शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
2
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
3
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
4
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
5
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
6
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
7
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
8
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
9
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
10
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
11
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
12
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
13
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
14
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
15
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
16
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
17
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
18
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
19
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
20
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!

जळगाव जिल्ह्यात बळीराजाला आता रब्बी हंगामाची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:27 IST

तीन मोठे धरण वगळता सर्व जलसाठय़ांमध्ये बिकट स्थिती : केवळ 61 टक्के पाऊस, भरपावसाळ्य़ातही 36 गावांना 18 टँकरने पाणीपुरवठा

ठळक मुद्देरब्बीचा हंगाम कसा येणार ?जिल्ह्यातील पश्चिम भागात भीषण परिस्थिती36 गावांमध्ये 18 टँकर

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 13 - जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पावसाअभावी सर्वाच्या चिंता वाढल्या आहे. सोबतच जिल्ह्यातील तीन मोठे धरण वगळता इतर जलसाठय़ात पुरेसे पाणी नसल्याने रब्बी हंगाम धोक्यात येण्याच्या चिंतेने बळीराजा हवालदिल झाला आहे.  गेल्या वर्षी परतीच्या पावसामुळे धरणसाठय़ात मोठी वाढ झाली होती. यामुळे पावसाची तूट भरून निघण्यासाठी सर्व मदार आता परतीच्या पावसावर आहे.जिल्ह्यात भरपावसाळ्य़ाच्या महिन्यात 36 गावांना 18 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये सर्वाधिक अमळनेर तालुक्यात 23 गावांना 10 टँकरने तर जामनेर तालुक्यात सात गावांना 4 टँकर, बोदवड, पारोळा तालुक्यात प्रत्येकी दोन गावांना एक-एक टँकर तसेच जळगाव व भुसावळ तालुक्यात प्रत्येकी एका गावाला एक-एक टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 94 गावांमध्ये 93 विहिरींचे अधिग्रहणटँकरने पाणीपुरवठय़ासह जिल्ह्यात 94 गावांमध्ये 93 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक अमळनेर तालुक्यात 35 गावांमध्ये 35 विहिरींचे अधिग्रहन करण्यात आले आहे. या सोबतच जिल्ह्यातील 10 गावांमध्ये 8 ठिकाणी तात्पुरती पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे. अनेक प्रकल्पांमध्ये शून्य टक्के जलसाठाजिल्ह्यातील अनेक मध्यम प्रकल्पांमध्ये जलसाठा नसल्याने प्रशासनाची चिंता वाढणार आहे. अगAावती, हिवरा, बहुळा, भोकरबारी, बोरी, मन्याड या प्रकल्पांमध्ये शून्य टक्के जलसाठा आहे. तर अंजनी प्रकल्पात  4 टक्के जलसाठा आहे. मात्र  हतनूर, वाघूर व गिरणा या मोठय़ा प्रकल्पांमध्ये  समाधानकारक जलसाठा असल्याने तेवढीच एक समाधानाची बाब शेतक:यांसाठी आहे.   

जिल्ह्यातील पश्चिम भागाकडील अमळनेर, भडगाव व पाचोरा या तालुक्यांमध्ये पावसाअभावी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. यात अमळनेर व भडगाव तालुक्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत 50 टक्क्याहून कमी पाऊस झाला आहे. हीच परिस्थिती पूर्वेकडील मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातदेखील आहे.  सर्वात कमी 43.1 टक्के पाऊस मुक्ताईनगर तालुक्यात झाला आहे.  परतीच्या पावसाची वेळ आली तरी जिल्ह्यात अद्याप सरासरीच्या 61 टक्के पाऊस झाला आहे. 

एक तर पाऊस कमी व त्यात जलसाठय़ांचीही बिकट स्थिती, यामुळे रब्बी हंगामाला पाणी कसे उपलब्ध करावे, या चिंतेत बळीराजा आहे. आता सर्व आशा या महिन्यातील परतीच्या पावसाकडून असल्याचे बळीराजाचे म्हणणे आहे.