शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लश्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
4
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
5
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
6
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
7
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
8
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
9
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
10
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
11
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
12
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
13
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
14
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
15
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
16
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
17
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
18
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
19
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
20
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...

जळगाव जिल्ह्यात बळीराजाला आता रब्बी हंगामाची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:27 IST

तीन मोठे धरण वगळता सर्व जलसाठय़ांमध्ये बिकट स्थिती : केवळ 61 टक्के पाऊस, भरपावसाळ्य़ातही 36 गावांना 18 टँकरने पाणीपुरवठा

ठळक मुद्देरब्बीचा हंगाम कसा येणार ?जिल्ह्यातील पश्चिम भागात भीषण परिस्थिती36 गावांमध्ये 18 टँकर

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 13 - जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पावसाअभावी सर्वाच्या चिंता वाढल्या आहे. सोबतच जिल्ह्यातील तीन मोठे धरण वगळता इतर जलसाठय़ात पुरेसे पाणी नसल्याने रब्बी हंगाम धोक्यात येण्याच्या चिंतेने बळीराजा हवालदिल झाला आहे.  गेल्या वर्षी परतीच्या पावसामुळे धरणसाठय़ात मोठी वाढ झाली होती. यामुळे पावसाची तूट भरून निघण्यासाठी सर्व मदार आता परतीच्या पावसावर आहे.जिल्ह्यात भरपावसाळ्य़ाच्या महिन्यात 36 गावांना 18 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये सर्वाधिक अमळनेर तालुक्यात 23 गावांना 10 टँकरने तर जामनेर तालुक्यात सात गावांना 4 टँकर, बोदवड, पारोळा तालुक्यात प्रत्येकी दोन गावांना एक-एक टँकर तसेच जळगाव व भुसावळ तालुक्यात प्रत्येकी एका गावाला एक-एक टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 94 गावांमध्ये 93 विहिरींचे अधिग्रहणटँकरने पाणीपुरवठय़ासह जिल्ह्यात 94 गावांमध्ये 93 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक अमळनेर तालुक्यात 35 गावांमध्ये 35 विहिरींचे अधिग्रहन करण्यात आले आहे. या सोबतच जिल्ह्यातील 10 गावांमध्ये 8 ठिकाणी तात्पुरती पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे. अनेक प्रकल्पांमध्ये शून्य टक्के जलसाठाजिल्ह्यातील अनेक मध्यम प्रकल्पांमध्ये जलसाठा नसल्याने प्रशासनाची चिंता वाढणार आहे. अगAावती, हिवरा, बहुळा, भोकरबारी, बोरी, मन्याड या प्रकल्पांमध्ये शून्य टक्के जलसाठा आहे. तर अंजनी प्रकल्पात  4 टक्के जलसाठा आहे. मात्र  हतनूर, वाघूर व गिरणा या मोठय़ा प्रकल्पांमध्ये  समाधानकारक जलसाठा असल्याने तेवढीच एक समाधानाची बाब शेतक:यांसाठी आहे.   

जिल्ह्यातील पश्चिम भागाकडील अमळनेर, भडगाव व पाचोरा या तालुक्यांमध्ये पावसाअभावी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. यात अमळनेर व भडगाव तालुक्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत 50 टक्क्याहून कमी पाऊस झाला आहे. हीच परिस्थिती पूर्वेकडील मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातदेखील आहे.  सर्वात कमी 43.1 टक्के पाऊस मुक्ताईनगर तालुक्यात झाला आहे.  परतीच्या पावसाची वेळ आली तरी जिल्ह्यात अद्याप सरासरीच्या 61 टक्के पाऊस झाला आहे. 

एक तर पाऊस कमी व त्यात जलसाठय़ांचीही बिकट स्थिती, यामुळे रब्बी हंगामाला पाणी कसे उपलब्ध करावे, या चिंतेत बळीराजा आहे. आता सर्व आशा या महिन्यातील परतीच्या पावसाकडून असल्याचे बळीराजाचे म्हणणे आहे.