शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

Coronavirus: भावा! ‘ह्यो’ पैलवान गडी महागात पडलाय; क्वारंटाईन केलेल्या युवकाचा खुराक पाहून सगळेच हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 10:03 IST

खरहा टांड पंचायत परिसरात राहणारा २३ वर्षीय युवक अनुप ओझा हा सध्या मंझवारी गावातील क्वारंटाईन सेंटरमध्ये आहे

ठळक मुद्देक्वारंटाईन सेंटरमधील अनुप ओझा सर्वांसाठी चर्चेचा विषयअनुपचं रोजचं जेवण पाहून प्रशासकीय अधिकारीही झाले हैराण१० माणसांचे जेवण एकटाच करतो फस्त

बक्सर – सध्या देशात कोरोना व्हायरसचं संक्रमण वाढत असल्याने संभाव्य कोरोनाग्रस्तांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. बिहारच्या बक्सर येथे असणाऱ्या एका क्वारंटाईन सेंटरमध्ये सध्या भलतीच चर्चा सुरु आहे. या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलेल्या युवकाची भूक सर्वांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. चर्चेवर विश्वास न ठेवता अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहिलं असता ते दृश्य पाहून अधिकारीही हैराण झाले आहेत.

या युवकाचा खुराक ४० चपात्या आणि २० प्लेट भात आहे, हे ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला असेल ना, या युवकाची भूक पाहून क्वारंटाईनमधील लोक आणि अधिकारी हैराण झाले आहेत. दहा लोकांचे जेवण एकटा खात असल्याने हा युवक मंझवारीच्या राजकीय बुनियादी मध्य विद्यालयातील क्वारंटाईन सेंटरसाठी चर्चेचा केंद्र बनला आहे. हा युवक नाश्त्याला ४० चपात्या खातो तर दुपारी जेवणात २० प्लेट भात खातो.

खरहा टांड पंचायत परिसरात राहणारा २३ वर्षीय युवक अनुप ओझा हा सध्या मंझवारी गावातील क्वारंटाईन सेंटरमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी क्वारंटाईन सेंटरमध्ये लिट्टी बनवण्यात आली होती तेव्हा अनुपने एकट्याने ८३ लिट्टी खाल्ल्याने सगळेच अवाक् झाले असल्याचं क्वारंटाईनमधील इतर लोकांनी सांगितले. ज्यावेळी क्वारंटाईन सेंटरमध्ये खाद्य सामानाची कमतरता भासू लागली तेव्हा अधिकाऱ्यांनी याचं कारण विचारलं. तेव्हा अनुप ओझाबद्दल कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. यावर अधिकाऱ्यांचा विश्वास बसला नाही.

त्यामुळे एकेदिवशी अधिकारी दुपारच्या जेवणावेळी क्वारंटाईन सेंटरमध्ये पोहचले. तेव्हा त्यांनी उघड्या डोळ्यांनी अनुपला जेवण करताना पाहिलं तेव्हा तेदेखील हैराण झाले. क्वारंटाईन सेंटरचे विकास प्राधिकरण अधिकारी अजय कुमार सिंह यांनी सांगितले की, अनुप नाश्त्याला ४० चपात्या खातो, आता जेवण बनवणाऱ्यांनी अनुपसाठी चपात्या बनवण्यास नकार दिला आहे. इतक्या मोठ्या संख्येने चपात्या बनवण्यामुळे त्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनुपसाठी आता दिवसातून दोनदा भात देण्यात येणार आहे. अनुपच्या खुराकात काहीही कमी पडायला नको अशी सूचना अधिकाऱ्यांनी दिली आहे.

तसेच अनुपला १० दिवसांपूर्वी क्वारंटाईन सेंटरमध्ये आणलं होतं. तो कामाच्या शोधात राजस्थानला गेला होता. लॉकडाऊनमुळे तो घरी जाण्यासाठी परतला. पण घरी जाण्यापूर्वी त्याला १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले. लवकरच त्याचा क्वारंटाईन संपेल, त्यानंतर क्वारंटाईन सेंटरमधील इतर लोक आणि अधिकारी सुटकेचा नि:श्वास सोडतील.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBiharबिहार