शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

सकल लेवा महिला मंडळातर्फे योग शिबिराचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:12 IST

रेल्वे स्टेशन परिसरातील व्यावसायिकांना समन्स जळगाव : अनलॉक नंतर जिल्हा प्रशासनाने सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत व्यवसाय करण्यास ...

रेल्वे स्टेशन परिसरातील व्यावसायिकांना समन्स

जळगाव : अनलॉक नंतर जिल्हा प्रशासनाने सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे. असे असतांना रेल्वे स्टेशन परिसरात अनेक व्यावयायिक रात्री १० पर्यंत दुकाने उघडी ठेवत असल्याचे निदर्शनास आल्याने, पोलिसांतर्फे या व्यावसायिकांना शनिवारी रात्री समन्स बजाविण्यात आले. रात्री नऊ नंतर दुकाने उघडी दिसल्यास थेट दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

भाजीपाला विक्रेत्यांमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी

जळगाव : कोर्ट चौकातून चित्रा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गोलाणी मार्केटला लागून रस्त्यालगत दोन्ही बाजूला भाजीपाला, फळे व खाद्य विक्रेत्यांच्या हातगाड्या उभ्या राहत असल्यामुळे रस्त्यावरील वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. खरेदीसाठी येणारे नागरिक रस्त्यावरच वाहने उभी करत असल्यामुळे, या कोंडीत अधिकच भर पडत आहे. यामुळे पादचारी नागरिकांना रस्ता ओलांडतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तरी मनपा प्रशासनाने या रस्त्यालगत असलेले अतिक्रमण हटविण्याची मागणी नागरिकांमधुन केली जात आहे.

उघड्यावरील खाद्य पदार्थ विक्रेत्यांवर कारवाईची मागणी

जळगाव : शहरात अनेक ठिकाणी रस्त्यालगत विविध खाद्य पदार्थ विक्रेत्यांच्या हातगाड्या थाटल्या आहेत. यातील बहुतांश विक्रेते हे उघड्यावरच अन्न पदार्थ विक्री करत असतात. सध्या पावसाळा सुरू असल्याने, या उघड्या पदार्थांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तरी मनपा प्रशासनाने उघड्यावरील खाद्य पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधुन केली जात आहे.

गल्ली-बोळीत साचले कचऱ्यांचे ढीग

जळगाव : नवीपेठ, टॉवर चौक, रेल्वे स्टेशन परिसर या भागात अनियमित साफसफाईमुळे गल्ली-बोळीत मोठ्या प्रमाणावर कचऱ्यांचे ढीग साचले आहेत. यामुळे ऐन पावसाळ्यात साथीचे आजार निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तरी मनपा प्रशासनाने या परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्याची व जंतूनाशक औषधांची फवारणी करण्याची मागणी येथील व्यावसायिक व रहिवाशांमधुन केली जात आहे.