शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण जीवनशैलीनं लिहितं केलं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 16:13 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘माझी लेखन प्रेरणा’ या सदरात चाळीसगाव येथील कलाकार तथा शिक्षक दिनेश कृष्णाजी चव्हाण यांनी सांगितलेला आपला लेखन प्रवास...

‘शब्द कधी हसवतात’ शब्द कधी रडवतातशब्दच आधार होऊनी शब्दच शब्द सुचवतात.’शालेय जीवनात शिक्षण घेत असताना मराठी व हिंदी विषयाच्या कथा, कविता मला खूप आवडत. त्यातील प्रसंग, चित्रण नेहमी डोळ्यासमोर फिरायचे. कविता रस्त्याने गुणगणायचो. तेव्हा वाटायचं कवितेच्या छोट्या शब्दात किती मोठा आशय दडला आहे.शि क्षणशास्त्र महाविद्यालय शहादा येथे (२०००-२००१) बी.एड.चे शिक्षण घेत असताना मराठी विषयासाठी प्रकल्प देण्यात आला. प्रकल्प हा ‘ग्रामीण जीवनशैली’ या विषयावर होता. त्यावेळी मी आदिवासी. पावरा समाजातील लोकांमध्ये मिसळलो. त्यांची दिनचर्या, त्यांची जीवनशैली स्वत: अनुभवली. त्यांची संस्कृती त्यातून झिरपणारे शब्द, काव्य, चित्र या साऱ्यांना अनुभवले. ते शब्द, ते चित्र काळजाला भिडलं.त्यांचं वास्तव चित्रण मी प्रकल्पात शब्द-चित्रबद्ध केलं. तो प्रकल्प करीत असताना अंतर्मनातून अनुभवातून शब्दांना नव्हे तर शब्दांनी मला घडवले. शब्द सांगत गेले, मी लिहित गेलो. ते लिखाण, तो प्रकल्प जेव्हा पूर्ण झाला तेव्हा प्राचार्यांसह सर्वांनी माझे कौतुक केले आणि त्या वर्षाचा आदर्श विद्यार्थी शिक्षक हा पुरस्कार मला मिळाला. तेव्हापासून लिखाणाला वेळ मिळाले.शालेय पाठ घेण्यासाठी मी जेव्हा कवितांची निवड करू लागलो तेव्हा अनेक ज्येष्ठ-श्रेष्ठ कवींंच्या कविता मी शिकवल्या. तेव्हा वाटलं. बघू या आपणासही काही सूचतं का? तेथून प्रभावित होऊन मला शिक्षणप्रणालीवर ‘शिक्षण सेवक’ कविता सुचली. गणपती महोत्सवाच्या वेळी गल्लीत कार्यक्रम दरवर्षी असतात, तेव्हा मीही कविता सादर केली. तेव्हा मला बºयाच प्रश्नांना सामोरे जावे लागले. तूच केलीस का? का कुणाची चोरली, मग कसं काय सुचली? पण मी तेव्हा खचलो नाही. हरलो नाही, नाऊमेद झालो नाही. आता आपण खरंच या प्रवाहात, शब्दांच्या सागरात थोडे पोहायला पाहिजे म्हणून पुन्हा या नकारात्मक अनुभवांनी लिहायला चालना मिळाली. रोज वर्तमानपत्र वाचण्याचा छंद असल्याने विषय सुचत गेले व परिसरातील विविध घटना, अनुभवातून काव्यनिर्मितीही होऊ लागली.शेवटी एका प्रसिद्ध कवीने म्हटले आहे-‘माझी अक्षरे मागतीप्रभो द्यावे वरदानकवितेच्या कुशीमंधीयावे सुंदर मरण.’’तसं मलाही माझ्या ओळीतून वाटतं‘शब्द सागराच्या प्रवाहातनाव घेण्यास टाळू नका.कलेत मी जीवन जगलो.पण, कविता माझ्या जाळू नका.-दिनेश कृष्णाजी चव्हाण, चाळीसगाव

टॅग्स :literatureसाहित्यChalisgaonचाळीसगाव