शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

जिल्हा परिषदेचे ‘आरोग्य’ बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 12:29 IST

इलाज होणे गरजेचे

हितेंद्र काळुंखेजळगाव: वेगवेगळ्या विषयांवरुन जिल्हा परिषद नेहमीच गाजत आहे. गाजण्याचे दोन प्रकार असतात.. एक सुप्रकारे व दुसरा कुप्रकारे. यातील पहिला प्रकार जिल्हा परिषदेच्या वाटेला जवळपास नाहीच. नेहमीच कुप्रकारांनी जिल्हा परिषद गाजत असून जिल्हा परिषचे आरोग्यच यामुळे बिघडल्यासारखे झाले आहे.गेल्जा अनेक वर्षात अनेक घोटाळे व अधिकाऱ्यांबाबत तक्रारी, पदाधिकाºयांमधील भांडणे यामुळे विकासकामांवर दुष्परिणाम हा झालाच आहे. यात असा एक विभाग नाही की तो सुटला. परंतु मुलांचे भविष्य घडविणारा शिक्षण विभाग तर अग्रेसर आहे ,असे म्हटले तरी चालेल. गणवेश घोटाळा, बेंच प्रकरण, अपंग युनीट, शिक्षक बदल्या यासह अलीकडील शिक्षक समायोजन आदी अनेक प्रकरणांमुळे शिक्षण विभागाची प्रतिमा तर खूपच मलीन झाली आहे. ज्या विभागात एवढी अनागोंदी आहे, त्या खात्याचा कारभार कसा चालत असेल? हा प्रश्नच आहे. सध्याचे सभापती पोपट भोळे यांनी तर अधिकारी ऐकतच नाही, अशी ओरड करुनही काहीच उपयोग झाला नाही. मुख्याध्यापकांचे शिक्षकच ऐकत नाही, जणू असाच हा प्रकार म्हणावा लागेल.कामे वेळेत न झाल्याने आता सुरु धावपळएकीकडे घोटाळे आणि तक्रारींचा अडसर असताना दुसरीकडे दप्तर दिरंगाईचा फटकाही बसत आहे. जिल्हा परिषदेचा कोट्यवधीचा निधी डिसेंबर अखेरपर्यंतही खर्च झाला नव्हता यामुळे जिल्हा नियोजनचा मागील वर्षांमधील १४ कोटीचा निधी तर परत पाठवावा लागला व इतर निधी मार्चच्या आत खर्च न झाल्यास पुढे आचारसंहिताही लागणार असल्याने हा निधी खर्च करण्यासाठी एकच धावपळ सुरु झाली आहे, आधीच ही धावपळ आणि तत्परता दाखवली असती तर काय बिघडले असते. गेल्या १५ दिवसात शेकडो कामांना मंजुरी मिळाली आहे. हीच मंजुरी वर्षभरात का मिळू शकली नाही ? हा देखली महत्वाचा प्रश्न आहे. या दिरंगाईस जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.जनतेच्या आरोग्याकडेही दुर्लक्षमुळातच जिल्हा परिषदेचे आरोग्य हे विविध कारणांनी बिघडले असताना जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागही यापेक्षा वेगळा नाही. सर्वत्र मौखिक कर्करोग दिन साजरा होत असताना या विभागाने मात्र या दिनाकडे अजिबात लक्ष दिले नाही. कोणत्याही कार्यक्रमांचे आयोजन केले गेले नाही. वास्तविक आरोग्य विषयक दिन साजरा करण्याची व त्यानिमित्त नागरिकांना आरोग्य विषयक मार्गदर्शन व विशेष उपचार सुविधा उपलब्ध करुन देण्याचे काम या विभागाचे असताना या दिनाचे औचित्य न पाळता त्याकडे दुर्लक्ष करणे हे गंभीरच आहे. असे असताना मुख्य कार्यकारी अधिकारी नसल्याने हा दिवस साजरा झाला नाही, असे कारण जिल्हा आरोग्य आधिकारी यांनी पुढे करुन सारवासरव करण्याचा प्रयत्न करणे हे त्याही पेक्षा चुकीचे आहे. कारण अधिकारी नाही म्हणून असे कार्यक्रम घेवू नये, असा नियम नाही. आरोग्य ही अशी बाब आहे, की वेळेवरच इलाज होणे गरजेचे असते. नाही तर आजार हा वाढतच जातो. यासाठी डॉक्टर (डॉक्टरेट) असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. पाटील यांनी एकूच जिल्हा परिषदेच्या बिघडलेल्या आरोग्यावर जालीम इलाज करणे गरजेचे आहे.