शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

उशिरा लग्न लावल्यास ५ हजारांचा दंड!

By admin | Updated: January 12, 2016 02:14 IST

गेल्या काही दिवसांपासून लग्नाचा मुहूर्त चुकवण्याची प्रथाच पडली आहे. यामुळे वेळेवर लग्नासाठी पोहोचणाऱ्या वऱ्हाड्यांसह नातेवाईक आणि मित्र मंडळींना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.

- अनिल गवई, खामगाव (जि.बुलडाणा)

गेल्या काही दिवसांपासून लग्नाचा मुहूर्त चुकवण्याची प्रथाच पडली आहे. यामुळे वेळेवर लग्नासाठी पोहोचणाऱ्या वऱ्हाड्यांसह नातेवाईक आणि मित्र मंडळींना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे उशिरा लग्न लावणाऱ्या वधू आणि वराकडील मंडळींना ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा एकमुखी ठराव बुलडाणा जिल्हा भावसार समाज मंडळाने घेतला आहे.वेळेवर लग्न लावण्यासाठी एक आदर्श संहिताच महाराष्ट्र भावसार समाजाशी संलग्नित असलेल्या बुलडाणा जिल्हा भावसार समाज मंडळाने तयार केली आहे. रविवारी त्याबाबतचे विविध ठराव संमत करून त्यांची अंमलबजावणीदेखील सुरू केली आहे. उशिरा लग्न लावणाऱ्या वधू आणि वराकडील मंडळींना प्रत्येकी अडीच हजार रुपयांचा दंड भावसार समाज मंडळ वसूल करणार आहे. आदर्श आचार संहिता तयार करताना पर्यावरण रक्षणाचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून विवाह सोहळा, व्रतवैकल्य, वाढदिवस, दशक्रिया विधी यांसारख्या सामाजिक उपक्रमामध्ये प्लास्टीक पत्रावळ्या, द्रोणसुद्धा न वापरण्याचा ठराव या वेळी घेण्यात आला. त्यांचा वापर केल्यास संबंधितांना २१०० रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.लग्न लावण्यास उशीर होत असल्यामुळे अनेक ठिकाणी पाहुणे मंडळींना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे भावसार समाजाने ‘समय के साथ चलो’ अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.- किशोर जुनगडे, अध्यक्ष, बुलडाणा जिल्हा भावसार समाज मंडळपर्यावरण रक्षण आणि समाजाच्या हितासाठी विविध समाजोपयोगी ठराव पारित करण्यात आले. या ठरावाच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी आपण महाराष्ट्रभर दौरे करणार आहोत.- डॉ. विजय जिराफे, अध्यक्ष, विदर्भ भावसार समाज मंडळ