शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

दहावीचा निकाल : यश मिळाले; पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:15 IST

लेखक - कौस्तुभ परांजपे, जळगाव काही गोष्टी त्याच पद्धतीने झाल्यावर त्याचे समाधान वेगळेच असते. त्या पध्दतीने गोष्टी झाल्या नाहीत ...

लेखक - कौस्तुभ परांजपे, जळगाव

काही गोष्टी त्याच पद्धतीने झाल्यावर त्याचे समाधान वेगळेच असते. त्या पध्दतीने गोष्टी झाल्या नाहीत आणि तरी त्यात यश मिळाल्यावर त्यात आनंद असतो, पण समाधान नसते‌.

दहावीचा तो निकाल लागला आणि एक इतिहास घडला. पण या निकालाबरोबरच अनुभवल्या जाणाऱ्या काही गोष्टी पण या वर्षाकरता संपल्या. दहावीत आहेस ना...... जरा लक्ष दे. या लक्षवेळा दिल्या जाणाऱ्या लक्षवेधी सूचना मुलांना ऐकू आल्या नसतील. मुलांना परीक्षा केंद्रावर घेऊन जाण्याची पालकांची लगबग दिसलीच नाही. पालकांचे चिंताग्रस्त चेहरे, परीक्षा झाल्यावर कसा गेला पेपर? आता थोडावेळ छान आराम करून उद्याच्या पेपरवर लक्ष दे. अशी पाचवीला पुजलेली दहावीच्या परिक्षेची वाक्ये तोंडावरच्या मास्कमागेच दाबली गेली.

ओढून ताणून आणलेला मुलांच्या चेहऱ्यावरचा ताण जाणवला नाही. मुले आत पेपर सोडवतांना सोडायला आलेली पालक मंडळी सावलीच्या आधाराने गंभीरपणे मोकळ्या गप्पा मारताना दिसली नाहीत. इतिहास, भूगोलाच्या पेपरच्या वेळी परीक्षांचा इतिहास, आणि बदललेले

वातावरण यावर त्या भौगोलिक ठिकाणची ऐतिहासिक चर्चा नाही. गणिताच्या पेपरच्या वेळी भरलेल्या भरमसाठ फी ची आकडेमोड नाही. इंग्रजीच्या पेपरच्या वेळी आधुनिकतेच्या मारलेल्या गप्पा नाही. मराठीच्या पेपरला मराठी येणे मस्ट आहे. पण इंग्रजीचा महत्त्वाचे यावर मुक्त संवाद झाले नाहीत.

परीक्षा संपल्यानंतर झालेला आनंद, आणि निकालाच्या दिवशी असलेली अनामिक हुरहुर लक्षात आली नाही. नाही म्हणायला, अजूनही थोडे लक्ष घातले असते तर थोडे जास्त मार्क मिळाले असते. पण बुड टेकत नाही असे म्हणणाऱ्यांना एक नवीन कारण मात्र मिळाले. आता सांगतात थोडे जास्त मिळाले असते, पण नेमका महत्त्वाचा पोर्शन सुरू असतांनाच मेला नेटवर्कचा प्रॉब्लेम यायचा पण नेटवर्क कव्हर नसले तरी

अभ्यास मात्र कव्हर केला याचे कौतुक

अजूनही एक गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे या परीक्षेच्या वेळी असलेला पोलिस बंदोबस्त, शैक्षणिक मंडळाची भरारी घेत निघणारी भरारी पथके आणि या सगळ्यांच्या हातावर तुरी देत गनिमीकाव्याने कॉपी पुरवणाऱ्या मंडळींचे वर्तमानपत्रात छळकलेले फोटो दिसलेच नाहीत. आणि कोणत्याही प्रकारची कॉपी न होता पास होणाऱ्यांची टक्केवारी मात्र वाढल्याचे दिसले. अशा रितीने न दिलेल्या परीक्षेच्या निकालाची हुरहुर संपली आहे, असे वाटते. अगोदर दहावीत कोण आहे? त्यांना आठवणीने दिलेल्या शुभेच्छा या निकाल लागेपर्यंत लक्षात असायच्या. पण आता मुले दहावीत असल्याचे जाणवलेच नाही.

पेपरला जाण्याअगोदर नमस्कार करायला येणारी मुले निकालाचे पेढे घेऊन आल्यावरच ते दहावीत होते हे समजले.