शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

विकासात्मक ऊर्जेसाठी साहित्यिकांनी लिखाण करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 22:30 IST

डॉ.चारुता गोखले : जामनेरला दहावे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन

जामनेर : आजच्या तरुण पिढीजवळ प्रचंड ऊर्जा आहे. नैराश्यामुळे ही पिढी व्यसनाधीन होताना दिसत आहे, किंवा वैफल्यग्रस्त असल्यामुळे आत्महत्येला प्रवृत्त होत आहे. तरुणाच्या या ऊर्जेचे रूपांतर विनाशाकडून विकासामध्ये करण्यासाठी साहित्यिकांनी समर्थपणे लिखाण केले पाहिजे, असे प्रतिपादन जळगाव येथील ज्येष्ठ लेखिका डॉ. चारुता गोखले यांनी रविवारी येथे केले.दहावे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन येथील सेवानिवृत्त कर्मचारी संघाच्या इमारतीत झाले. अध्यक्षस्थानी गोखले होत्या. बालसाहित्यिक गिरीश पाटील यांनी उद्घाटन केले. नगराध्यक्ष साधना महाजन प्रमुख पाहुण्या होत्या. तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डी.डी.पाटील यांनी स्वागत करून संमेलनच्या आयोजनाची माहिती दिली. कथाकथन सत्रात स्वाती बेंद्रे व रमेश पांढरे यांनी कथा सांगितल्या. अध्यक्षस्थानी संध्या महाजन होत्या.जिल्हास्तरीय स्पर्धेसोबतच तालुकास्तरीय काव्यस्पर्धेचा निकाल जाहीर झाला. यात राजश्री गिरी यांच्या ‘एक सुंदर हिरवं झाड’, द्वितीय स्वाती लहासे यांच्या ‘बाबांचा आशीर्वाद’ व तुरटीच्या पीयूषा पाटील हिच्या ‘भाषेचा नजराणा’ या कवितांना मिळाले. प्राजक्ता पाटील हिच्या ‘पावसाच्या धारा’ व संध्या चव्हाण हिच्या ‘सावित्रीबाई फुले’ या कवितांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले.शालेय विद्यार्थ्यांचा सहभागशालेय विद्यार्थ्यांसाठी झालेल्या कविसंमेलनात न्यू इंग्लिश स्कूल, इंदिरा ललवाणी विद्यालय जामनेर, सावित्रीबाई फुले विद्यालय पहूर व रा.सु. जैन विद्यालय तोंडापूरच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.प्रास्ताविक डॉ.प्रशांत पांढरे यांनी, तर संचालन गणेश राऊत यांनी केले. जितेंद्र गोरे, सुकदेव महाजन, ना.का. शिंदे, श्रीकांत पाटील, प्रतिभा पाटील, अनिता पाटील आदींनी सहकार्य केले शंकर भामरे यांनी आभार मानले.