शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

जळगाव जिल्ह्यात बळीराजाला आता रब्बी हंगामाची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:27 IST

तीन मोठे धरण वगळता सर्व जलसाठय़ांमध्ये बिकट स्थिती : केवळ 61 टक्के पाऊस, भरपावसाळ्य़ातही 36 गावांना 18 टँकरने पाणीपुरवठा

ठळक मुद्देरब्बीचा हंगाम कसा येणार ?जिल्ह्यातील पश्चिम भागात भीषण परिस्थिती36 गावांमध्ये 18 टँकर

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 13 - जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पावसाअभावी सर्वाच्या चिंता वाढल्या आहे. सोबतच जिल्ह्यातील तीन मोठे धरण वगळता इतर जलसाठय़ात पुरेसे पाणी नसल्याने रब्बी हंगाम धोक्यात येण्याच्या चिंतेने बळीराजा हवालदिल झाला आहे.  गेल्या वर्षी परतीच्या पावसामुळे धरणसाठय़ात मोठी वाढ झाली होती. यामुळे पावसाची तूट भरून निघण्यासाठी सर्व मदार आता परतीच्या पावसावर आहे.जिल्ह्यात भरपावसाळ्य़ाच्या महिन्यात 36 गावांना 18 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये सर्वाधिक अमळनेर तालुक्यात 23 गावांना 10 टँकरने तर जामनेर तालुक्यात सात गावांना 4 टँकर, बोदवड, पारोळा तालुक्यात प्रत्येकी दोन गावांना एक-एक टँकर तसेच जळगाव व भुसावळ तालुक्यात प्रत्येकी एका गावाला एक-एक टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 94 गावांमध्ये 93 विहिरींचे अधिग्रहणटँकरने पाणीपुरवठय़ासह जिल्ह्यात 94 गावांमध्ये 93 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक अमळनेर तालुक्यात 35 गावांमध्ये 35 विहिरींचे अधिग्रहन करण्यात आले आहे. या सोबतच जिल्ह्यातील 10 गावांमध्ये 8 ठिकाणी तात्पुरती पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे. अनेक प्रकल्पांमध्ये शून्य टक्के जलसाठाजिल्ह्यातील अनेक मध्यम प्रकल्पांमध्ये जलसाठा नसल्याने प्रशासनाची चिंता वाढणार आहे. अगAावती, हिवरा, बहुळा, भोकरबारी, बोरी, मन्याड या प्रकल्पांमध्ये शून्य टक्के जलसाठा आहे. तर अंजनी प्रकल्पात  4 टक्के जलसाठा आहे. मात्र  हतनूर, वाघूर व गिरणा या मोठय़ा प्रकल्पांमध्ये  समाधानकारक जलसाठा असल्याने तेवढीच एक समाधानाची बाब शेतक:यांसाठी आहे.   

जिल्ह्यातील पश्चिम भागाकडील अमळनेर, भडगाव व पाचोरा या तालुक्यांमध्ये पावसाअभावी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. यात अमळनेर व भडगाव तालुक्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत 50 टक्क्याहून कमी पाऊस झाला आहे. हीच परिस्थिती पूर्वेकडील मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातदेखील आहे.  सर्वात कमी 43.1 टक्के पाऊस मुक्ताईनगर तालुक्यात झाला आहे.  परतीच्या पावसाची वेळ आली तरी जिल्ह्यात अद्याप सरासरीच्या 61 टक्के पाऊस झाला आहे. 

एक तर पाऊस कमी व त्यात जलसाठय़ांचीही बिकट स्थिती, यामुळे रब्बी हंगामाला पाणी कसे उपलब्ध करावे, या चिंतेत बळीराजा आहे. आता सर्व आशा या महिन्यातील परतीच्या पावसाकडून असल्याचे बळीराजाचे म्हणणे आहे.