शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

डीपीआर मंजूर होईपर्यंत घनकचरा प्रकल्पाच्या कामाला होणार नाही सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क -घनकचरा प्रकल्पासाठी पहिला डीपीआर मंजूर - ८ एप्रिल २०१८ - प्रकल्पासाठी निविदा काढण्यात आली - जून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

-घनकचरा प्रकल्पासाठी पहिला डीपीआर मंजूर - ८ एप्रिल २०१८

- प्रकल्पासाठी निविदा काढण्यात आली - जून २०१९

- कार्यादेश देण्यात आला - २० सप्टेंबर २०१९

- कामाची मुुदत - १९ आॅक्टोबर २०२०

- सद्यस्थितीत कामाची स्थिती - घनकचरा प्रकल्पाच्या कामाला अद्यापही सुरुवात नाही.

- घनकचरा प्रकल्पाचा नवीन डीपीआर तयार करण्यात आला - फेब्रुवारी २०२१

------

- ८ वर्षांपासून प्रकल्प बंद

- दररोज २५० टन कचरा बंद प्रकल्पात टाकला जातो

- जळगाव शहरातील सुमारे ७ कॉलन्यांमधील नागरिकांना होतो धुरामुळे त्रास

- आव्हाणे, भोकणी, आव्हाणी, बांभोरी व खेडी या पाच गावांमधील २० हजार नागरिकांचे आरोग्य धोक्यात

-१ लाख मेट्रिक टन हून अधिक कचरा कुठल्याही प्रक्रियेविना पडून

- घनकचरा प्रकल्पासाठी १२ कोटींची निविदा लक्ष्मी कन्स्ट्रक्शन देण्यात आली आहे.

जळगाव - महापालिकेचा आव्हाने शिवारातील बंद पडलेल्या घनकचरा प्रकल्प कामाची मुदत ऑक्टोबर २०२० मध्येच संपली असूनदेखील महापालिकेने अद्यापही घनकचरा प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केलेली नाही. महापालिकेने याआधी घनकचरा प्रकल्पासाठी तयार करण्यात आलेला डीपीआर शासनाकडून नामंजूर करण्यात आल्यानंतर, फेब्रुवारी २०२१ मध्ये महापालिकेने नवीन डीपीआर तयार केला असून हा डीपीआर शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतरच या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

महापालिका प्रशासन घनकचरा प्रकल्पाच्या विषयावर ढीम्म झालेले पहायला मिळत आहे. आधी दुसऱ्या शहराचा कॉपी-पेस्ट केलेला डीपीआर तपासणी न करताच मंजुरीसाठी पाठविला. यामध्ये ' निरी ' ने मनपा प्रशासनाने मंजुरीसाठी पाठवलेला घनकचरा प्रकल्पाचा डीपीआर हा इतर महापालिकेचा कॉपी-पेस्ट केलेला डीपीआर असल्याचे सांगत महापालिकेचा डीपीआर नामंजूर केला होता. तसेच मनपाला नव्याने डीपीआर तयार करून पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या. दुसरीकडे महापालिका प्रशासनाने घनकचरा प्रकल्पाच्या कामासाठी मक्तेदाराला कार्यादेश देवूनही वेळेवर काम सुरू केले नाही. त्यातच काम सुरू न करताच या कामाची मुदतदेखील संपली आहे.

घनकचरा प्रकल्पाच्या कामाबाबत महापालिका प्रशासनाला गांभीर्य नाही

१.आठ वर्षांपासून हा प्रकल्प बंद आहे. याबाबत हरित लवादाने देखील मनपावर ताशेरे ओढले आहेत. याबाबत मनपा प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येते.

२. घनकचरा प्रकल्प शहरात सुरू नसल्याने स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियानात महापालिकेला दरवर्षी ५०० गुणांवर पाणी फेरावे लागते. यामुळे शहराची स्वच्छ सर्वेक्षणात पिछेहाट या ५०० गुणांचे महत्व मनपा प्रशासनाला नसल्याचेच दिसून येते.

३. शहरातील ७ कॉलन्यांमधील २० हजार ते परिसरातील ५ गावांमधील १५ हजार मिळून सुमारे ३५ हजार नागरिकांना प्रकल्पातून निघणाऱ्या धुरामुळे होतो त्रास. मनपा प्रशासन भोपाळसारख्या मोठ्या वायू दुर्घटनेची वाट पाहत आहे का ? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

४ कचऱ्याला लागणाऱ्या आगीतून मिथेन वायूू बाहेर निघतो तसेच धुरामुळे अनेकदा सुरत रेल्वेलाईनवर दिसेनासे झाल्याने तीन वेळा रेल्वेही थांबविल्याचा घटना घडल्या आहेत.

अजूनही एक लाख टन कचरा प्रक्रियेविना पडूनच

या ठिकाणी बायो मायनिंगदेखीलचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम सहा महिन्यांत होणे अपेक्षित होते. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून हे काम सुरू आहे. अद्यापही घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणावरील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आलेली नाही. याठिकाणी सद्यस्थितीत एक लाख मेट्रिक टन कचरा कुठल्याही प्रक्रियेविना पडून आहे. या कचऱ्याला लागणाऱ्या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरत असतो. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्यदेखील मोठ्या प्रमाणात धोक्यात आले आहे. या परिसरातील नागरिकांसह अनेक पर्यावरणप्रेमींनीदेखील महापालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र महापालिका प्रशासन अजूनही याबाबत गांभीर्याने विचार करताना दिसून येत नाही.

कोट..

कचऱ्यावर प्रक्रिया झाल्यानंतर कामाला सुरुवात केली जाणार आहे. याबाबत बायोमायनिंगच्या कामाचा वेग वाढविण्याचा सूचना दिल्या आहेत. यासह घनकचरा प्रकल्पासाठीच्या नवीन डीपीआर शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून लवकरच या डीपीआरला मंजुरी मिळाल्यानंतर कामाला सुरुवात होईल.

-अरविंद भोसले, बांधकाम अभियंता, मनपा