शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

पाण्यासाठी एकवटले निमचे तरुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 17:21 IST

व्याख्यानामुळे मिळाली प्रेरणा: श्रमदानासाठी निवडली जागा

कळमसरे, ता. अमळनेर : पदोपदी शासन मदतीवर विसंबून राहण्यापेक्षा स्वत:ची समस्या स्वत:च सोडविली पाहिजे या विचाराने प्रेरीत होवून तालुक्यातील निम गावातील सर्व तरूण एकवटले व गावात अणेर खान संचलीत पाणी फाऊंडेशन ग्रुपची नुकतीच निर्मिती केली.एकाच दिवसात मोठ्या संख्येने तरूणांनी थेट वॉटर कप स्पर्धेत गाव सहभागाचाही संकल्प केला. याला कारणही तसेच ठरले. भारतात आदर्श ठरलेल्या अकरा गावापैंकी एक पाटोदा जि.औरंगाबाद या आदर्श गावाचे तब्बल २५ वषार्पासूनचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे व्याख्यान निम जवळील श्री क्षेत्र कपिलेश्वर संस्थानच्या वतीने आयोजित केले होते. याचवेळी पाणी फाऊंडेशनचे प्रेरक अ‍ॅड.संभाजी पाटील, अ‍ॅड.विवेक पाटील, नंदु पाटील, विनोद चौधरी, मंगेश पाटील यांनीही गावातील पाणी गावातच जिरविण्याची संकल्पना मांडली अन् निम गावाचे ग्रामस्थही पडीत, गावठाण जमिनीवर श्रमदानाने येत्या पावसाळ्याचे पाणी अडवून जिरविण्याच्या तयारीस लागले. निमचे सरपंच भास्कर हिरामण चौधरी, माजी सरपंच मधुकर रामदास चौधरी, डॉ.एल.डी.चौधरी, सरकारी वकील अ‍ॅड.राजेंद्र चौधरी, ग्रा.पं.चे विकास अधिकारी पुंडलीक शंकर पाटील, कृषि अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.संस्थानचे सचिव मगन वामन पाटील यांनी सुत्र संचालन केले.पाटोद्याच्या सरपंचांनी दिले प्रोहत्सानऔरंगाबाद जिल्ह्यातील आदर्श गाव पाटोदा येथील सरपंच पेरे पाटील यांनी त्यांच्या पाटोदा गावात स्वावलंबनाने राबविलेल्या सर्व आदर्श उपक्रमांची माहीती देऊन निम गावाने पुढाकार घेतल्यास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन गावकऱ्यांना दिले.