शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
2
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
3
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
4
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
5
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
6
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
7
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
8
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
9
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
10
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
11
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
12
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
13
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
14
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
15
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
16
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
17
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
18
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
19
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
Daily Top 2Weekly Top 5

विकतचे पाणी घेऊन भागवावी लागतेय तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:15 IST

राज मालती नगर : वारंवार तक्रारी करूनही पाण्याची सुविधा नाही लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहराला लागून असलेल्या कानळदा ...

राज मालती नगर : वारंवार तक्रारी करूनही पाण्याची सुविधा नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहराला लागून असलेल्या कानळदा रस्त्यावरील राज मालती नगरमध्ये गेल्या १० वर्षांपासून मनपातर्फे परिसरात पिण्याच्या पाईपलाईन न टाकण्यात आल्यामुळे नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. पाण्याच्या टंचाईबाबत अनेकदा नागरिकांनी लोकप्रतिनिधी यांच्याकडे तक्रारी केल्या; मात्र गेल्या दहा वर्षांत एकाही लोकप्रतिनिधीने आश्वासन पूर्ण केले नसल्याची खंत या भागातील रहिवाशांनी 'लोकमत' कडे व्यक्त केली.

गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर या परिसरात नागरी वस्ती वाढली; मात्र या भागातील समस्या आजही जैसे थे आहेत. या भागात बहुतांश ठिकाणी मनपातर्फे पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे;मात्र राज मालती नगरमध्येच पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. नागरिक परिसरातील रहिवाशांकडून विकतचे पाणी घेऊन पाण्याची तहान भागवत आहेत. दर महिन्याला बोअर वेलच्या आणि नळाच्या पिण्याच्या पाण्याचा स्वतंत्र महिना लावला असल्याचे या भागातील रहिवाशांनी सांगितले. निवडणुकीच्या वेळेला लोकप्रतिनिधी येतात आणि पहिले पाण्याची समस्या तत्काळ सोडविण्याचे आश्वासन देतात. त्यानुसार गेल्या १० वर्षांत अनेक निवडणुका झाल्या; मात्र एकाही लोकप्रतिनिधीने अद्याप पाण्याची समस्या सोडविली नसल्याचे सांगितले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून येथील नागरिकांना विकतचे पाणी प्यावे लागत असल्याचे या रहिवाशांनी सांगितले. तर सध्या उन्हाळा सुरू असल्याने येथील बोअरवेलचे पाणी कमी झाल्यामुळे पाण्याची समस्या अधिकच बिकट होत असल्याचेही रहिवाशांनी सांगितले. त्यामुळे या परिस्थितीकडे मनपा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी रहिवाशांमधून केली जात आहे.

इन्फो:

अनेक वर्षांपासून विकतचे घ्यावे लागतेय पाणी

या भागातील रहिवाशांनी सांगितले की, पिण्याच्या पाण्याची कुठलीही सोय नसल्याने येथील रहिवाशांना गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील बोअरवेल असलेल्या नागरिकांकडून विकतचे पाणी पिण्यासाठी घ्यावे लागत आहे. दर महिन्याला यासाठी ठराविक खर्च पिण्याच्या पाण्यावर करावा लागत आहे. तर वापरण्यासाठी बोअरवेलचे पाणी वापरावे लागत आहे. आतापर्यंत पाण्यावर हजारो रुपये खर्च केले असल्याचे या रहिवाशांनी सांगितले. तसेच या परिसरात गटारी व रस्ते नसल्यामुळे रहिवाशांना अधिकच गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात तर अधिकच गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात आले.

इन्फो :

गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. त्यामुळे विकतचे पाणी वापरावे लागत आहे. त्यामुळे पाण्याच्या समस्येकडे मनपाने लक्ष द्यायला हवे.

जितू गायकवाड, रहिवासी

गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. तक्रारी करूनही समस्या सुटलेली नाही. मनपाचे व लोकप्रतिनिधी यांचे येथील समस्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. येथील सर्व समस्या माहीत असतानाही लोकप्रतिनिधी यांनी दखल घेतली नाही.त्यामुळे रहिवाशांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.

शेख इस्माईल, रहिवासी

पिण्याच्या पाण्याची मनपाने पाइपलाईन न टाकल्यामुळे रहिवाशांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. विकतचे पाणी घेण्याची शहरातील ही पहिलीच घटना असावी, असे असतानाही मनपा ना लोकप्रतिनिधी यांचे लक्ष नाही. ते फक्त निवडणुकीपुरतेच तोंड दाखवितात व नंतर गायब होतात.

रंजिता खुळे, रहिवासी

इन्फो

मनपातर्फे गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यात आलेली नाही. त्यामुळे रहिवाशांना विकतचे पाणी वापरावे लागत आहे. मनपा प्रशासनाने तातडीने पाण्याची समस्या सोडावी, ही आमची मागणी आहे.

वत्सलाबाई गायकवाड, रहिवासी