शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

रसदार... बहारदार!

By admin | Updated: June 11, 2017 01:48 IST

आपल्याकडे प्रत्येक ऋतूंचे वैशिष्ट्य असते. जूनमध्ये पावसाच्या तालावर निसर्ग फेर धरत असताना लिची, चेरी, सीताफळ, संत्री-मोसंबी अशी विविध रंगांची फळे यायला लागतात. त्यांची सरबते बहार आणतात.

- भक्ती सोमण आपल्याकडे प्रत्येक ऋतूंचे वैशिष्ट्य असते. जूनमध्ये पावसाच्या तालावर निसर्ग फेर धरत असताना लिची, चेरी, सीताफळ, संत्री-मोसंबी अशी विविध रंगांची फळे यायला लागतात. त्यांची सरबते बहार आणतात. पावसाळ्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. आता सारी सृष्टी हिरवा शालू पांघरून वातावरण प्रसन्न करेल. या पावसाळ्याच्या काळात भजी खाणे खूप प्रिय असते. मक्याच्या दाण्यांचे, रानभाज्यांचेही हेच दिवस असतात. हे झाले खाण्याचे. पण लिची, चेरी, कलिंगड, संत्री-मोसंबी अशा विविध फळांनीही हा महिना बहरलेला असतो. या फळांचे आगमन झाल्याची खरी चाहूल लागते ती ट्रेनच्या प्रवासाततुम्ही ट्रेनमधून प्रवास करत असाल तर बारकाईने निरीक्षण करा! एप्रिल, मे महिन्यात कैरी, आवळा विकायला जास्त येतात. तर आता जून महिन्यात लिची, जांभळं विकायला आलेली असतात. लिची. लालचुटुक रंगाचे हे फळ दिसायला थोडेसे ओबडधोबड दिसत असले तरी ते सोलल्यावर जे पांढऱ्या रंगाचे रसपूर्ण फळ येते त्याची चव अप्रतिम अशीच. तोंडात टाकल्यावर स्वर्गसुख म्हणतात ते काय याची प्रचिती देणारे हे एवढेसे फळ. नुसते खाण्यात तर मजा आहेच. पण त्याचे सरबतही आता अगदी सहज मिळते. लिची सोलून त्याच्या गरात थोडी साखर घालून ते मिश्रण फ्रीजमध्ये ठेवायचे. ते बरेच दिवस टिकते. जेव्हा हवे असेल तेव्हा ते मिश्रण घेऊन त्यात पाणी घालून केलेले सरबत तर अप्रतिम लागते. आता तर स्क्वॅश बॉटलही मिळतात. त्यात लिचीच्या गरासोबत फळही असते. तेही प्यायला अतिशय छान लागते.पावसाळ्याच्या सुरुवातीला चेरी मोठ्या प्रमाणावर येते. ती आईस्क्रीम किंवा काही डेझर्टमध्ये आवर्जून वापरली जाते. चेरीची बी काढून लिंबाच्या सरबताप्रमाणेच त्याचे सरबत होते. चेरीची गोड चव आणि लिंबाचा आंबटपणा, साखर हे प्रकरण फार चविष्ट लागते. याशिवाय जांभळाचे सरबतही केले जाते. तसेच कलिंगडाचा ज्यूस, संत्री-मोसंबीपासून गंगा-जमुना अशी सरबते तर हमखास मिळतात. अशा विविध सरबतांविषयी पुढे पाहूच. जूनपासून सुरू झालेल्या रसदार फळांचे हे दिवस आंबट, गोड चवीची बहार घेऊन आले आहेत. हा अनुभव चवदार मजेदार असेल हे नक्की!ुँं‘३्र२ङ्मेंल्ल@ॅें्र’.ूङ्मेखास पेये अशीहीया पावसाळी वातावरणात दिल से खाऊन-पिऊन तृप्त व्हायचे असेल तर महंमद अली रोडचा पर्याय एकदम बेस्ट. सध्या रमझान चालू आहे. या पार्श्वभूमीवर जशी खाद्यपदार्थांची रेलचेल बघायला मिळते तशी रेलचेल पेयांचीही असते. या काळात प्रामुख्याने गुलाब सरबत, फालुदा आणि खजुराचे सरबत पिणे हे महत्त्वाचे मानले जाते. कारण या काळात दिवसभराच्या कडकडीत उपासाची सांगता शीतलता देणाऱ्या सरबताने करायची असा रिवाज आहे. त्यामुळे रिकाम्या पोटावर पर्यायाने पचनसंस्थेवर एकदम ताण येत नाही. म्हणूनच ही पौष्टिक सरबते प्यायली जातात. गुलाबाच्या सरबताचे आपले असे वैशिष्ट्य आहेच. खजुराचे सरबत करताना त्यासोबत काजू, दूध, वेलची, साखर असे घालून करतात. खजुराचा पौष्टिकपणा त्यात उतरतोच शिवाय पोटही भरते.