शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
9
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
10
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
11
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
12
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
13
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
14
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
15
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
16
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
17
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
18
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
19
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
20
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
Daily Top 2Weekly Top 5

तापमान वाढल्यास आपण छोटे होऊ

By admin | Updated: March 20, 2017 00:43 IST

पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांवरील बर्फाचे थर कमी होत आहेत. किनारपट्टीच्या भागांना त्यामुळे धोका आहे;

पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांवरील बर्फाचे थर कमी होत आहेत. किनारपट्टीच्या भागांना त्यामुळे धोका आहे; पण तापमान वाढीमुळे यापेक्षा मोठे संकट येऊ शकते असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. तापमान असेच वाढत राहिल्यास पृथ्वीवरील माणसांची उंची कमी होऊ शकते. सायन्स अ‍ॅडव्हॉन्सेज जर्नलमध्ये प्रकाशित अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, ५.३७ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर अशीच स्थिती निर्माण झाली होती, तेव्हा पृथ्वीचे तापमान ३ अंशांनी वाढले होते. ही स्थिती १.८0 लाख वर्षांपूर्वीपर्यंत कायम होती. या काळात पृथ्वीवरील प्राण्यांची सरासरी उंची १४ टक्क्यांनी कमी झाली होती. अमेरिकेतील व्योमिंग येथील बिगहॉर्न बेसिनमध्ये सापडलेल्या प्राण्यांच्या काही जीवाश्मांचा अभ्यास केल्यानंतर हे तथ्य समोर आले. घोडे, गायी, मेंढ्या आणि गेंडे यासारख्या अनेक प्राण्यांचे जीवाश्म येथे आहेत. यातील बहुतांश सर्व प्राण्यांची शारीरिक उंची आताच्या त्यांच्या वंशजांच्या तुलनेत १४ टक्के कमी आढळून आली. शास्त्रज्ञांच्या मते, तापमान वाढल्यामुळे पृथ्वीवरील वनस्पती आणि खाद्यस्थितीवर प्रतिकूल परिणाम झाला. प्राण्यांना पुरेसे खाद्य मिळेनासे झाले. थोड्याशा खाद्यावरच त्यांची गुजराण सुरू झाली. हळूहळू त्यांचे शरीर अनुकूल होत छोटे बनले. वजन कमी झाले. उंची कमी झाली. साहजिकच कमी खाद्यावर त्यांचे भागू लागले. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, आताच्या तापमान वाढीचाही असाच परिणाम होईल. त्यातून माणसेही सुटणार नाहीत. माणसांची उंची कमी होईल. वजन कमी होईल. तथापि, माणूस खाद्य साखळीत सर्वांत वरच्या स्थानावर टिकून राहील.