शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचे ‘आरोग्य’ बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 12:29 IST

इलाज होणे गरजेचे

हितेंद्र काळुंखेजळगाव: वेगवेगळ्या विषयांवरुन जिल्हा परिषद नेहमीच गाजत आहे. गाजण्याचे दोन प्रकार असतात.. एक सुप्रकारे व दुसरा कुप्रकारे. यातील पहिला प्रकार जिल्हा परिषदेच्या वाटेला जवळपास नाहीच. नेहमीच कुप्रकारांनी जिल्हा परिषद गाजत असून जिल्हा परिषचे आरोग्यच यामुळे बिघडल्यासारखे झाले आहे.गेल्जा अनेक वर्षात अनेक घोटाळे व अधिकाऱ्यांबाबत तक्रारी, पदाधिकाºयांमधील भांडणे यामुळे विकासकामांवर दुष्परिणाम हा झालाच आहे. यात असा एक विभाग नाही की तो सुटला. परंतु मुलांचे भविष्य घडविणारा शिक्षण विभाग तर अग्रेसर आहे ,असे म्हटले तरी चालेल. गणवेश घोटाळा, बेंच प्रकरण, अपंग युनीट, शिक्षक बदल्या यासह अलीकडील शिक्षक समायोजन आदी अनेक प्रकरणांमुळे शिक्षण विभागाची प्रतिमा तर खूपच मलीन झाली आहे. ज्या विभागात एवढी अनागोंदी आहे, त्या खात्याचा कारभार कसा चालत असेल? हा प्रश्नच आहे. सध्याचे सभापती पोपट भोळे यांनी तर अधिकारी ऐकतच नाही, अशी ओरड करुनही काहीच उपयोग झाला नाही. मुख्याध्यापकांचे शिक्षकच ऐकत नाही, जणू असाच हा प्रकार म्हणावा लागेल.कामे वेळेत न झाल्याने आता सुरु धावपळएकीकडे घोटाळे आणि तक्रारींचा अडसर असताना दुसरीकडे दप्तर दिरंगाईचा फटकाही बसत आहे. जिल्हा परिषदेचा कोट्यवधीचा निधी डिसेंबर अखेरपर्यंतही खर्च झाला नव्हता यामुळे जिल्हा नियोजनचा मागील वर्षांमधील १४ कोटीचा निधी तर परत पाठवावा लागला व इतर निधी मार्चच्या आत खर्च न झाल्यास पुढे आचारसंहिताही लागणार असल्याने हा निधी खर्च करण्यासाठी एकच धावपळ सुरु झाली आहे, आधीच ही धावपळ आणि तत्परता दाखवली असती तर काय बिघडले असते. गेल्या १५ दिवसात शेकडो कामांना मंजुरी मिळाली आहे. हीच मंजुरी वर्षभरात का मिळू शकली नाही ? हा देखली महत्वाचा प्रश्न आहे. या दिरंगाईस जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.जनतेच्या आरोग्याकडेही दुर्लक्षमुळातच जिल्हा परिषदेचे आरोग्य हे विविध कारणांनी बिघडले असताना जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागही यापेक्षा वेगळा नाही. सर्वत्र मौखिक कर्करोग दिन साजरा होत असताना या विभागाने मात्र या दिनाकडे अजिबात लक्ष दिले नाही. कोणत्याही कार्यक्रमांचे आयोजन केले गेले नाही. वास्तविक आरोग्य विषयक दिन साजरा करण्याची व त्यानिमित्त नागरिकांना आरोग्य विषयक मार्गदर्शन व विशेष उपचार सुविधा उपलब्ध करुन देण्याचे काम या विभागाचे असताना या दिनाचे औचित्य न पाळता त्याकडे दुर्लक्ष करणे हे गंभीरच आहे. असे असताना मुख्य कार्यकारी अधिकारी नसल्याने हा दिवस साजरा झाला नाही, असे कारण जिल्हा आरोग्य आधिकारी यांनी पुढे करुन सारवासरव करण्याचा प्रयत्न करणे हे त्याही पेक्षा चुकीचे आहे. कारण अधिकारी नाही म्हणून असे कार्यक्रम घेवू नये, असा नियम नाही. आरोग्य ही अशी बाब आहे, की वेळेवरच इलाज होणे गरजेचे असते. नाही तर आजार हा वाढतच जातो. यासाठी डॉक्टर (डॉक्टरेट) असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. पाटील यांनी एकूच जिल्हा परिषदेच्या बिघडलेल्या आरोग्यावर जालीम इलाज करणे गरजेचे आहे.