शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

रसदार... बहारदार!

By admin | Updated: June 11, 2017 01:48 IST

आपल्याकडे प्रत्येक ऋतूंचे वैशिष्ट्य असते. जूनमध्ये पावसाच्या तालावर निसर्ग फेर धरत असताना लिची, चेरी, सीताफळ, संत्री-मोसंबी अशी विविध रंगांची फळे यायला लागतात. त्यांची सरबते बहार आणतात.

- भक्ती सोमण आपल्याकडे प्रत्येक ऋतूंचे वैशिष्ट्य असते. जूनमध्ये पावसाच्या तालावर निसर्ग फेर धरत असताना लिची, चेरी, सीताफळ, संत्री-मोसंबी अशी विविध रंगांची फळे यायला लागतात. त्यांची सरबते बहार आणतात. पावसाळ्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. आता सारी सृष्टी हिरवा शालू पांघरून वातावरण प्रसन्न करेल. या पावसाळ्याच्या काळात भजी खाणे खूप प्रिय असते. मक्याच्या दाण्यांचे, रानभाज्यांचेही हेच दिवस असतात. हे झाले खाण्याचे. पण लिची, चेरी, कलिंगड, संत्री-मोसंबी अशा विविध फळांनीही हा महिना बहरलेला असतो. या फळांचे आगमन झाल्याची खरी चाहूल लागते ती ट्रेनच्या प्रवासाततुम्ही ट्रेनमधून प्रवास करत असाल तर बारकाईने निरीक्षण करा! एप्रिल, मे महिन्यात कैरी, आवळा विकायला जास्त येतात. तर आता जून महिन्यात लिची, जांभळं विकायला आलेली असतात. लिची. लालचुटुक रंगाचे हे फळ दिसायला थोडेसे ओबडधोबड दिसत असले तरी ते सोलल्यावर जे पांढऱ्या रंगाचे रसपूर्ण फळ येते त्याची चव अप्रतिम अशीच. तोंडात टाकल्यावर स्वर्गसुख म्हणतात ते काय याची प्रचिती देणारे हे एवढेसे फळ. नुसते खाण्यात तर मजा आहेच. पण त्याचे सरबतही आता अगदी सहज मिळते. लिची सोलून त्याच्या गरात थोडी साखर घालून ते मिश्रण फ्रीजमध्ये ठेवायचे. ते बरेच दिवस टिकते. जेव्हा हवे असेल तेव्हा ते मिश्रण घेऊन त्यात पाणी घालून केलेले सरबत तर अप्रतिम लागते. आता तर स्क्वॅश बॉटलही मिळतात. त्यात लिचीच्या गरासोबत फळही असते. तेही प्यायला अतिशय छान लागते.पावसाळ्याच्या सुरुवातीला चेरी मोठ्या प्रमाणावर येते. ती आईस्क्रीम किंवा काही डेझर्टमध्ये आवर्जून वापरली जाते. चेरीची बी काढून लिंबाच्या सरबताप्रमाणेच त्याचे सरबत होते. चेरीची गोड चव आणि लिंबाचा आंबटपणा, साखर हे प्रकरण फार चविष्ट लागते. याशिवाय जांभळाचे सरबतही केले जाते. तसेच कलिंगडाचा ज्यूस, संत्री-मोसंबीपासून गंगा-जमुना अशी सरबते तर हमखास मिळतात. अशा विविध सरबतांविषयी पुढे पाहूच. जूनपासून सुरू झालेल्या रसदार फळांचे हे दिवस आंबट, गोड चवीची बहार घेऊन आले आहेत. हा अनुभव चवदार मजेदार असेल हे नक्की!ुँं‘३्र२ङ्मेंल्ल@ॅें्र’.ूङ्मेखास पेये अशीहीया पावसाळी वातावरणात दिल से खाऊन-पिऊन तृप्त व्हायचे असेल तर महंमद अली रोडचा पर्याय एकदम बेस्ट. सध्या रमझान चालू आहे. या पार्श्वभूमीवर जशी खाद्यपदार्थांची रेलचेल बघायला मिळते तशी रेलचेल पेयांचीही असते. या काळात प्रामुख्याने गुलाब सरबत, फालुदा आणि खजुराचे सरबत पिणे हे महत्त्वाचे मानले जाते. कारण या काळात दिवसभराच्या कडकडीत उपासाची सांगता शीतलता देणाऱ्या सरबताने करायची असा रिवाज आहे. त्यामुळे रिकाम्या पोटावर पर्यायाने पचनसंस्थेवर एकदम ताण येत नाही. म्हणूनच ही पौष्टिक सरबते प्यायली जातात. गुलाबाच्या सरबताचे आपले असे वैशिष्ट्य आहेच. खजुराचे सरबत करताना त्यासोबत काजू, दूध, वेलची, साखर असे घालून करतात. खजुराचा पौष्टिकपणा त्यात उतरतोच शिवाय पोटही भरते.