शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"जिल्हा बँक आता केवळ २३ कोटींच्या तोट्यात, एनपीएमुळेच दिसतोय तोटा" 

By आकाश नेवे | Updated: September 17, 2022 21:03 IST

जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्ष गुलाबराव देवकर यांची माहिती.

जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सध्या केवळ २३ कोटी ६० लाख रुपयांच्या तोट्यात आहे. त्यात एनपीए हा ११९ कोटी रुपयांचा आहे. तर सध्याचा नफा ९५ कोटी ७० लाख रुपयांचा आहे. एनपीएतून नफा वजा केला जात असल्यानेच हा तोटा दिसत असल्याची माहिती बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी दिली. जिल्हा बँकेची सर्वसाधारण बैठक शनिवारी बँकेत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

देवकर यांनी सांगितले की, बँकेत सध्या ३५२० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. शेतकरी सभासदांच्या पीक कर्ज योजनांसाठी राज्य सहकारी बँकेकडून ३४० कोटी रुपयांची कर्ज मर्यादा मंजूर होती. त्यात बँकेने वर्षभरात फेरउचल केलेली नाही. तसेच बँकेने या आर्थिक वर्षात ६०८ कोटी रुपयांचे पीक कर्ज स्वभांडवलातून उभे केले आहे. बँकेच्या थकबाकी कर्जाची वसुली १५ टक्के झाली आहे. त्यात नफा ९५ कोटी ७० लाख रुपयांचा असला तरी एनपीए ११९ कोटी रुपयांचा आहे. त्यामुळे बँक सध्या २३ कोटी ६० लाख रुपयांच्या तोट्यात आहे, असेही त्यांनी सांगितले.

काही सभासदांनी विषयपत्रिका मिळालेली नसल्याची तक्रार केली होती. त्यात त्यांनी म्हटले की, विकासो प्रतिनिधींना अजेंडा थेट पाठवले होते. तर इतरांना टपालाने पाठविले होते. त्यातील २२०० पेक्षा जास्त विषयपत्रिका या पोस्टाच्या शिक्क्यानिशी परत आल्या आहेत. पीक विम्यातूनच कर्ज वसुली ८ सप्टेंबर रोजीच बंद केली आहे. त्यामुळे पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत. संगणक देखभाल दुरुस्तीसाठीचा खर्च हा मूळ रकमेच्या १६ टक्के आहे. त्यामुळे हा खर्च १ कोटी १३ लाख रुपयांपर्यंत जाणार आहे. त्यात अतिरिक्त खर्च नाही. संचित तोटा भरून निघायला मात्र वेळ लागेल, असेही त्यांनी सांगितले.

अपहाराच्या रकमेबाबतही प्रश्न विचारला गेला. त्यात सांगितले की, ही रक्कम चार कोटी ७० लाख ७८ हजारांची आहे. ही सर्व प्रकरणे १९९२-९३ च्या दरम्यानची आहेत. त्यातील एक कोटीची रक्कम वर्षभरात वसूल होईल.

मसाकाच्या मुद्द्यावर सुरेश चौधरी यांनी प्रश्न विचारला त्यावर देवकर यांनी बँकेकडे एका संस्थेने प्रस्ताव दाखल केला आहे. हा प्रस्ताव आला की त्यावर विचार करूनच बँक त्याला मंजुरी देईल. मात्र, रिझर्व बँकेच्या नियमानुसार बँक कारखाना चालवू शकत नाही, असे सांगितले.