शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

डीपीआर मंजूर होईपर्यंत घनकचरा प्रकल्पाच्या कामाला होणार नाही सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क -घनकचरा प्रकल्पासाठी पहिला डीपीआर मंजूर - ८ एप्रिल २०१८ - प्रकल्पासाठी निविदा काढण्यात आली - जून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

-घनकचरा प्रकल्पासाठी पहिला डीपीआर मंजूर - ८ एप्रिल २०१८

- प्रकल्पासाठी निविदा काढण्यात आली - जून २०१९

- कार्यादेश देण्यात आला - २० सप्टेंबर २०१९

- कामाची मुुदत - १९ आॅक्टोबर २०२०

- सद्यस्थितीत कामाची स्थिती - घनकचरा प्रकल्पाच्या कामाला अद्यापही सुरुवात नाही.

- घनकचरा प्रकल्पाचा नवीन डीपीआर तयार करण्यात आला - फेब्रुवारी २०२१

------

- ८ वर्षांपासून प्रकल्प बंद

- दररोज २५० टन कचरा बंद प्रकल्पात टाकला जातो

- जळगाव शहरातील सुमारे ७ कॉलन्यांमधील नागरिकांना होतो धुरामुळे त्रास

- आव्हाणे, भोकणी, आव्हाणी, बांभोरी व खेडी या पाच गावांमधील २० हजार नागरिकांचे आरोग्य धोक्यात

-१ लाख मेट्रिक टन हून अधिक कचरा कुठल्याही प्रक्रियेविना पडून

- घनकचरा प्रकल्पासाठी १२ कोटींची निविदा लक्ष्मी कन्स्ट्रक्शन देण्यात आली आहे.

जळगाव - महापालिकेचा आव्हाने शिवारातील बंद पडलेल्या घनकचरा प्रकल्प कामाची मुदत ऑक्टोबर २०२० मध्येच संपली असूनदेखील महापालिकेने अद्यापही घनकचरा प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केलेली नाही. महापालिकेने याआधी घनकचरा प्रकल्पासाठी तयार करण्यात आलेला डीपीआर शासनाकडून नामंजूर करण्यात आल्यानंतर, फेब्रुवारी २०२१ मध्ये महापालिकेने नवीन डीपीआर तयार केला असून हा डीपीआर शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतरच या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

महापालिका प्रशासन घनकचरा प्रकल्पाच्या विषयावर ढीम्म झालेले पहायला मिळत आहे. आधी दुसऱ्या शहराचा कॉपी-पेस्ट केलेला डीपीआर तपासणी न करताच मंजुरीसाठी पाठविला. यामध्ये ' निरी ' ने मनपा प्रशासनाने मंजुरीसाठी पाठवलेला घनकचरा प्रकल्पाचा डीपीआर हा इतर महापालिकेचा कॉपी-पेस्ट केलेला डीपीआर असल्याचे सांगत महापालिकेचा डीपीआर नामंजूर केला होता. तसेच मनपाला नव्याने डीपीआर तयार करून पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या. दुसरीकडे महापालिका प्रशासनाने घनकचरा प्रकल्पाच्या कामासाठी मक्तेदाराला कार्यादेश देवूनही वेळेवर काम सुरू केले नाही. त्यातच काम सुरू न करताच या कामाची मुदतदेखील संपली आहे.

घनकचरा प्रकल्पाच्या कामाबाबत महापालिका प्रशासनाला गांभीर्य नाही

१.आठ वर्षांपासून हा प्रकल्प बंद आहे. याबाबत हरित लवादाने देखील मनपावर ताशेरे ओढले आहेत. याबाबत मनपा प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येते.

२. घनकचरा प्रकल्प शहरात सुरू नसल्याने स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियानात महापालिकेला दरवर्षी ५०० गुणांवर पाणी फेरावे लागते. यामुळे शहराची स्वच्छ सर्वेक्षणात पिछेहाट या ५०० गुणांचे महत्व मनपा प्रशासनाला नसल्याचेच दिसून येते.

३. शहरातील ७ कॉलन्यांमधील २० हजार ते परिसरातील ५ गावांमधील १५ हजार मिळून सुमारे ३५ हजार नागरिकांना प्रकल्पातून निघणाऱ्या धुरामुळे होतो त्रास. मनपा प्रशासन भोपाळसारख्या मोठ्या वायू दुर्घटनेची वाट पाहत आहे का ? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

४ कचऱ्याला लागणाऱ्या आगीतून मिथेन वायूू बाहेर निघतो तसेच धुरामुळे अनेकदा सुरत रेल्वेलाईनवर दिसेनासे झाल्याने तीन वेळा रेल्वेही थांबविल्याचा घटना घडल्या आहेत.

अजूनही एक लाख टन कचरा प्रक्रियेविना पडूनच

या ठिकाणी बायो मायनिंगदेखीलचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम सहा महिन्यांत होणे अपेक्षित होते. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून हे काम सुरू आहे. अद्यापही घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणावरील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आलेली नाही. याठिकाणी सद्यस्थितीत एक लाख मेट्रिक टन कचरा कुठल्याही प्रक्रियेविना पडून आहे. या कचऱ्याला लागणाऱ्या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरत असतो. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्यदेखील मोठ्या प्रमाणात धोक्यात आले आहे. या परिसरातील नागरिकांसह अनेक पर्यावरणप्रेमींनीदेखील महापालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र महापालिका प्रशासन अजूनही याबाबत गांभीर्याने विचार करताना दिसून येत नाही.

कोट..

कचऱ्यावर प्रक्रिया झाल्यानंतर कामाला सुरुवात केली जाणार आहे. याबाबत बायोमायनिंगच्या कामाचा वेग वाढविण्याचा सूचना दिल्या आहेत. यासह घनकचरा प्रकल्पासाठीच्या नवीन डीपीआर शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून लवकरच या डीपीआरला मंजुरी मिळाल्यानंतर कामाला सुरुवात होईल.

-अरविंद भोसले, बांधकाम अभियंता, मनपा