शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

"जिल्हा बँक आता केवळ २३ कोटींच्या तोट्यात, एनपीएमुळेच दिसतोय तोटा" 

By आकाश नेवे | Updated: September 17, 2022 21:03 IST

जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्ष गुलाबराव देवकर यांची माहिती.

जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सध्या केवळ २३ कोटी ६० लाख रुपयांच्या तोट्यात आहे. त्यात एनपीए हा ११९ कोटी रुपयांचा आहे. तर सध्याचा नफा ९५ कोटी ७० लाख रुपयांचा आहे. एनपीएतून नफा वजा केला जात असल्यानेच हा तोटा दिसत असल्याची माहिती बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी दिली. जिल्हा बँकेची सर्वसाधारण बैठक शनिवारी बँकेत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

देवकर यांनी सांगितले की, बँकेत सध्या ३५२० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. शेतकरी सभासदांच्या पीक कर्ज योजनांसाठी राज्य सहकारी बँकेकडून ३४० कोटी रुपयांची कर्ज मर्यादा मंजूर होती. त्यात बँकेने वर्षभरात फेरउचल केलेली नाही. तसेच बँकेने या आर्थिक वर्षात ६०८ कोटी रुपयांचे पीक कर्ज स्वभांडवलातून उभे केले आहे. बँकेच्या थकबाकी कर्जाची वसुली १५ टक्के झाली आहे. त्यात नफा ९५ कोटी ७० लाख रुपयांचा असला तरी एनपीए ११९ कोटी रुपयांचा आहे. त्यामुळे बँक सध्या २३ कोटी ६० लाख रुपयांच्या तोट्यात आहे, असेही त्यांनी सांगितले.

काही सभासदांनी विषयपत्रिका मिळालेली नसल्याची तक्रार केली होती. त्यात त्यांनी म्हटले की, विकासो प्रतिनिधींना अजेंडा थेट पाठवले होते. तर इतरांना टपालाने पाठविले होते. त्यातील २२०० पेक्षा जास्त विषयपत्रिका या पोस्टाच्या शिक्क्यानिशी परत आल्या आहेत. पीक विम्यातूनच कर्ज वसुली ८ सप्टेंबर रोजीच बंद केली आहे. त्यामुळे पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत. संगणक देखभाल दुरुस्तीसाठीचा खर्च हा मूळ रकमेच्या १६ टक्के आहे. त्यामुळे हा खर्च १ कोटी १३ लाख रुपयांपर्यंत जाणार आहे. त्यात अतिरिक्त खर्च नाही. संचित तोटा भरून निघायला मात्र वेळ लागेल, असेही त्यांनी सांगितले.

अपहाराच्या रकमेबाबतही प्रश्न विचारला गेला. त्यात सांगितले की, ही रक्कम चार कोटी ७० लाख ७८ हजारांची आहे. ही सर्व प्रकरणे १९९२-९३ च्या दरम्यानची आहेत. त्यातील एक कोटीची रक्कम वर्षभरात वसूल होईल.

मसाकाच्या मुद्द्यावर सुरेश चौधरी यांनी प्रश्न विचारला त्यावर देवकर यांनी बँकेकडे एका संस्थेने प्रस्ताव दाखल केला आहे. हा प्रस्ताव आला की त्यावर विचार करूनच बँक त्याला मंजुरी देईल. मात्र, रिझर्व बँकेच्या नियमानुसार बँक कारखाना चालवू शकत नाही, असे सांगितले.