शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

Coronavirus: भावा! ‘ह्यो’ पैलवान गडी महागात पडलाय; क्वारंटाईन केलेल्या युवकाचा खुराक पाहून सगळेच हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 10:03 IST

खरहा टांड पंचायत परिसरात राहणारा २३ वर्षीय युवक अनुप ओझा हा सध्या मंझवारी गावातील क्वारंटाईन सेंटरमध्ये आहे

ठळक मुद्देक्वारंटाईन सेंटरमधील अनुप ओझा सर्वांसाठी चर्चेचा विषयअनुपचं रोजचं जेवण पाहून प्रशासकीय अधिकारीही झाले हैराण१० माणसांचे जेवण एकटाच करतो फस्त

बक्सर – सध्या देशात कोरोना व्हायरसचं संक्रमण वाढत असल्याने संभाव्य कोरोनाग्रस्तांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. बिहारच्या बक्सर येथे असणाऱ्या एका क्वारंटाईन सेंटरमध्ये सध्या भलतीच चर्चा सुरु आहे. या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलेल्या युवकाची भूक सर्वांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. चर्चेवर विश्वास न ठेवता अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहिलं असता ते दृश्य पाहून अधिकारीही हैराण झाले आहेत.

या युवकाचा खुराक ४० चपात्या आणि २० प्लेट भात आहे, हे ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला असेल ना, या युवकाची भूक पाहून क्वारंटाईनमधील लोक आणि अधिकारी हैराण झाले आहेत. दहा लोकांचे जेवण एकटा खात असल्याने हा युवक मंझवारीच्या राजकीय बुनियादी मध्य विद्यालयातील क्वारंटाईन सेंटरसाठी चर्चेचा केंद्र बनला आहे. हा युवक नाश्त्याला ४० चपात्या खातो तर दुपारी जेवणात २० प्लेट भात खातो.

खरहा टांड पंचायत परिसरात राहणारा २३ वर्षीय युवक अनुप ओझा हा सध्या मंझवारी गावातील क्वारंटाईन सेंटरमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी क्वारंटाईन सेंटरमध्ये लिट्टी बनवण्यात आली होती तेव्हा अनुपने एकट्याने ८३ लिट्टी खाल्ल्याने सगळेच अवाक् झाले असल्याचं क्वारंटाईनमधील इतर लोकांनी सांगितले. ज्यावेळी क्वारंटाईन सेंटरमध्ये खाद्य सामानाची कमतरता भासू लागली तेव्हा अधिकाऱ्यांनी याचं कारण विचारलं. तेव्हा अनुप ओझाबद्दल कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. यावर अधिकाऱ्यांचा विश्वास बसला नाही.

त्यामुळे एकेदिवशी अधिकारी दुपारच्या जेवणावेळी क्वारंटाईन सेंटरमध्ये पोहचले. तेव्हा त्यांनी उघड्या डोळ्यांनी अनुपला जेवण करताना पाहिलं तेव्हा तेदेखील हैराण झाले. क्वारंटाईन सेंटरचे विकास प्राधिकरण अधिकारी अजय कुमार सिंह यांनी सांगितले की, अनुप नाश्त्याला ४० चपात्या खातो, आता जेवण बनवणाऱ्यांनी अनुपसाठी चपात्या बनवण्यास नकार दिला आहे. इतक्या मोठ्या संख्येने चपात्या बनवण्यामुळे त्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनुपसाठी आता दिवसातून दोनदा भात देण्यात येणार आहे. अनुपच्या खुराकात काहीही कमी पडायला नको अशी सूचना अधिकाऱ्यांनी दिली आहे.

तसेच अनुपला १० दिवसांपूर्वी क्वारंटाईन सेंटरमध्ये आणलं होतं. तो कामाच्या शोधात राजस्थानला गेला होता. लॉकडाऊनमुळे तो घरी जाण्यासाठी परतला. पण घरी जाण्यापूर्वी त्याला १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले. लवकरच त्याचा क्वारंटाईन संपेल, त्यानंतर क्वारंटाईन सेंटरमधील इतर लोक आणि अधिकारी सुटकेचा नि:श्वास सोडतील.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBiharबिहार