शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

तापमान वाढल्यास आपण छोटे होऊ

By admin | Updated: March 20, 2017 00:43 IST

पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांवरील बर्फाचे थर कमी होत आहेत. किनारपट्टीच्या भागांना त्यामुळे धोका आहे;

पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांवरील बर्फाचे थर कमी होत आहेत. किनारपट्टीच्या भागांना त्यामुळे धोका आहे; पण तापमान वाढीमुळे यापेक्षा मोठे संकट येऊ शकते असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. तापमान असेच वाढत राहिल्यास पृथ्वीवरील माणसांची उंची कमी होऊ शकते. सायन्स अ‍ॅडव्हॉन्सेज जर्नलमध्ये प्रकाशित अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, ५.३७ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर अशीच स्थिती निर्माण झाली होती, तेव्हा पृथ्वीचे तापमान ३ अंशांनी वाढले होते. ही स्थिती १.८0 लाख वर्षांपूर्वीपर्यंत कायम होती. या काळात पृथ्वीवरील प्राण्यांची सरासरी उंची १४ टक्क्यांनी कमी झाली होती. अमेरिकेतील व्योमिंग येथील बिगहॉर्न बेसिनमध्ये सापडलेल्या प्राण्यांच्या काही जीवाश्मांचा अभ्यास केल्यानंतर हे तथ्य समोर आले. घोडे, गायी, मेंढ्या आणि गेंडे यासारख्या अनेक प्राण्यांचे जीवाश्म येथे आहेत. यातील बहुतांश सर्व प्राण्यांची शारीरिक उंची आताच्या त्यांच्या वंशजांच्या तुलनेत १४ टक्के कमी आढळून आली. शास्त्रज्ञांच्या मते, तापमान वाढल्यामुळे पृथ्वीवरील वनस्पती आणि खाद्यस्थितीवर प्रतिकूल परिणाम झाला. प्राण्यांना पुरेसे खाद्य मिळेनासे झाले. थोड्याशा खाद्यावरच त्यांची गुजराण सुरू झाली. हळूहळू त्यांचे शरीर अनुकूल होत छोटे बनले. वजन कमी झाले. उंची कमी झाली. साहजिकच कमी खाद्यावर त्यांचे भागू लागले. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, आताच्या तापमान वाढीचाही असाच परिणाम होईल. त्यातून माणसेही सुटणार नाहीत. माणसांची उंची कमी होईल. वजन कमी होईल. तथापि, माणूस खाद्य साखळीत सर्वांत वरच्या स्थानावर टिकून राहील.