शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

मुलाखत नागरी सेवा (IAS) परीक्षेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2017 00:04 IST

मुलाखत इंग्रजी, हिंदी अथवा मराठीतून देता येते. उमेदवारांचा प्रामाणिकपणा, वैचारिक पातळी, आत्मविश्वास, प्रगल्भता, क्षमता यांचा कस विविध प्रश्नांच्या माध्यमातून

- प्रा. राजेंद्र चिंचोलेमुलाखत इंग्रजी, हिंदी अथवा मराठीतून देता येते. उमेदवारांचा प्रामाणिकपणा, वैचारिक पातळी, आत्मविश्वास, प्रगल्भता, क्षमता यांचा कस विविध प्रश्नांच्या माध्यमातून मुलाखतीच्या पॅनेलद्वारे लावला जातो. मुख्य परीक्षेच्या अर्जात नमूद केलेली वैयक्तिक माहिती व बायोडाटा मुलाखतीचा गाभा असतो. व्यक्तिमत्त्व चाचणीद्वारे उमेदवाराची प्रशासकीय पदासाठीची योग्यता बाळगणे आवश्यक आहे.नागरी सेवेची मुलाखत म्हणजेच व्यक्तिमत्त्व चाचणी हा नागरी सेवा परीक्षेचा अंतिम व अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने २७५ गुण निर्धारित केले आहेत. मुख्य परीक्षेच्या ७ पेपर्समधील (भारतीय भाषा व इंग्रजी सोडून) १७५० गुण व मुलाखतीचे २७५ गुण यापैकी प्राप्त केलेल्या गुणांची बेरीज करूनच विद्यार्थ्यांची IAS, IPS, IFS, गट अ, गट ब सेवा यासाठी निवड केली जाते. केंद्रीय लोकसेवा आयोगाने मुलाखतीऐवजी व्यक्तिमत्त्व चाचणी हा शब्दप्रयोग जाणीवपूर्वक केलेला आहे. यासाठी विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती, विद्यार्थ्यांच्या गाव, परिसर, जिल्हा, विभाग व राज्याची माहिती, शैक्षणिक माहिती, छंद, आवड, सामाजिक सेवेतील रस, नागरी सेवेत येण्याचा उद्देश, क्रीडा क्षेत्र, चालू घडामोडी, वैकल्पिक विषय या घटकांची तयारी करणे आवश्यक महत्त्वाचे ठरते. उमेदवाराला मुलाखतीत सामाजिक जाणीव, निर्णय क्षमता, जिज्ञासू वृत्ती, कल्पकता, आत्मविश्वास, देहबोली, भाषा कौशल्य, संवाद कौशल्य, वैचारिक प्रगल्भता व स्पष्टता या बाबी तपासल्या जातात. यासाठी विविध मुद्द्यांचे आकलन, स्वमत, वाचन, गटचर्चा, बोलण्याचा भरपूर सराव याद्वारे मुलाखतीची प्रभावीरीत्या तयारी करता येते. मुलाखत इंग्रजी, हिंदी अथवा मराठीतून देता येते. उमेदवारांचा प्रामाणिकपणा, वैचारिक पातळी, आत्मविश्वास, प्रगल्भता, क्षमता यांचा कस विविध मुलाखतीच्या पॅनेलद्वारे लावला जातो. व्यक्तिमत्त्व चाचणीद्वारे उमेदवाराची प्रशासकीय पदासाठीची योग्यता बाळगणे आवश्यक आहे. नागरी सेवेद्वारे देशाचे प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी संतुलित विचार भावनांवर नियंत्रण, धीर, समाजाविषयी आस्था, स्थितप्रज्ञता, नावीन्यपूर्णता, क्षमता, आत्मविश्वास, सर्व विषयांचे ज्ञान याची जाण असणे आवश्यक आहे. व्यक्तिमत्त्व चाचणीतील यशासाठी सखोल ज्ञान, संदर्भ ग्रंथाचा वापर, इंग्रजीचे ज्ञान या गोष्टी आवश्यक आहेत. मुलाखतीत पास किंवा नापास असा काहीही प्रकार नसतो. मुलाखत हा लेखी परीक्षेचा एक घटक असतो. मुलाखतीत चांगले गुण मिळाल्यास अंतिम यादीत स्थान मिळण्याची किंवा चांगले पद मिळण्याची शक्यता वाढते.