शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

यंदा पावसाची 13 टक्के तूट

By admin | Updated: September 30, 2015 23:57 IST

साडेतीन महिन्यात अवघा 58 टक्के झालेला पाऊस सप्टेंबरच्या अखेरीस तब्बल सरासरीच्या 29 टक्के बरसल्याने पावसाची आकडेवारी वाढून थेट 87 टक्क्यांर्पयत गेली.

कागदोपत्री यंदा पावसाची आकडेवारी वाढलेली दिसत असली तरी प्रत्यक्षात टंचाईचे सावट कायम आहे. साडेतीन महिन्यात अवघा 58 टक्के झालेला पाऊस सप्टेंबरच्या अखेरीस तब्बल सरासरीच्या 29 टक्के बरसल्याने पावसाची आकडेवारी वाढून थेट 87 टक्क्यांर्पयत गेली. शासकीय नियमानुसार आणि प्रचलित पद्धतीनुसार आजपासून अर्थात 1 ऑक्टोबरपासून हिवाळा सुरू झालेला आहे. त्यामुळे यापुढे पाऊस पडलाही तरी ती नोंद शासकीय आकडेवारीत गृहीत धरली जाणार नाही.

यंदाचा पावसाळा उशिरानेच सुरू झाला होता. जूनच्या तिस:या आठवडय़ात जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. परिणामी पेरण्यादेखील उशिराने झाल्या. त्यानंतर पावसाने ओढ देऊन पुन्हा जुलैच्या दुस:या आठवडय़ात हजेरी लावली. जुलैत ब:यापैकी झालेला पाऊस पुन्हा दोन आठवडे गायब झाला. ऑगस्टमध्ये तुरळक स्वरूपात जिल्ह्याच्या काही भागात बरसला. त्यामुळे पीकं थोडय़ाफार प्रमाणात तग धरून राहिली. त्यानंतर तब्बल महिनाभराने अर्थात 13 सप्टेंबरला पाऊस झाला. तीन ते चार दिवस पडलेल्या पावसाने मागचा बॅकलॉग भरून काढला, परंतु पिकांचे जे नुकसान व्हावयाचे ते झालेच. पावसाअभावी बाजरी, मूग, उडीद, सोयाबीन, कापूस ही पीकं वाया गेली होती. बाजरी, ज्वारी, मका, मिरची, हंगामपूर्व लागवडीचा कापूस ही पीकं थोडीफार हाती येणार होती. ती या पावसाने वाया गेली. त्यामुळे खरीप हंगाम तसा शेतक:यांच्या दृष्टीने ‘कहीं खुशी कहीं गम’ स्वरूपातील राहिला. ही परिस्थिती पाहता सप्टेंबरच्या दुस:या आठवडय़ात जिल्हा प्रशासनाने जिल्हाभरात नजर आणेवारी 50 पैशांच्या आतच लागू केली. आता पावसाळा अधिकृतरीत्या संपलेला आहे. कागदोपत्री पावसाची आकडेवारी गेल्या वर्षाच्या तुलनेत 13 टक्के अधिक दाखवत आहे. असे असले तरी जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट अर्थात दुष्काळी स्थिती कायम आहे. शासन आता यावर काय उपाययोजना करते, शेतकरी आणि सर्वसामान्यांना काय दिलासा देते याकडे आता लक्ष लागून आहे.

सप्टेंबरच्या तिस:या आठवडय़ात गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा प्रकल्पांमधील पाणीसाठा तब्बल 20 टक्क्यांनी अधिक आहे. गेल्या वर्षी 23 सप्टेंबर्पयत पाणीसाठय़ाची टक्केवारी 58 टक्के होती. यंदा ती 76.5 टक्के आहे. 37 लघु प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षी 69 टक्के, तर यंदा 76.91 टक्के पाणीसाठा आहे. शिवाय गेल्या वर्षाच्या तुलनेत ओव्हरफ्लो झालेल्या प्रकल्पांची संख्यादेखील यंदा जादा आहे. गेल्या वर्षी 11 प्रकल्प ओव्हरफ्लो झाले होते, तर यंदा 14 प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. रंगावली मध्यम प्रकल्पात 100 टक्के पाणीसाठा झाला आहे. शहादा तालुक्यातील दरा प्रकल्पात देखील 100 टक्के तर नंदुरबार तालुक्यातील शिवण प्रकल्पात 37.43 टक्के पाणीसाठा आहे. पाणी अडविल्याने 83 टक्के पाणीसाठा झाला आहे.

तळोदा वगळता सर्वत्र सरासरीपेक्षा कमीच

4जिल्ह्यात केवळ तळोदा तालुक्यातच पावसाने सरासरी ओलांडली. या तालुक्यात सरासरी पजर्न्यमान 772.70 मि.मी. आहे. यंदा प्रत्यक्षात 781.45 मि.मी. पाऊस झाला आहे. त्या खालोखाल नंदुरबार तालुक्यात पाऊस झाला. नंदुरबारची सरासरी 682.8 मि.मी. असताना प्रत्यक्षात 645.13 मि.मी. पाऊस झाला आहे. सर्वात कमी पाऊस नवापूर तालुक्यात झालेला आहे. या तालुक्यात पावसाची सरासरी 1165 मि.मी. असताना प्रत्यक्षात 810.66 मि.मी. पाऊस झाला आहे. अशीच स्थिती शहादा तालुक्याचीदेखील आहे. या तालुक्यातदेखील पावसाची तूट जवळपास 200 मि.मी.र्पयत आहे. सरासरी 722.7 मि.मी. एवढी असताना केवळ 533.13 मि.मी. पाऊस झाला आहे. अक्कलकुवा तालुक्यातदेखील पावसाची सरासरी 1075 मि.मी. असताना प्रत्यक्षात 826.21 मि.मी. पाऊस झाला आहे. धडगाव त्या मानाने ब:यापैकी आहे. 813.2 सरासरी पजर्न्यमान असताना यंदा प्रत्यक्षात 758.25 मि.मी. पाऊस झाला आहे.

आणेवारी 50 पैशांच्या आतच

4खरिपातील एकूण पीक परिस्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्वच अर्थात सहाही तालुक्यांमधील नजर पीक आणेवारी 50 पैशांच्या आत जाहीर केली. त्यानंतर पाऊस झाला आणि पावसाची सरासरी थेट 87 टक्केर्पयत गेली. असे असले तरी पीक वाया गेलेच. त्यामुळे सुधारित पैसेवारी जाहीर करतानाही ती 50 पैशांच्या आतच जाहीर करावी. जेणेकरून जिल्ह्यातील शेतक:यांना दुष्काळी मदतीचा, योजनांचा लाभ मिळू शकेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.