शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
2
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
3
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
5
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
6
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
7
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
8
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
9
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
10
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
11
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
12
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
13
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
14
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
15
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
16
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
17
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
19
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
20
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश

पाच वर्षांत ३८ हजार भ्रष्ट रेल्वे अधिका-यांना शिक्षा

By admin | Updated: August 15, 2014 00:11 IST

विविध प्रकारच्या अनियमितता, भ्रष्टाचारांत गुंतलेल्या ३८ हजार रेल्वे अधिकाऱ्यांना गेल्या पाच वर्षांमध्ये शिक्षा ठोठावण्यात आल्याचे रेल्वेमंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी लोकसभेत सांगितले.

नवी दिल्ली : विविध प्रकारच्या अनियमितता, भ्रष्टाचारांत गुंतलेल्या ३८ हजार रेल्वे अधिकाऱ्यांना गेल्या पाच वर्षांमध्ये शिक्षा ठोठावण्यात आल्याचे रेल्वेमंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी लोकसभेत सांगितले.या काळात रेल्वे मंत्रालयाला एकूण ४२ हजार तक्रारी मिळाल्या असून त्याबाबत तपास केल्यानंतर ही शिक्षा ठोठावण्यात आल्याचे त्यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले. रेल्वेत अनियमितता आणि भ्रष्टाचार आहे याबाबत माझे दुमत नाही. आम्ही त्याला आळा घालण्यासाठी आवश्यक ती पावले उचलत आहोत.रेल्वे कर्मचाऱ्यांनी ८८२ कोटी रुपयांची लाच स्वीकारली असून मंत्रालयाने त्यांच्याकडून ६८२ कोटी रुपये वसूल केले आहेत. तक्रारींची शहानिशा किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत आंतर शिस्त निगराणी संघटनेने वेळोवेळी केलेल्या तपासाच्यावेळी अनियमितता उघडकीस आल्या आहेत. पार्सल वाहतुकीतून महसूल वाढविण्यासाठी रेल्वेने पार्सल व्हॅन भाड्याने घेण्याची योजना सुरू केली आहे. याशिवाय पार्सल एक्स्प्रेस रेल्वेची क्षमता वाढविण्यात आली असून त्यात निविंदाच्या माध्यमातून खासगी आॅपरेटर्सना सहभागी करण्यात आले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)