शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

रसदार... बहारदार!

By admin | Updated: June 11, 2017 01:48 IST

आपल्याकडे प्रत्येक ऋतूंचे वैशिष्ट्य असते. जूनमध्ये पावसाच्या तालावर निसर्ग फेर धरत असताना लिची, चेरी, सीताफळ, संत्री-मोसंबी अशी विविध रंगांची फळे यायला लागतात. त्यांची सरबते बहार आणतात.

- भक्ती सोमण आपल्याकडे प्रत्येक ऋतूंचे वैशिष्ट्य असते. जूनमध्ये पावसाच्या तालावर निसर्ग फेर धरत असताना लिची, चेरी, सीताफळ, संत्री-मोसंबी अशी विविध रंगांची फळे यायला लागतात. त्यांची सरबते बहार आणतात. पावसाळ्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. आता सारी सृष्टी हिरवा शालू पांघरून वातावरण प्रसन्न करेल. या पावसाळ्याच्या काळात भजी खाणे खूप प्रिय असते. मक्याच्या दाण्यांचे, रानभाज्यांचेही हेच दिवस असतात. हे झाले खाण्याचे. पण लिची, चेरी, कलिंगड, संत्री-मोसंबी अशा विविध फळांनीही हा महिना बहरलेला असतो. या फळांचे आगमन झाल्याची खरी चाहूल लागते ती ट्रेनच्या प्रवासाततुम्ही ट्रेनमधून प्रवास करत असाल तर बारकाईने निरीक्षण करा! एप्रिल, मे महिन्यात कैरी, आवळा विकायला जास्त येतात. तर आता जून महिन्यात लिची, जांभळं विकायला आलेली असतात. लिची. लालचुटुक रंगाचे हे फळ दिसायला थोडेसे ओबडधोबड दिसत असले तरी ते सोलल्यावर जे पांढऱ्या रंगाचे रसपूर्ण फळ येते त्याची चव अप्रतिम अशीच. तोंडात टाकल्यावर स्वर्गसुख म्हणतात ते काय याची प्रचिती देणारे हे एवढेसे फळ. नुसते खाण्यात तर मजा आहेच. पण त्याचे सरबतही आता अगदी सहज मिळते. लिची सोलून त्याच्या गरात थोडी साखर घालून ते मिश्रण फ्रीजमध्ये ठेवायचे. ते बरेच दिवस टिकते. जेव्हा हवे असेल तेव्हा ते मिश्रण घेऊन त्यात पाणी घालून केलेले सरबत तर अप्रतिम लागते. आता तर स्क्वॅश बॉटलही मिळतात. त्यात लिचीच्या गरासोबत फळही असते. तेही प्यायला अतिशय छान लागते.पावसाळ्याच्या सुरुवातीला चेरी मोठ्या प्रमाणावर येते. ती आईस्क्रीम किंवा काही डेझर्टमध्ये आवर्जून वापरली जाते. चेरीची बी काढून लिंबाच्या सरबताप्रमाणेच त्याचे सरबत होते. चेरीची गोड चव आणि लिंबाचा आंबटपणा, साखर हे प्रकरण फार चविष्ट लागते. याशिवाय जांभळाचे सरबतही केले जाते. तसेच कलिंगडाचा ज्यूस, संत्री-मोसंबीपासून गंगा-जमुना अशी सरबते तर हमखास मिळतात. अशा विविध सरबतांविषयी पुढे पाहूच. जूनपासून सुरू झालेल्या रसदार फळांचे हे दिवस आंबट, गोड चवीची बहार घेऊन आले आहेत. हा अनुभव चवदार मजेदार असेल हे नक्की!ुँं‘३्र२ङ्मेंल्ल@ॅें्र’.ूङ्मेखास पेये अशीहीया पावसाळी वातावरणात दिल से खाऊन-पिऊन तृप्त व्हायचे असेल तर महंमद अली रोडचा पर्याय एकदम बेस्ट. सध्या रमझान चालू आहे. या पार्श्वभूमीवर जशी खाद्यपदार्थांची रेलचेल बघायला मिळते तशी रेलचेल पेयांचीही असते. या काळात प्रामुख्याने गुलाब सरबत, फालुदा आणि खजुराचे सरबत पिणे हे महत्त्वाचे मानले जाते. कारण या काळात दिवसभराच्या कडकडीत उपासाची सांगता शीतलता देणाऱ्या सरबताने करायची असा रिवाज आहे. त्यामुळे रिकाम्या पोटावर पर्यायाने पचनसंस्थेवर एकदम ताण येत नाही. म्हणूनच ही पौष्टिक सरबते प्यायली जातात. गुलाबाच्या सरबताचे आपले असे वैशिष्ट्य आहेच. खजुराचे सरबत करताना त्यासोबत काजू, दूध, वेलची, साखर असे घालून करतात. खजुराचा पौष्टिकपणा त्यात उतरतोच शिवाय पोटही भरते.