शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

जळगावात व्याघ्र परिषदेत वाघांचा अधिवासाबाबत चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 17:32 IST

जिल्ह्यातील वाघांचा अधिवास असल्याचे अनेकदा सिद्ध झाल्याने त्यांचे संरक्षण करण्यासाठी वन्यजीव संरक्षण संस्था व पर्यावरणवाद्यांनी एकत्रित येवून, लोकप्रतिनीधींवर येथील वाघ वाचविण्यासाठी दबाव आणण्याची गरज आहे.

ठळक मुद्देसंरक्षित वनक्षेत्रे हीच खरी मंदिरेव्याघ्र संरक्षणाची मोहिम आता गावपातळीपर्यंत पोहचावीलोकप्रतिनीधींवर येथील वाघ वाचविण्यासाठी दबाव आणण्याची गरज

आॅनलाईन लोकमत

जळगाव,दि.९-जिल्ह्यातील वाघांचा अधिवास असल्याचे अनेकदा सिद्ध झाल्याने त्यांचे संरक्षण करण्यासाठी वन्यजीव संरक्षण संस्था व पर्यावरणवाद्यांनी एकत्रित येवून, लोकप्रतिनीधींवर येथील वाघ वाचविण्यासाठी दबाव आणण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येवून काम करण्याची गरज असल्याचे मत व्याघ्र परिषदेत सहभागी व्याघ्र प्रेमींनी व्यक्त केले.

वसुंधरा चित्रपट महोत्सवातंर्गत पर्यावरण शाळेतर्फे शनिवारी नूतन मराठा महाविद्यालयातील डॉ.जगदिशचंद्र बोस सभागृहात व्याघ्र परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सातपुडा फाउंडेशनचे अध्यक्ष व व्याघ्र अभ्यासक किशोर रिठे, यावल वनक्षेत्राच्या अधिकारी आश्विनी खोडपे, चंद्रपूर येथील व्याघ्र अभ्यासक बंडू धोत्रे, जळगाव येथील पर्यावरण तज्ज्ञ अभय उजागरे, वसुंधरा महोत्सवाचे संयोजक राजेंद्र नन्नवरे आदी उपस्थित होते. व्याघ्र परिषदेचे उदघाटन सकाळी ९.३० वाजता जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

संरक्षित वनक्षेत्रे हीच खरी मंदिरेकिशोर रिठे म्हणाले की, संरक्षण वनक्षेत्राचे जाळे वाढणे गरजेचे आहे. लोकप्रतिनीधींनी देखील संरक्षित वनक्षेत्राचे महत्व जाणून घेणे गरज असून, संरक्षित वनक्षेत्र हेच खरे मंदिर असून, भविष्यातील रामावर जर का वनवास भोगण्याची वेळ आली. तर हीच वनक्षेत्र त्या रामाचे मंदिर राहणार आहे.

व्याघ्र संरक्षणाची मोहिम आता गावपातळीपर्यंत पोहचावीव्याघ्र संरक्षणाची मोहिम आता गावपातळीपर्यंत नेण्याची गरज आहे. ज्या भागात वाघ आढळून येत आहे. त्या भागात काम करण्याची गरज आहे.  तसेच स्वच्छ भारताची मोहिम जी शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. ती मोहिम आता वनक्षेत्रांमध्ये देखील राबविण्याची गरज असल्याचे मत रिठे यांनी व्यक्त केले.