शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

वाघूर नदीच्या पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 21:25 IST

पाण्याच्या प्रवाहात वाढ : रुग्णालयाच्या सुविधांविषयी संतप्त भावना

पहूर, ता.जामनेर : सकाळी शौचास गेलेल्या कसबेतील युवकाचा वाघूर नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली.गेल्या दोन दिवसापासून वाघूर नदीला पूर असल्याने पाण्याचा प्रवाह वाढला आहे. या युवकाचा पाय घसरल्याने नदीच्या पात्रात पडला. शेख शाहरुख शेख आयुब (२७) हा युवक शौचास गेला असता नदीपात्रात पाय घसरून त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी सात ते साडेसात वाजेच्या सुमारास घडली. घरचा एकुलता एक कर्ता विवाहित युवक असल्याने त्याचा संसार उघड्यावर आला आहे. या घटनेने ग्रामीण रुग्णालयातील सुविधांविषयी संतप्त भावना नातेवाईकांनी व्यक्त केल्या आहेत.शेख शाहरुख याचा पाय घसरल्याने खोल भागात साचलेल्या गाळात तो अडकला. नदीतील पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे. जवळपास पंधरा मिनिटे हा युवक पाण्यात होता. ही घटना चेतन जाधव व संजय यांच्या निदर्शनास येताच चेतनने पाण्यात उडी घेऊन संजयच्या सहकार्याने त्याला पाण्याच्या बाहेर काढले. प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप कुमावत यांनी त्याला मृत घोषित केले. या दरम्यान मोठा जमाव उपस्थित होता.शवविच्छेदनगृहात युवक जिवंत असल्याच्या चर्चेने तणावयुवकास मयत घोषित केल्यानंतर शवविच्छेदन रूममध्ये मृतदेह ठेवण्यात आला. यादरम्यान एका युवकाच्या हातचा दाब मयताच्या पोटावर पडल्याने तोंडावाटे पाणी बाहेर येऊन श्वास निघाल्याचे उपस्थित युवकांनी पाहिले. त्यामुळे युवक जिंवत असल्याच्या चर्चेने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्याला रुग्णवाहिकेने जळगावला नेत असताना डॉक्टरांनी पुन्हा तपासून मृत असल्याचे सांगितले.रग्णसेवेविषयी संतापरूग्णालयात येणाऱ्या रूग्णांना सेवा मिळत नाही. घटनेनंतर शाहरूख बराच वेळ जिंवत होता. पण डॉक्टरांनी विशेष उपचार केले नाही. त्याला जिवंत असूनही मृत घोषित केले व शवविच्छेदन रूममध्ये ठेवले, असा संताप शाहरूखच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. मात्र शाहरुख मृत झाला होता. त्यांनतरच शवविच्छेदन रूममध्ये मृतदेह पाठविला, असे रुग्णालयाकडून सांगितले आहे.