शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

दुस-याच मृतदेहावर अंत्यसंस्कार, खरा मुलगा जिवंत

By admin | Updated: April 13, 2016 14:22 IST

पुत्तिंगल देवी मंदिरातील अग्नि दुर्घटनेत होरपळून मरण पावलेल्या नागरीकांच्या मृतदेहांची ओळख पटवणे खरोखरच खूप कठीण बनले आहे.

ऑनलाइन लोकमत 

कोल्लम, दि. १३ - पुत्तिंगल देवी मंदिरातील अग्नि दुर्घटनेत होरपळून मरण पावलेल्या नागरीकांच्या मृतदेहांची ओळख पटवणे खरोखरच खूप कठीण बनले आहे. आप्तजनांची ओळख पटवता येत नसल्याने मृतदेह अदलाबदलीच्या काही घटना समोर आल्या आहेत. तिरुअनंतपूरमजवळील मुद्दक्कल येथे रहाणा-या भवानी या ६५ वर्षीय वृद्ध महिलेला अशाच अनुभवातून जावे लागले. 
 
भवानी यांचा २९ वर्षीय नातू प्रमोद आणि मुलगा राजन दोघे मंदिरातील आतशबाजी पाहण्यासाठी गेले होते. रविवारी दुपारी भवानी यांना त्यांच्या नातवाचा प्रमोदचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. भवानी यांचा दुसरा मुलगा प्रकाश रविवारी दुपारी त्रिवेंद्रम मेडीकल कॉलेजच्या रुग्णालयात गेले व तिथून एका जळलेला मृतदेह घरी आणला. 
 
मृतदेह अत्यंत वाईट स्थितीत असल्याने कुटुंबियांनी लवकर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. नातवाचा मृत्यू आणि मुलगा बेपत्ता असल्याने भवानी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. त्याचवेळी गावातील काही मुलांनी पुत्तिंगल देवी मंदिर दुर्घटनेतील जखमींची यादी वेबसाईटवर पाहिली. त्यामध्ये प्रमोदचे नाव होते. 
 
त्यांनी लगेच प्रमोदच्या कुटुंबाला ही माहिती दिली. प्रमोदची आई कोल्लमच्या रुग्णालयात पोहोचली. त्यावेळी प्रमोद तिथे जिंवत होता. त्याला किरकोळ जखमा झाल्या होत्या. भवानीच्या कुटुंबाने दुस-याच कुणावर प्रमोद समजून अंत्यसंस्कार केले होते. अंत्यसंस्कारासाठी घरी आणलेला मृतदेह पूर्णपणे जळालेला होता. ओठांच्या वर काही टाके होते. दातांमध्ये अंतर होते या खूणांवरुन तो  मृतदेह प्रमोदचा असल्याचा माझा समज झाला असे प्रकाश यांनी सांगितले. 
 
सोमवारी प्रकाश यांना तिरुअनंतपूरमवरुन एक फोन आला होता. ते आपल्या मुलाला शोधत होते. मुलाची ओळख सांगतांना त्यांनी ओठांच्यावर टाके असल्याचे सांगितले. कदाचित तो त्यांचा मुलगा असावा असे प्रकाश यांनी सांगितले. प्रमोद एक-दोन दिवसात घरी येईल पण भवानीला आता मोठा मुलगा राजनची चिंता लागून राहिली आहे. कारण राजनची अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही. 
 
उत्सवात काम करण्याचे पाचशे रुपये मिळतील म्हणून प्रमोद आणि राजन तिथे गेले होते. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास फटाक्यांच्या आतशबाजी दरम्यान भीषण आग लागून १०० पेक्षा जास्त नागरीकांचा मृत्यू झाला होता.