शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

निंब गावच्या तरुणांची टँकरने पाणी देऊन पाच हजार झाडे जगवण्याची जिद्द!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमळनेर : तालुक्यातील निंब या गावामध्ये बिहार पॅटर्नअंतर्गत पाच हजार झाडे लावली जात असून, पावसाने धोका ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : तालुक्यातील निंब या गावामध्ये बिहार पॅटर्नअंतर्गत पाच हजार झाडे लावली जात असून, पावसाने धोका दिला असला तरी तरुणाई जिद्दीला पेटली आहे. टँकरने पाणी टाकून झाडे जगवली जात आहेत. विशेष म्हणजे सर्व झाडे निंबाची लावली जात असल्याने भविष्यात लिंबाच्या झाडांचे गाव म्हणून 'निंब' गावाचे नाव सार्थक ठरणार आहे.

२०२०ते २१ या वर्षी बिहार पॅटर्नच्या माध्यमातून दोन हजार लिंब झाडांचे संवर्धन व संगोपन व रक्षण करून झाडे जगवली आहेत. त्याच्या माध्यमातून मागील वर्षांत ४० लोकांना रोजगार मिळाला आहे. यावर्षी मागील वर्षीचा बिहार पॅटर्न योजनेचा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे यावर्षी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत बिहार पॅटर्न वृक्षलागवडीच्या माध्यमातून पाच हजार कडू लिंब वृक्षाची वृक्षलागवड करण्यात येत आहे.

यंदा अमळनेर तालुक्यात पाऊस अत्यंत कमी प्रमाणात आहे. हजारो हेक्टर पिके धोक्यात आहेत, अशी बिकट अवस्था असतानासुद्धा निंब (निम ) गावातील पानी फाउंडेशनच्या चळवळीमध्ये काम करणारे अनेक 'वाॅटर हिरो' टॅंकरच्या माध्यमातून पाणी घालून वृक्षलागवड करत आहेत. त्याचबरोबर या गावातील युवक तरुण मोठ्या प्रमाणात या वृक्षलागवडीच्या चळवळीकडे जिद्दीने मैदानामध्ये उतरले आहेत. या पाच हजार वृक्षांच्या माध्यमातून गावातील गरजू व कष्टकरी युवक कष्टकरी मजूर अशा १०० बांधवांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे.

बिहार पॅटर्न योजनेच्या माध्यमातून हजारो वृक्ष तर जगवले जाणारच. त्याचबरोबर या दुष्काळी परिस्थितीत लाखो रुपयांची आर्थिक समृद्धीही या वृक्षमित्रांना प्राप्त होणार आहे. तसेच पर्यावरणाचे संवर्धन, रक्षण करण्याचे काम खूप मोठ्या प्रमाणात या मजूर बांधवांच्या हातून होणार आहे.

चळवळीमध्ये काम करणाऱ्या ध्येयवेड्या वृक्षप्रेमी यांना ग्रामपंचायत, पंचायत समिती, पानी फाउंडेशन, सामाजिक वनीकरण या विभागाचे सहकार्य लाभले आहे.