शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: भावा! ‘ह्यो’ पैलवान गडी महागात पडलाय; क्वारंटाईन केलेल्या युवकाचा खुराक पाहून सगळेच हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 10:03 IST

खरहा टांड पंचायत परिसरात राहणारा २३ वर्षीय युवक अनुप ओझा हा सध्या मंझवारी गावातील क्वारंटाईन सेंटरमध्ये आहे

ठळक मुद्देक्वारंटाईन सेंटरमधील अनुप ओझा सर्वांसाठी चर्चेचा विषयअनुपचं रोजचं जेवण पाहून प्रशासकीय अधिकारीही झाले हैराण१० माणसांचे जेवण एकटाच करतो फस्त

बक्सर – सध्या देशात कोरोना व्हायरसचं संक्रमण वाढत असल्याने संभाव्य कोरोनाग्रस्तांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. बिहारच्या बक्सर येथे असणाऱ्या एका क्वारंटाईन सेंटरमध्ये सध्या भलतीच चर्चा सुरु आहे. या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलेल्या युवकाची भूक सर्वांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. चर्चेवर विश्वास न ठेवता अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहिलं असता ते दृश्य पाहून अधिकारीही हैराण झाले आहेत.

या युवकाचा खुराक ४० चपात्या आणि २० प्लेट भात आहे, हे ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला असेल ना, या युवकाची भूक पाहून क्वारंटाईनमधील लोक आणि अधिकारी हैराण झाले आहेत. दहा लोकांचे जेवण एकटा खात असल्याने हा युवक मंझवारीच्या राजकीय बुनियादी मध्य विद्यालयातील क्वारंटाईन सेंटरसाठी चर्चेचा केंद्र बनला आहे. हा युवक नाश्त्याला ४० चपात्या खातो तर दुपारी जेवणात २० प्लेट भात खातो.

खरहा टांड पंचायत परिसरात राहणारा २३ वर्षीय युवक अनुप ओझा हा सध्या मंझवारी गावातील क्वारंटाईन सेंटरमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी क्वारंटाईन सेंटरमध्ये लिट्टी बनवण्यात आली होती तेव्हा अनुपने एकट्याने ८३ लिट्टी खाल्ल्याने सगळेच अवाक् झाले असल्याचं क्वारंटाईनमधील इतर लोकांनी सांगितले. ज्यावेळी क्वारंटाईन सेंटरमध्ये खाद्य सामानाची कमतरता भासू लागली तेव्हा अधिकाऱ्यांनी याचं कारण विचारलं. तेव्हा अनुप ओझाबद्दल कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. यावर अधिकाऱ्यांचा विश्वास बसला नाही.

त्यामुळे एकेदिवशी अधिकारी दुपारच्या जेवणावेळी क्वारंटाईन सेंटरमध्ये पोहचले. तेव्हा त्यांनी उघड्या डोळ्यांनी अनुपला जेवण करताना पाहिलं तेव्हा तेदेखील हैराण झाले. क्वारंटाईन सेंटरचे विकास प्राधिकरण अधिकारी अजय कुमार सिंह यांनी सांगितले की, अनुप नाश्त्याला ४० चपात्या खातो, आता जेवण बनवणाऱ्यांनी अनुपसाठी चपात्या बनवण्यास नकार दिला आहे. इतक्या मोठ्या संख्येने चपात्या बनवण्यामुळे त्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनुपसाठी आता दिवसातून दोनदा भात देण्यात येणार आहे. अनुपच्या खुराकात काहीही कमी पडायला नको अशी सूचना अधिकाऱ्यांनी दिली आहे.

तसेच अनुपला १० दिवसांपूर्वी क्वारंटाईन सेंटरमध्ये आणलं होतं. तो कामाच्या शोधात राजस्थानला गेला होता. लॉकडाऊनमुळे तो घरी जाण्यासाठी परतला. पण घरी जाण्यापूर्वी त्याला १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले. लवकरच त्याचा क्वारंटाईन संपेल, त्यानंतर क्वारंटाईन सेंटरमधील इतर लोक आणि अधिकारी सुटकेचा नि:श्वास सोडतील.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBiharबिहार