शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

मुलाखत नागरी सेवा (IAS) परीक्षेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2017 00:04 IST

मुलाखत इंग्रजी, हिंदी अथवा मराठीतून देता येते. उमेदवारांचा प्रामाणिकपणा, वैचारिक पातळी, आत्मविश्वास, प्रगल्भता, क्षमता यांचा कस विविध प्रश्नांच्या माध्यमातून

- प्रा. राजेंद्र चिंचोलेमुलाखत इंग्रजी, हिंदी अथवा मराठीतून देता येते. उमेदवारांचा प्रामाणिकपणा, वैचारिक पातळी, आत्मविश्वास, प्रगल्भता, क्षमता यांचा कस विविध प्रश्नांच्या माध्यमातून मुलाखतीच्या पॅनेलद्वारे लावला जातो. मुख्य परीक्षेच्या अर्जात नमूद केलेली वैयक्तिक माहिती व बायोडाटा मुलाखतीचा गाभा असतो. व्यक्तिमत्त्व चाचणीद्वारे उमेदवाराची प्रशासकीय पदासाठीची योग्यता बाळगणे आवश्यक आहे.नागरी सेवेची मुलाखत म्हणजेच व्यक्तिमत्त्व चाचणी हा नागरी सेवा परीक्षेचा अंतिम व अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने २७५ गुण निर्धारित केले आहेत. मुख्य परीक्षेच्या ७ पेपर्समधील (भारतीय भाषा व इंग्रजी सोडून) १७५० गुण व मुलाखतीचे २७५ गुण यापैकी प्राप्त केलेल्या गुणांची बेरीज करूनच विद्यार्थ्यांची IAS, IPS, IFS, गट अ, गट ब सेवा यासाठी निवड केली जाते. केंद्रीय लोकसेवा आयोगाने मुलाखतीऐवजी व्यक्तिमत्त्व चाचणी हा शब्दप्रयोग जाणीवपूर्वक केलेला आहे. यासाठी विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती, विद्यार्थ्यांच्या गाव, परिसर, जिल्हा, विभाग व राज्याची माहिती, शैक्षणिक माहिती, छंद, आवड, सामाजिक सेवेतील रस, नागरी सेवेत येण्याचा उद्देश, क्रीडा क्षेत्र, चालू घडामोडी, वैकल्पिक विषय या घटकांची तयारी करणे आवश्यक महत्त्वाचे ठरते. उमेदवाराला मुलाखतीत सामाजिक जाणीव, निर्णय क्षमता, जिज्ञासू वृत्ती, कल्पकता, आत्मविश्वास, देहबोली, भाषा कौशल्य, संवाद कौशल्य, वैचारिक प्रगल्भता व स्पष्टता या बाबी तपासल्या जातात. यासाठी विविध मुद्द्यांचे आकलन, स्वमत, वाचन, गटचर्चा, बोलण्याचा भरपूर सराव याद्वारे मुलाखतीची प्रभावीरीत्या तयारी करता येते. मुलाखत इंग्रजी, हिंदी अथवा मराठीतून देता येते. उमेदवारांचा प्रामाणिकपणा, वैचारिक पातळी, आत्मविश्वास, प्रगल्भता, क्षमता यांचा कस विविध मुलाखतीच्या पॅनेलद्वारे लावला जातो. व्यक्तिमत्त्व चाचणीद्वारे उमेदवाराची प्रशासकीय पदासाठीची योग्यता बाळगणे आवश्यक आहे. नागरी सेवेद्वारे देशाचे प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी संतुलित विचार भावनांवर नियंत्रण, धीर, समाजाविषयी आस्था, स्थितप्रज्ञता, नावीन्यपूर्णता, क्षमता, आत्मविश्वास, सर्व विषयांचे ज्ञान याची जाण असणे आवश्यक आहे. व्यक्तिमत्त्व चाचणीतील यशासाठी सखोल ज्ञान, संदर्भ ग्रंथाचा वापर, इंग्रजीचे ज्ञान या गोष्टी आवश्यक आहेत. मुलाखतीत पास किंवा नापास असा काहीही प्रकार नसतो. मुलाखत हा लेखी परीक्षेचा एक घटक असतो. मुलाखतीत चांगले गुण मिळाल्यास अंतिम यादीत स्थान मिळण्याची किंवा चांगले पद मिळण्याची शक्यता वाढते.