शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मुलाखत नागरी सेवा (IAS) परीक्षेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2017 00:04 IST

मुलाखत इंग्रजी, हिंदी अथवा मराठीतून देता येते. उमेदवारांचा प्रामाणिकपणा, वैचारिक पातळी, आत्मविश्वास, प्रगल्भता, क्षमता यांचा कस विविध प्रश्नांच्या माध्यमातून

- प्रा. राजेंद्र चिंचोलेमुलाखत इंग्रजी, हिंदी अथवा मराठीतून देता येते. उमेदवारांचा प्रामाणिकपणा, वैचारिक पातळी, आत्मविश्वास, प्रगल्भता, क्षमता यांचा कस विविध प्रश्नांच्या माध्यमातून मुलाखतीच्या पॅनेलद्वारे लावला जातो. मुख्य परीक्षेच्या अर्जात नमूद केलेली वैयक्तिक माहिती व बायोडाटा मुलाखतीचा गाभा असतो. व्यक्तिमत्त्व चाचणीद्वारे उमेदवाराची प्रशासकीय पदासाठीची योग्यता बाळगणे आवश्यक आहे.नागरी सेवेची मुलाखत म्हणजेच व्यक्तिमत्त्व चाचणी हा नागरी सेवा परीक्षेचा अंतिम व अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने २७५ गुण निर्धारित केले आहेत. मुख्य परीक्षेच्या ७ पेपर्समधील (भारतीय भाषा व इंग्रजी सोडून) १७५० गुण व मुलाखतीचे २७५ गुण यापैकी प्राप्त केलेल्या गुणांची बेरीज करूनच विद्यार्थ्यांची IAS, IPS, IFS, गट अ, गट ब सेवा यासाठी निवड केली जाते. केंद्रीय लोकसेवा आयोगाने मुलाखतीऐवजी व्यक्तिमत्त्व चाचणी हा शब्दप्रयोग जाणीवपूर्वक केलेला आहे. यासाठी विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती, विद्यार्थ्यांच्या गाव, परिसर, जिल्हा, विभाग व राज्याची माहिती, शैक्षणिक माहिती, छंद, आवड, सामाजिक सेवेतील रस, नागरी सेवेत येण्याचा उद्देश, क्रीडा क्षेत्र, चालू घडामोडी, वैकल्पिक विषय या घटकांची तयारी करणे आवश्यक महत्त्वाचे ठरते. उमेदवाराला मुलाखतीत सामाजिक जाणीव, निर्णय क्षमता, जिज्ञासू वृत्ती, कल्पकता, आत्मविश्वास, देहबोली, भाषा कौशल्य, संवाद कौशल्य, वैचारिक प्रगल्भता व स्पष्टता या बाबी तपासल्या जातात. यासाठी विविध मुद्द्यांचे आकलन, स्वमत, वाचन, गटचर्चा, बोलण्याचा भरपूर सराव याद्वारे मुलाखतीची प्रभावीरीत्या तयारी करता येते. मुलाखत इंग्रजी, हिंदी अथवा मराठीतून देता येते. उमेदवारांचा प्रामाणिकपणा, वैचारिक पातळी, आत्मविश्वास, प्रगल्भता, क्षमता यांचा कस विविध मुलाखतीच्या पॅनेलद्वारे लावला जातो. व्यक्तिमत्त्व चाचणीद्वारे उमेदवाराची प्रशासकीय पदासाठीची योग्यता बाळगणे आवश्यक आहे. नागरी सेवेद्वारे देशाचे प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी संतुलित विचार भावनांवर नियंत्रण, धीर, समाजाविषयी आस्था, स्थितप्रज्ञता, नावीन्यपूर्णता, क्षमता, आत्मविश्वास, सर्व विषयांचे ज्ञान याची जाण असणे आवश्यक आहे. व्यक्तिमत्त्व चाचणीतील यशासाठी सखोल ज्ञान, संदर्भ ग्रंथाचा वापर, इंग्रजीचे ज्ञान या गोष्टी आवश्यक आहेत. मुलाखतीत पास किंवा नापास असा काहीही प्रकार नसतो. मुलाखत हा लेखी परीक्षेचा एक घटक असतो. मुलाखतीत चांगले गुण मिळाल्यास अंतिम यादीत स्थान मिळण्याची किंवा चांगले पद मिळण्याची शक्यता वाढते.