शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जळगावात व्याघ्र परिषदेत वाघांचा अधिवासाबाबत चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 17:32 IST

जिल्ह्यातील वाघांचा अधिवास असल्याचे अनेकदा सिद्ध झाल्याने त्यांचे संरक्षण करण्यासाठी वन्यजीव संरक्षण संस्था व पर्यावरणवाद्यांनी एकत्रित येवून, लोकप्रतिनीधींवर येथील वाघ वाचविण्यासाठी दबाव आणण्याची गरज आहे.

ठळक मुद्देसंरक्षित वनक्षेत्रे हीच खरी मंदिरेव्याघ्र संरक्षणाची मोहिम आता गावपातळीपर्यंत पोहचावीलोकप्रतिनीधींवर येथील वाघ वाचविण्यासाठी दबाव आणण्याची गरज

आॅनलाईन लोकमत

जळगाव,दि.९-जिल्ह्यातील वाघांचा अधिवास असल्याचे अनेकदा सिद्ध झाल्याने त्यांचे संरक्षण करण्यासाठी वन्यजीव संरक्षण संस्था व पर्यावरणवाद्यांनी एकत्रित येवून, लोकप्रतिनीधींवर येथील वाघ वाचविण्यासाठी दबाव आणण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येवून काम करण्याची गरज असल्याचे मत व्याघ्र परिषदेत सहभागी व्याघ्र प्रेमींनी व्यक्त केले.

वसुंधरा चित्रपट महोत्सवातंर्गत पर्यावरण शाळेतर्फे शनिवारी नूतन मराठा महाविद्यालयातील डॉ.जगदिशचंद्र बोस सभागृहात व्याघ्र परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सातपुडा फाउंडेशनचे अध्यक्ष व व्याघ्र अभ्यासक किशोर रिठे, यावल वनक्षेत्राच्या अधिकारी आश्विनी खोडपे, चंद्रपूर येथील व्याघ्र अभ्यासक बंडू धोत्रे, जळगाव येथील पर्यावरण तज्ज्ञ अभय उजागरे, वसुंधरा महोत्सवाचे संयोजक राजेंद्र नन्नवरे आदी उपस्थित होते. व्याघ्र परिषदेचे उदघाटन सकाळी ९.३० वाजता जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

संरक्षित वनक्षेत्रे हीच खरी मंदिरेकिशोर रिठे म्हणाले की, संरक्षण वनक्षेत्राचे जाळे वाढणे गरजेचे आहे. लोकप्रतिनीधींनी देखील संरक्षित वनक्षेत्राचे महत्व जाणून घेणे गरज असून, संरक्षित वनक्षेत्र हेच खरे मंदिर असून, भविष्यातील रामावर जर का वनवास भोगण्याची वेळ आली. तर हीच वनक्षेत्र त्या रामाचे मंदिर राहणार आहे.

व्याघ्र संरक्षणाची मोहिम आता गावपातळीपर्यंत पोहचावीव्याघ्र संरक्षणाची मोहिम आता गावपातळीपर्यंत नेण्याची गरज आहे. ज्या भागात वाघ आढळून येत आहे. त्या भागात काम करण्याची गरज आहे.  तसेच स्वच्छ भारताची मोहिम जी शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. ती मोहिम आता वनक्षेत्रांमध्ये देखील राबविण्याची गरज असल्याचे मत रिठे यांनी व्यक्त केले.