शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

मुंबईतील ६२ टक्के पालक मुलांना मारतात

By admin | Updated: February 8, 2015 17:48 IST

मुंबईतील ६२ टक्के पालक त्यांच्या मुलांना मारहाण करतात अशी माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. ८ - मुंबईतील ६२ टक्के पालक त्यांच्या मुलांना मारहाण करतात अशी माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. मुलांवर नियंत्रण मिळवण्यासाठी बहुसंख्य पालक मुलांना मारत असून २ ते ८ वर्ष या वयोगटातील मुलांना पालकांकडून सर्वाधिक मार खावा लागतो असेही या सर्वेक्षणात म्हटले आहे. 
मुंबईतील एका संस्थेने नुकतेच सर्वेक्षण केले असून या सर्वेक्षणात मुंबईतील १७०० पालकांची मतं जाणून घेण्यात आली. यापैकी ६२ टक्के पालकांनी त्यांच्या मुलाला मारल्याचे कबुल केले.  मुलांना मारण्यात वडिलांपेक्षा आई आघाडीवर असते असेही सर्वेक्षणात म्हटले आहे. २९ टक्के वडिलांनी मुलांना मारल्याचे मान्य केले. तर ६१ टक्के मातांनी मुलांना मारल्याचे सांगितले. मुलं नियंत्रणात नसल्याने त्यांच्यावर हात उगारावा लागतो असे या पालकांचे म्हणणे आहे. विशेष बाब म्हणजे या पालकांनी स्वतःदेखील लहान असताना आईवडिलांकडून मार खाल्ला आहे. 'जर एखाद्याला लहानपणी त्याच्या आईवडिलांनी मारले असेल तर तो व्यक्तीदेखील पालक झाल्यावर त्याच्या मुलावर मुलावर हात उगारतो'' असे निरीक्षणही मानसोपचार नोंदवले आहे.  याच संस्थेने दोन वर्षांपूर्वीही यासंदर्भात सर्वेक्षण केले होते. यानुसार २०१२ मध्ये मुलांना मारहाण करणा-या पालकांचे प्रमाण ६९ टक्के ऐवढे होते. २०१२ च्या तुलनेत यंदा मुलांना मारणा-या पालकांची संख्या सात टक्क्यांनी घटली आहे. 
सर्वेक्षणानुसार सर्वाधिक २ ते ८ या वयोगटातील मुलं त्यांच्या आईवडिलांकडून मार खातात. तर ८ ते १० वर्ष या वयोगटातील मुलांना पॉकेट मनी बंद करु किंवा बोर्डींग शाळेत पाठवू अशी धमकी जास्त दिली जाते अशी माहिती समोर आली आहे.