शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

तापमान वाढल्यास आपण छोटे होऊ

By admin | Updated: March 20, 2017 00:43 IST

पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांवरील बर्फाचे थर कमी होत आहेत. किनारपट्टीच्या भागांना त्यामुळे धोका आहे;

पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांवरील बर्फाचे थर कमी होत आहेत. किनारपट्टीच्या भागांना त्यामुळे धोका आहे; पण तापमान वाढीमुळे यापेक्षा मोठे संकट येऊ शकते असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. तापमान असेच वाढत राहिल्यास पृथ्वीवरील माणसांची उंची कमी होऊ शकते. सायन्स अ‍ॅडव्हॉन्सेज जर्नलमध्ये प्रकाशित अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, ५.३७ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर अशीच स्थिती निर्माण झाली होती, तेव्हा पृथ्वीचे तापमान ३ अंशांनी वाढले होते. ही स्थिती १.८0 लाख वर्षांपूर्वीपर्यंत कायम होती. या काळात पृथ्वीवरील प्राण्यांची सरासरी उंची १४ टक्क्यांनी कमी झाली होती. अमेरिकेतील व्योमिंग येथील बिगहॉर्न बेसिनमध्ये सापडलेल्या प्राण्यांच्या काही जीवाश्मांचा अभ्यास केल्यानंतर हे तथ्य समोर आले. घोडे, गायी, मेंढ्या आणि गेंडे यासारख्या अनेक प्राण्यांचे जीवाश्म येथे आहेत. यातील बहुतांश सर्व प्राण्यांची शारीरिक उंची आताच्या त्यांच्या वंशजांच्या तुलनेत १४ टक्के कमी आढळून आली. शास्त्रज्ञांच्या मते, तापमान वाढल्यामुळे पृथ्वीवरील वनस्पती आणि खाद्यस्थितीवर प्रतिकूल परिणाम झाला. प्राण्यांना पुरेसे खाद्य मिळेनासे झाले. थोड्याशा खाद्यावरच त्यांची गुजराण सुरू झाली. हळूहळू त्यांचे शरीर अनुकूल होत छोटे बनले. वजन कमी झाले. उंची कमी झाली. साहजिकच कमी खाद्यावर त्यांचे भागू लागले. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, आताच्या तापमान वाढीचाही असाच परिणाम होईल. त्यातून माणसेही सुटणार नाहीत. माणसांची उंची कमी होईल. वजन कमी होईल. तथापि, माणूस खाद्य साखळीत सर्वांत वरच्या स्थानावर टिकून राहील.