शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

जळगावात व्याघ्र परिषदेत वाघांचा अधिवासाबाबत चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 17:32 IST

जिल्ह्यातील वाघांचा अधिवास असल्याचे अनेकदा सिद्ध झाल्याने त्यांचे संरक्षण करण्यासाठी वन्यजीव संरक्षण संस्था व पर्यावरणवाद्यांनी एकत्रित येवून, लोकप्रतिनीधींवर येथील वाघ वाचविण्यासाठी दबाव आणण्याची गरज आहे.

ठळक मुद्देसंरक्षित वनक्षेत्रे हीच खरी मंदिरेव्याघ्र संरक्षणाची मोहिम आता गावपातळीपर्यंत पोहचावीलोकप्रतिनीधींवर येथील वाघ वाचविण्यासाठी दबाव आणण्याची गरज

आॅनलाईन लोकमत

जळगाव,दि.९-जिल्ह्यातील वाघांचा अधिवास असल्याचे अनेकदा सिद्ध झाल्याने त्यांचे संरक्षण करण्यासाठी वन्यजीव संरक्षण संस्था व पर्यावरणवाद्यांनी एकत्रित येवून, लोकप्रतिनीधींवर येथील वाघ वाचविण्यासाठी दबाव आणण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येवून काम करण्याची गरज असल्याचे मत व्याघ्र परिषदेत सहभागी व्याघ्र प्रेमींनी व्यक्त केले.

वसुंधरा चित्रपट महोत्सवातंर्गत पर्यावरण शाळेतर्फे शनिवारी नूतन मराठा महाविद्यालयातील डॉ.जगदिशचंद्र बोस सभागृहात व्याघ्र परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सातपुडा फाउंडेशनचे अध्यक्ष व व्याघ्र अभ्यासक किशोर रिठे, यावल वनक्षेत्राच्या अधिकारी आश्विनी खोडपे, चंद्रपूर येथील व्याघ्र अभ्यासक बंडू धोत्रे, जळगाव येथील पर्यावरण तज्ज्ञ अभय उजागरे, वसुंधरा महोत्सवाचे संयोजक राजेंद्र नन्नवरे आदी उपस्थित होते. व्याघ्र परिषदेचे उदघाटन सकाळी ९.३० वाजता जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

संरक्षित वनक्षेत्रे हीच खरी मंदिरेकिशोर रिठे म्हणाले की, संरक्षण वनक्षेत्राचे जाळे वाढणे गरजेचे आहे. लोकप्रतिनीधींनी देखील संरक्षित वनक्षेत्राचे महत्व जाणून घेणे गरज असून, संरक्षित वनक्षेत्र हेच खरे मंदिर असून, भविष्यातील रामावर जर का वनवास भोगण्याची वेळ आली. तर हीच वनक्षेत्र त्या रामाचे मंदिर राहणार आहे.

व्याघ्र संरक्षणाची मोहिम आता गावपातळीपर्यंत पोहचावीव्याघ्र संरक्षणाची मोहिम आता गावपातळीपर्यंत नेण्याची गरज आहे. ज्या भागात वाघ आढळून येत आहे. त्या भागात काम करण्याची गरज आहे.  तसेच स्वच्छ भारताची मोहिम जी शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. ती मोहिम आता वनक्षेत्रांमध्ये देखील राबविण्याची गरज असल्याचे मत रिठे यांनी व्यक्त केले.