शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
2
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
3
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
4
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 
5
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
6
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
7
इंद्रायणी पूररेषेतील ३६ बंगले जमीनदोस्त
8
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
9
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
10
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
11
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
12
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
13
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
14
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
15
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
16
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
17
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
18
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
19
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  

खासदारांनो...काम नाही तर पगार नाही, केंद्र सरकारचे धाडसी पाऊल ?

By admin | Updated: August 2, 2015 18:41 IST

प्रशासकीय अधिका-यांप्रमाणेच आता खासदारांसाठी 'काम नाही तर पगार नाही' हे धोरण राबवण्याचा विचार सुरु असल्याचे विधान केंद्रीय पर्यटन मंत्री महेश शर्मा यांनी वाराणसीत केले आहे.

ऑनलाइन लोकमत 

वाराणसी,  दि. २ - विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील कामकाज जवळपास ठप्प पडले असतानाच आता गोंधळी खासदारांवर लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारने धाडसी पाऊल उचलण्याची तयारी केली आहे. प्रशासकीय अधिका-यांप्रमाणेच आता खासदारांसाठी 'काम नाही तर पगार नाही' हे धोरण राबवण्याचा विचार सुरु असल्याचे विधान केंद्रीय पर्यटन मंत्री महेश शर्मा यांनी वाराणसीत केले आहे.
ऐतिहासिक स्थळांची माहिती देणा-या मोबाईल अॅपच्या शुभारंभासाठी पर्यटन मंत्री महेश शर्मा शनिवारी वाराणसीत आले होते. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी गोंधळामुळे संसदेतील कामाचा वेळ वाया जात असल्यावर नाराजी व्यक्त केली. ज्याप्रमाणे नोकरशहांसाठी काम नाही केले तर वेतन नाही हे धोरण राबवले जाते. त्याप्रमाणे हेच धोरण आता खासदारांना लागू करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे असे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसकडे संसदेत उपस्थित करण्यासाठी दुसरा कोणताही ठोस मुद्दा नाही, म्हणूनच ते गोंधळ घालून संसदेचे कामकाज ठप्प पाडत आहे असा आरोपही त्यांनी केला. 
देशाचे सर्वोच्च सभागृह असलेल्या संसदेत सध्या कामापेक्षा गोंधळाची चर्चा असते. देशाची जबाबदारी असलेले खासदार हे कामाऐवजी गोंधळ करण्यात धन्यता मानतात. पण यामुळे वेळ व पैशाचा होणारा अपव्यय याकडे साफ दुर्लक्ष होते. मोदी सरकारने खासदारांसाठीही असे धोरण राबवल्यास संसदेत देशाच्या समस्येवर तोडगा निघेल अशी आशा आहे.