शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
3
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
4
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
5
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
6
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
7
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
8
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
9
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
10
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
11
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
12
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
13
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
14
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
15
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
16
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
17
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
18
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
19
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
20
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु

दहावीचा निकाल : यश मिळाले; पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:15 IST

लेखक - कौस्तुभ परांजपे, जळगाव काही गोष्टी त्याच पद्धतीने झाल्यावर त्याचे समाधान वेगळेच असते. त्या पध्दतीने गोष्टी झाल्या नाहीत ...

लेखक - कौस्तुभ परांजपे, जळगाव

काही गोष्टी त्याच पद्धतीने झाल्यावर त्याचे समाधान वेगळेच असते. त्या पध्दतीने गोष्टी झाल्या नाहीत आणि तरी त्यात यश मिळाल्यावर त्यात आनंद असतो, पण समाधान नसते‌.

दहावीचा तो निकाल लागला आणि एक इतिहास घडला. पण या निकालाबरोबरच अनुभवल्या जाणाऱ्या काही गोष्टी पण या वर्षाकरता संपल्या. दहावीत आहेस ना...... जरा लक्ष दे. या लक्षवेळा दिल्या जाणाऱ्या लक्षवेधी सूचना मुलांना ऐकू आल्या नसतील. मुलांना परीक्षा केंद्रावर घेऊन जाण्याची पालकांची लगबग दिसलीच नाही. पालकांचे चिंताग्रस्त चेहरे, परीक्षा झाल्यावर कसा गेला पेपर? आता थोडावेळ छान आराम करून उद्याच्या पेपरवर लक्ष दे. अशी पाचवीला पुजलेली दहावीच्या परिक्षेची वाक्ये तोंडावरच्या मास्कमागेच दाबली गेली.

ओढून ताणून आणलेला मुलांच्या चेहऱ्यावरचा ताण जाणवला नाही. मुले आत पेपर सोडवतांना सोडायला आलेली पालक मंडळी सावलीच्या आधाराने गंभीरपणे मोकळ्या गप्पा मारताना दिसली नाहीत. इतिहास, भूगोलाच्या पेपरच्या वेळी परीक्षांचा इतिहास, आणि बदललेले

वातावरण यावर त्या भौगोलिक ठिकाणची ऐतिहासिक चर्चा नाही. गणिताच्या पेपरच्या वेळी भरलेल्या भरमसाठ फी ची आकडेमोड नाही. इंग्रजीच्या पेपरच्या वेळी आधुनिकतेच्या मारलेल्या गप्पा नाही. मराठीच्या पेपरला मराठी येणे मस्ट आहे. पण इंग्रजीचा महत्त्वाचे यावर मुक्त संवाद झाले नाहीत.

परीक्षा संपल्यानंतर झालेला आनंद, आणि निकालाच्या दिवशी असलेली अनामिक हुरहुर लक्षात आली नाही. नाही म्हणायला, अजूनही थोडे लक्ष घातले असते तर थोडे जास्त मार्क मिळाले असते. पण बुड टेकत नाही असे म्हणणाऱ्यांना एक नवीन कारण मात्र मिळाले. आता सांगतात थोडे जास्त मिळाले असते, पण नेमका महत्त्वाचा पोर्शन सुरू असतांनाच मेला नेटवर्कचा प्रॉब्लेम यायचा पण नेटवर्क कव्हर नसले तरी

अभ्यास मात्र कव्हर केला याचे कौतुक

अजूनही एक गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे या परीक्षेच्या वेळी असलेला पोलिस बंदोबस्त, शैक्षणिक मंडळाची भरारी घेत निघणारी भरारी पथके आणि या सगळ्यांच्या हातावर तुरी देत गनिमीकाव्याने कॉपी पुरवणाऱ्या मंडळींचे वर्तमानपत्रात छळकलेले फोटो दिसलेच नाहीत. आणि कोणत्याही प्रकारची कॉपी न होता पास होणाऱ्यांची टक्केवारी मात्र वाढल्याचे दिसले. अशा रितीने न दिलेल्या परीक्षेच्या निकालाची हुरहुर संपली आहे, असे वाटते. अगोदर दहावीत कोण आहे? त्यांना आठवणीने दिलेल्या शुभेच्छा या निकाल लागेपर्यंत लक्षात असायच्या. पण आता मुले दहावीत असल्याचे जाणवलेच नाही.

पेपरला जाण्याअगोदर नमस्कार करायला येणारी मुले निकालाचे पेढे घेऊन आल्यावरच ते दहावीत होते हे समजले.