शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

रेवदंड्यात युवकांना लाभले ‘नारळमित्र’ प्रशिक्षण

By admin | Updated: February 23, 2015 22:16 IST

नारळाचे उत्पादन म्हणजे कोकणचे हमखास उत्पादन देणारा व्यवसाय. मात्र गेल्या काही वर्षातील या नारळ बागायतीतील समस्यांमुळे युवा बागायतदारवर्ग या उत्पादनापासून दूर जात आहे.

रेवदंडा : नारळाचे उत्पादन म्हणजे कोकणचे हमखास उत्पादन देणारा व्यवसाय. मात्र गेल्या काही वर्षातील या नारळ बागायतीतील समस्यांमुळे युवा बागायतदारवर्ग या उत्पादनापासून दूर जात आहे. याच युवावर्गाला या व्यवसायापर्यंत आणण्यासाठी रेवदंड्यात खास नारळमित्र प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. रेवदंड्यातील हा पहिलाच प्रयोग यशस्वी झाला. येथील दिलीप पाटील यांच्या वाडीत केरळ नारळ विकास मंडळ व कृषक कल्याणकारी संस्था, चौल यांच्या संयुक्त विद्यमाने नारळ मित्र प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या सहा दिवस सुरू असलेल्या प्रशिक्षण शिबिरात २० युवकांनी सहभाग घेत माहितीही घेतली. दिवसेंदिवस नारळ झाडावरुन उतरवणे हे बागायतदारांना पाडेकरी संख्या घटत चालल्याने जिकिरीचे वाटत आहे. त्यात जुन्या झाडांवर पाडेकरी चढेनासे झाल्याने नारळ काढणी यंत्रामुळे नारळाची पाडण करणे सोपे ठरणार आहे. यातून युवकांना रोजगाराची नवीनच संधी चालून आल्यासारखे आहे. दापोलीमधील प्रशिक्षक नारळ मित्र अमोल मळेकर व रुपेश तांबडे यांनी हे प्रशिक्षण दिले. तांबडे यांनी माहिती देताना सांगितले की, गेले तीन वर्षात ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व गुजरात राज्यात प्रशिक्षण कार्यक्रम झाले असून सुमारे ६०० जणांनी यात सहभाग घेतला. यात मुली तीन टक्के आहेत. (वार्ताहर)