदारवर्ग या उत्पादनापासून दूर जात आहे.

रेवदंडा : नारळाचे उत्पादन म्हणजे कोकणचे हमखास उत्पादन देणारा व्यवसाय. मात्र गेल्या काही वर्षातील या नारळ बागायतीतील समस्यांमुळे युवा बागायतदारवर्ग या उत्पादनापासून दूर जात आहे. याच युवावर्गाला या व्यवसायापर्यंत आणण्यासाठी रेवदंड्यात खास नारळमित्र प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. रेवदंड्यातील हा पहिलाच प्रयोग यशस्वी झाला. येथील दिलीप पाटील यांच्या वाडीत केरळ नारळ विकास मंडळ व कृषक कल्याणकारी संस्था, चौल यांच्या संयुक्त विद्यमाने नारळ मित्र प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या सहा दिवस सुरू असलेल्या प्रशिक्षण शिबिरात २० युवकांनी सहभाग घेत माहितीही घेतली. दिवसेंदिवस नारळ झाडावरुन उतरवणे हे बागायतदारांना पाडेकरी संख्या घटत चालल्याने जिकिरीचे वाटत आहे. त्यात जुन्या झाडांवर पाडेकरी चढेनासे झाल्याने नारळ काढणी यंत्रामुळे नारळाची पाडण करणे सोपे ठरणार आहे. यातून युवकांना रोजगाराची नवीनच संधी चालून आल्यासारखे आहे. दापोलीमधील प्रशिक्षक नारळ मित्र अमोल मळेकर व रुपेश तांबडे यांनी हे प्रशिक्षण दिले. तांबडे यांनी माहिती देताना सांगितले की, गेले तीन वर्षात ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व गुजरात राज्यात प्रशिक्षण कार्यक्रम झाले असून सुमारे ६०० जणांनी यात सहभाग घेतला. यात मुली तीन टक्के आहेत. (वार्ताहर)