शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
3
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
4
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
5
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
6
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
7
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
8
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
9
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
10
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
11
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
12
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
13
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
14
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
15
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
16
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
17
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
18
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
19
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
20
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव

जाणून घ्या पावसाळ्यात कोणता आहार घ्यावा

By admin | Updated: July 21, 2016 13:33 IST

पावसाळ्यात होणारे बरेच आजार पोटामुळे निर्माण होतात आणि पोटाचे आजार जंतूंचा संसर्ग आणि चुकीचा आहार यातून निर्माण होतात

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 21 - पावसाळा सुरु झाला की पावसासोबत आजारही सुरु होतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अमेकदा दवाखान्याचा दौरा करावा लागतो. पावसाळ्यात होणा-या आजारांची वेगवेगळी कारणे आहेत. पावसाळ्यात होणारे बरेच आजार पोटामुळे निर्माण होतात आणि पोटाचे आजार जंतूंचा संसर्ग आणि चुकीचा आहार यातून निर्माण होतात. त्यामुळे पावसाळ्यात आहाराच्या बाबतीत काही पथ्ये पाळण्याची गरज आहे. यासंबंधात काही खास टिप्स् तुमच्यासाठी...
 
१) पावसाळ्यात निरनिराळ्या भाज्यांचे सूप प्राशन करणे फायदेशीर ठरते. कारण या सुपांमध्ये पोषण मूल्ये भरपूर असतात. काही पोषण मूल्यांच्या अभावामुळे सर्दी आणि फ्ल्यूसारखे आजार बळावतात. परंतु भाज्यांचे सूप प्यायल्ल्याने या आजारापासून बचाव तर होतोच, पण आपले सर्वसाधारण आरोग्य आणि प्रतिकार क्षमता वाढते.
 
२) पावसाळ्यात चहा घ्या, परंतु शक्यतो हर्बल टी प्या. त्यामुळे फ्ल्यूचा धोका टळतो. हर्बल टी पचनशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरत असतो. आपल्या जेवणामध्ये पातळ अन्नापेक्षा घट्ट अन्न पदार्थ किंवा निमपातळ अन्नपदार्थ जास्त घ्यावे. कारण पातळ अन्न पदार्थातून रोगजंतूंचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.
 
३) पावसाळ्यात फळांचे किंवा भाजीपाल्यांचे रस पिण्याचे कटाक्षाने टाळा. विशेषत: पाऊस पडत असताना रस्त्यावरच्या गाड्यावरचे किंवा हॉटेलमधले फळांचे रस पिऊ नका. रस पिण्याची फारच लहर आली असेल तर घरी तयार करून प्या.
 
४) मासे आणि तत्सम प्राणी खाऊ नका. कारण पावसाळा हा त्यांच्यासाठी प्रजननाचा काळ असतो. त्या अवस्थेतील मासे खाल्ल्यास पोटदुखीचा विकार होण्याची शक्यता असते. त्यातून विषबाधा सुद्धा होते.
 
५) पावसाळ्यामध्ये सलाड किंवा कच्च्या भाज्या असा रॉ फूडचा प्रयोग करू नका. कारण त्यातून कावीळ, टायफाईड असे विकार उद्भवू शकतात. हेच अन्न शिजवून खाल्ल्यास शिजवताना त्यातील रोगजंतू मरतात आणि त्यांच्यापासून धोका टळतो.