शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण होणार नवीन पोलिस महासंचालक?; सदानंद दाते यांच्या नावाची चर्चा, केंद्राकडे नावे पाठवली
2
अनंतच्या अनैतिक संबंधाची खात्री झाल्याने ‘ती’  खचली; एकदा अचानक आई वडील घरी पोहचले, तेव्हा...
3
‘टीईटी’चा पेपर ३ लाखांत, शिक्षकांची टोळीच जेरबंद; कोल्हापुरात शिक्षकी पेशाला काळीमा
4
बिना ड्रायव्हरच्या कारपेक्षा त्याची टेक्नॉलॉजी भारतासाठी महत्त्वाची; इस्रायली उद्योगपतींशी चर्चा
5
पाक खोटे बोलतोय...फ्रान्सने केला पर्दाफाश; जगाकडूनही खावी लागली चपराक, काय केला खोटा दावा?
6
कमळावर जाे उभा त्याला मतदान करा; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वबळाचे संकेत?
7
मुंबईत तब्बल ११ लाख दुबार नावे आढळली; मतदार याद्यांमध्ये प्रचंड घाेळ, BMC कडे तक्रारींचा पाऊस
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण जीवनशैलीनं लिहितं केलं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 16:13 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘माझी लेखन प्रेरणा’ या सदरात चाळीसगाव येथील कलाकार तथा शिक्षक दिनेश कृष्णाजी चव्हाण यांनी सांगितलेला आपला लेखन प्रवास...

‘शब्द कधी हसवतात’ शब्द कधी रडवतातशब्दच आधार होऊनी शब्दच शब्द सुचवतात.’शालेय जीवनात शिक्षण घेत असताना मराठी व हिंदी विषयाच्या कथा, कविता मला खूप आवडत. त्यातील प्रसंग, चित्रण नेहमी डोळ्यासमोर फिरायचे. कविता रस्त्याने गुणगणायचो. तेव्हा वाटायचं कवितेच्या छोट्या शब्दात किती मोठा आशय दडला आहे.शि क्षणशास्त्र महाविद्यालय शहादा येथे (२०००-२००१) बी.एड.चे शिक्षण घेत असताना मराठी विषयासाठी प्रकल्प देण्यात आला. प्रकल्प हा ‘ग्रामीण जीवनशैली’ या विषयावर होता. त्यावेळी मी आदिवासी. पावरा समाजातील लोकांमध्ये मिसळलो. त्यांची दिनचर्या, त्यांची जीवनशैली स्वत: अनुभवली. त्यांची संस्कृती त्यातून झिरपणारे शब्द, काव्य, चित्र या साऱ्यांना अनुभवले. ते शब्द, ते चित्र काळजाला भिडलं.त्यांचं वास्तव चित्रण मी प्रकल्पात शब्द-चित्रबद्ध केलं. तो प्रकल्प करीत असताना अंतर्मनातून अनुभवातून शब्दांना नव्हे तर शब्दांनी मला घडवले. शब्द सांगत गेले, मी लिहित गेलो. ते लिखाण, तो प्रकल्प जेव्हा पूर्ण झाला तेव्हा प्राचार्यांसह सर्वांनी माझे कौतुक केले आणि त्या वर्षाचा आदर्श विद्यार्थी शिक्षक हा पुरस्कार मला मिळाला. तेव्हापासून लिखाणाला वेळ मिळाले.शालेय पाठ घेण्यासाठी मी जेव्हा कवितांची निवड करू लागलो तेव्हा अनेक ज्येष्ठ-श्रेष्ठ कवींंच्या कविता मी शिकवल्या. तेव्हा वाटलं. बघू या आपणासही काही सूचतं का? तेथून प्रभावित होऊन मला शिक्षणप्रणालीवर ‘शिक्षण सेवक’ कविता सुचली. गणपती महोत्सवाच्या वेळी गल्लीत कार्यक्रम दरवर्षी असतात, तेव्हा मीही कविता सादर केली. तेव्हा मला बºयाच प्रश्नांना सामोरे जावे लागले. तूच केलीस का? का कुणाची चोरली, मग कसं काय सुचली? पण मी तेव्हा खचलो नाही. हरलो नाही, नाऊमेद झालो नाही. आता आपण खरंच या प्रवाहात, शब्दांच्या सागरात थोडे पोहायला पाहिजे म्हणून पुन्हा या नकारात्मक अनुभवांनी लिहायला चालना मिळाली. रोज वर्तमानपत्र वाचण्याचा छंद असल्याने विषय सुचत गेले व परिसरातील विविध घटना, अनुभवातून काव्यनिर्मितीही होऊ लागली.शेवटी एका प्रसिद्ध कवीने म्हटले आहे-‘माझी अक्षरे मागतीप्रभो द्यावे वरदानकवितेच्या कुशीमंधीयावे सुंदर मरण.’’तसं मलाही माझ्या ओळीतून वाटतं‘शब्द सागराच्या प्रवाहातनाव घेण्यास टाळू नका.कलेत मी जीवन जगलो.पण, कविता माझ्या जाळू नका.-दिनेश कृष्णाजी चव्हाण, चाळीसगाव

टॅग्स :literatureसाहित्यChalisgaonचाळीसगाव