शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

विकतचे पाणी घेऊन भागवावी लागतेय तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:15 IST

राज मालती नगर : वारंवार तक्रारी करूनही पाण्याची सुविधा नाही लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहराला लागून असलेल्या कानळदा ...

राज मालती नगर : वारंवार तक्रारी करूनही पाण्याची सुविधा नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहराला लागून असलेल्या कानळदा रस्त्यावरील राज मालती नगरमध्ये गेल्या १० वर्षांपासून मनपातर्फे परिसरात पिण्याच्या पाईपलाईन न टाकण्यात आल्यामुळे नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. पाण्याच्या टंचाईबाबत अनेकदा नागरिकांनी लोकप्रतिनिधी यांच्याकडे तक्रारी केल्या; मात्र गेल्या दहा वर्षांत एकाही लोकप्रतिनिधीने आश्वासन पूर्ण केले नसल्याची खंत या भागातील रहिवाशांनी 'लोकमत' कडे व्यक्त केली.

गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर या परिसरात नागरी वस्ती वाढली; मात्र या भागातील समस्या आजही जैसे थे आहेत. या भागात बहुतांश ठिकाणी मनपातर्फे पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे;मात्र राज मालती नगरमध्येच पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. नागरिक परिसरातील रहिवाशांकडून विकतचे पाणी घेऊन पाण्याची तहान भागवत आहेत. दर महिन्याला बोअर वेलच्या आणि नळाच्या पिण्याच्या पाण्याचा स्वतंत्र महिना लावला असल्याचे या भागातील रहिवाशांनी सांगितले. निवडणुकीच्या वेळेला लोकप्रतिनिधी येतात आणि पहिले पाण्याची समस्या तत्काळ सोडविण्याचे आश्वासन देतात. त्यानुसार गेल्या १० वर्षांत अनेक निवडणुका झाल्या; मात्र एकाही लोकप्रतिनिधीने अद्याप पाण्याची समस्या सोडविली नसल्याचे सांगितले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून येथील नागरिकांना विकतचे पाणी प्यावे लागत असल्याचे या रहिवाशांनी सांगितले. तर सध्या उन्हाळा सुरू असल्याने येथील बोअरवेलचे पाणी कमी झाल्यामुळे पाण्याची समस्या अधिकच बिकट होत असल्याचेही रहिवाशांनी सांगितले. त्यामुळे या परिस्थितीकडे मनपा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी रहिवाशांमधून केली जात आहे.

इन्फो:

अनेक वर्षांपासून विकतचे घ्यावे लागतेय पाणी

या भागातील रहिवाशांनी सांगितले की, पिण्याच्या पाण्याची कुठलीही सोय नसल्याने येथील रहिवाशांना गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील बोअरवेल असलेल्या नागरिकांकडून विकतचे पाणी पिण्यासाठी घ्यावे लागत आहे. दर महिन्याला यासाठी ठराविक खर्च पिण्याच्या पाण्यावर करावा लागत आहे. तर वापरण्यासाठी बोअरवेलचे पाणी वापरावे लागत आहे. आतापर्यंत पाण्यावर हजारो रुपये खर्च केले असल्याचे या रहिवाशांनी सांगितले. तसेच या परिसरात गटारी व रस्ते नसल्यामुळे रहिवाशांना अधिकच गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात तर अधिकच गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात आले.

इन्फो :

गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. त्यामुळे विकतचे पाणी वापरावे लागत आहे. त्यामुळे पाण्याच्या समस्येकडे मनपाने लक्ष द्यायला हवे.

जितू गायकवाड, रहिवासी

गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. तक्रारी करूनही समस्या सुटलेली नाही. मनपाचे व लोकप्रतिनिधी यांचे येथील समस्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. येथील सर्व समस्या माहीत असतानाही लोकप्रतिनिधी यांनी दखल घेतली नाही.त्यामुळे रहिवाशांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.

शेख इस्माईल, रहिवासी

पिण्याच्या पाण्याची मनपाने पाइपलाईन न टाकल्यामुळे रहिवाशांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. विकतचे पाणी घेण्याची शहरातील ही पहिलीच घटना असावी, असे असतानाही मनपा ना लोकप्रतिनिधी यांचे लक्ष नाही. ते फक्त निवडणुकीपुरतेच तोंड दाखवितात व नंतर गायब होतात.

रंजिता खुळे, रहिवासी

इन्फो

मनपातर्फे गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यात आलेली नाही. त्यामुळे रहिवाशांना विकतचे पाणी वापरावे लागत आहे. मनपा प्रशासनाने तातडीने पाण्याची समस्या सोडावी, ही आमची मागणी आहे.

वत्सलाबाई गायकवाड, रहिवासी