शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
3
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
4
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
5
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
6
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
7
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
8
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
9
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
10
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
11
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
13
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
14
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
15
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
16
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
17
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
18
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
20
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून

अत्याचाराला बळी पडलेल्या दलित कुटुंबाची वाताहत

By admin | Updated: May 7, 2014 07:32 IST

अत्याचार पिडीत कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन राजकीय नेते मंडळी देत असली तरी ही आश्वासनं प्रत्यक्षात हवेतच विरतात.

बारामती : दलित अत्याचारविरोधी कायदे झाले तरीदेखील अत्याचाराला बळी पडलेल्या कुटुंबीयांची मात्र वाताहत होते. घटना घडल्यानंतर राजकीय मंडळी पीडित कुटुंबाच्या पत्नीला नोकरी देऊ, मुलांचे शिक्षण मोफत करू, मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत केली जाईल, अशा प्रकारची आश्‍वासने दीड वर्षापूर्वी जांब (ता. इंदापूर) येथील तरुण कार्यकर्ता चंद्रकांत गायकवाड याचा गोळ्या झाडून खून झाल्यानंतर देण्यात आली होती. मात्र, राजकीय नेत्यांची आश्‍वासने हवेतच विरली आहेत. स्थानिक वादातून सराईत गुन्हेगार सतपाल रूपनवर व त्याच्या साथीदारांनी चंद्रकांत जयवंत गायकवाड या दलित कार्यकर्त्याची सकाळी १0 वाजण्याच्या सुमारास १२ फेब्रुवारी २0१३ रोजी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली होती. त्यापूर्वीच आपल्या जिवाला रूपनवर गँगकडून धोका असल्याचे लेखी पत्र वालचंदनगर पोलिसांना दिले होते. मात्र, तत्कालीन पोलीस निरीक्षकांनी त्याच्या पत्राकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे त्याला बळी पडावे लागले. रूपनवर आणि त्याच्या साथीदारांनी ७ गोळ्या झाडल्या, तर त्याचा जोडीदार दादा जाधव याच्या अंगावरदेखील गाडी घालून व डोक्यात दगड घालून खून करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याच्या तावडीतून तो सुटला. त्यामुळे रूपनवर याने जाधव यांच्या आईला रस्त्यावर उचलून आपटले होते. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. रूपनवर हा सराईत गुन्हेगार आहे, याची माहिती पोलिसांना होती. त्याच्याकडून आपल्या जिवाला धोका आहे, असे लेखी निवेदन दिलेले असताना पोलिसांनी गांभीर्याने घेतले नव्हते. या घटनेनंतर राज्य व केंद्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्ष, सदस्यांनी गायकवाड कुटुंबीयांची भेट घेतली. सामाजिक न्याय विभागाकडून १ लाख ६0 हजार, रिपब्लिकन पक्षाचे नेते खासदार रामदास आठवले यांनी १ लाख रुपये अशी मदत दिली. या मदतीशिवाय अन्य काही मदत मिळालेली नाही. या कुटुंबाला शासनाकडून भरीव मदत दिली जाईल, असे आश्‍वासन स्थानिक लोकप्रतिनिधी हर्षवर्धन पाटील यांनी दिले होते. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील गायकवाड यांच्या पत्नीला शासकीय नोकरीत लावू, असे आश्‍वासन दिले होते. हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपये मदत दिली जाईल, असे सांगितले होते. त्यानुसार मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपये मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला. मात्र, हा प्रस्ताव नाकारण्यात आला असल्याची धक्कादायक माहिती अधिकार कार्यकर्ते वैभव गिते यांनी दिली. गायकवाड हा गिते यांच्याबरोबर सामाजिक काम करीत होता. त्याचबरोबर माहिती अधिकारातून देखील अनेक प्रकरणे त्याने बाहेर काढली होती. त्यामुळे गिते यांनी गायकवाड कुटुंबीयांच्या लढय़ाला सक्रिय पाठिंबा दिला. दरम्यान, या खटल्यात गायकवाड यांचे वकील अँड. विनोद जावळे यांनी सांगितले की, आरोपींवरील दोषारोपपत्र वेळेत सादर झाले आहे. परंतु, दोन आरोपींना उच्च न्यायालयातून जामीन मिळाला आहे. शासनाच्या आश्‍वासनाप्रमाणे गायकवाड कुटुंबीयांना योग्य तो न्याय मिळालेला नाही. (प्रतिनिधी)

-------------

गायकवाड याच्या पत्नीला शासकीय नोकरीत सामावून घेण्यासाठी सामाजिक न्याय विभाग व जिल्हाधिकारी पातळीवर दीड वर्षापासून टोलवाटोलवी केली जात आहे. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणी होती. त्याकडेदेखील दुर्लक्ष करण्यात आले.