शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: गळफासासाठी वापरलेली साडी आणि पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो का?
2
सैनिकांचे मृतदेह, युद्धकैद्यांची अदलाबदल,...; रशिया-युक्रेन यांच्या शांतता बैठकीत काय ठरलं?
3
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
4
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
5
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
6
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
7
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
8
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
9
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
10
Thane Water Cut: ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी १२ तास शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद
11
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
12
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
13
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
15
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला
16
Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, "आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी…"
17
रिंकू सिंहची होणारी पत्नी खासदार, किती आहे तिची संपत्ती...; डोळ्यांवर विश्वास बसणार नाही...
18
सत्यजित तांबेंचे विधान बालिशपणाचे, काँग्रेसने त्यांना...; बाळासाहेब थोरातांनी फटकारले
19
शिलाँगला हनिमूनसाठी गेलेल्या राजाचा मृतदेह सापडला; सोनम अद्याप बेपत्ताच...
20
पाटण्याहून उड्डाण केलेल्या विमानाला गिधाडाची धडक, रांचीत इमर्जन्सी लँडिंग; 4000 फूट उंचावर अडकला होता 175 जणांचा जीव

यंदा प्रथमच हतनूर धरणाचे १६ दरवाजे पूर्ण उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने सोमवारी सकाळी सात वाजता धरणाचे १६ दरवाजे पूर्ण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने सोमवारी सकाळी सात वाजता धरणाचे १६ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. यामुळे तापी नदीला पूर आला असून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यंदा प्रथमच धरणाचे १६ दरवाजे उघडण्यात आले असून पुढील २४ तासात पाण्याचा प्रवाह आणखी वाढण्याची शक्यता आहे.

हतनूर धरण क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस होत आहे. त्यात रविवारी संध्याकाळीदेखील चांगला पाऊस झाला. यात सरासरी ३६.८ मि.मी. पाऊस झाला असला तरी यात एकट्या चिखलदरा येथे १०३ मि.मी. पाऊस झाल्याने पावसाचे हे पाणी पूर्णा नदीद्वारे धरणात पोहचत आहे. यात रविवारी मध्यरात्रीपासूनच धरणात पाण्याची आवक वाढली असून पाटबंधारे विभागाचे अधिकारी धरणावर लक्ष ठेवून आहेत.

यामध्ये १२ जुलै रोजी सकाळी सात वाजता धरणाचे १६ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले. तापी नदीपात्रात ४५ हजार ८०३ क्युसेक पाणी सोडण्यात आले. पुढील २४ तासात पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता असल्याने हतनूर धरणाच्या खालील गावात नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये गुरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये, असे आवाहन पाटबंधारे विभागातर्फे करण्यात आले आहे.