शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

Coronavirus: भावा! ‘ह्यो’ पैलवान गडी महागात पडलाय; क्वारंटाईन केलेल्या युवकाचा खुराक पाहून सगळेच हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 10:03 IST

खरहा टांड पंचायत परिसरात राहणारा २३ वर्षीय युवक अनुप ओझा हा सध्या मंझवारी गावातील क्वारंटाईन सेंटरमध्ये आहे

ठळक मुद्देक्वारंटाईन सेंटरमधील अनुप ओझा सर्वांसाठी चर्चेचा विषयअनुपचं रोजचं जेवण पाहून प्रशासकीय अधिकारीही झाले हैराण१० माणसांचे जेवण एकटाच करतो फस्त

बक्सर – सध्या देशात कोरोना व्हायरसचं संक्रमण वाढत असल्याने संभाव्य कोरोनाग्रस्तांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. बिहारच्या बक्सर येथे असणाऱ्या एका क्वारंटाईन सेंटरमध्ये सध्या भलतीच चर्चा सुरु आहे. या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलेल्या युवकाची भूक सर्वांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. चर्चेवर विश्वास न ठेवता अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहिलं असता ते दृश्य पाहून अधिकारीही हैराण झाले आहेत.

या युवकाचा खुराक ४० चपात्या आणि २० प्लेट भात आहे, हे ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला असेल ना, या युवकाची भूक पाहून क्वारंटाईनमधील लोक आणि अधिकारी हैराण झाले आहेत. दहा लोकांचे जेवण एकटा खात असल्याने हा युवक मंझवारीच्या राजकीय बुनियादी मध्य विद्यालयातील क्वारंटाईन सेंटरसाठी चर्चेचा केंद्र बनला आहे. हा युवक नाश्त्याला ४० चपात्या खातो तर दुपारी जेवणात २० प्लेट भात खातो.

खरहा टांड पंचायत परिसरात राहणारा २३ वर्षीय युवक अनुप ओझा हा सध्या मंझवारी गावातील क्वारंटाईन सेंटरमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी क्वारंटाईन सेंटरमध्ये लिट्टी बनवण्यात आली होती तेव्हा अनुपने एकट्याने ८३ लिट्टी खाल्ल्याने सगळेच अवाक् झाले असल्याचं क्वारंटाईनमधील इतर लोकांनी सांगितले. ज्यावेळी क्वारंटाईन सेंटरमध्ये खाद्य सामानाची कमतरता भासू लागली तेव्हा अधिकाऱ्यांनी याचं कारण विचारलं. तेव्हा अनुप ओझाबद्दल कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. यावर अधिकाऱ्यांचा विश्वास बसला नाही.

त्यामुळे एकेदिवशी अधिकारी दुपारच्या जेवणावेळी क्वारंटाईन सेंटरमध्ये पोहचले. तेव्हा त्यांनी उघड्या डोळ्यांनी अनुपला जेवण करताना पाहिलं तेव्हा तेदेखील हैराण झाले. क्वारंटाईन सेंटरचे विकास प्राधिकरण अधिकारी अजय कुमार सिंह यांनी सांगितले की, अनुप नाश्त्याला ४० चपात्या खातो, आता जेवण बनवणाऱ्यांनी अनुपसाठी चपात्या बनवण्यास नकार दिला आहे. इतक्या मोठ्या संख्येने चपात्या बनवण्यामुळे त्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनुपसाठी आता दिवसातून दोनदा भात देण्यात येणार आहे. अनुपच्या खुराकात काहीही कमी पडायला नको अशी सूचना अधिकाऱ्यांनी दिली आहे.

तसेच अनुपला १० दिवसांपूर्वी क्वारंटाईन सेंटरमध्ये आणलं होतं. तो कामाच्या शोधात राजस्थानला गेला होता. लॉकडाऊनमुळे तो घरी जाण्यासाठी परतला. पण घरी जाण्यापूर्वी त्याला १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले. लवकरच त्याचा क्वारंटाईन संपेल, त्यानंतर क्वारंटाईन सेंटरमधील इतर लोक आणि अधिकारी सुटकेचा नि:श्वास सोडतील.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBiharबिहार